शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:56 IST

भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावून खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा नगराध्यक्ष केला. यामुळे भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत आले. राष्ट्रवादीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फुटीचा, तर भाजपमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडून इनकमिंग करण्याचा पायंडाच बनल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांची परिस्थिती पाहता तर खासदार गटाला निवडणुकीत, तर आमदार गटाला सत्तेत आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व गट अशी निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. पक्षांतर्गत धोरणानुसार नगराध्यक्ष बदलाचा निर्णय झाला. पुढील नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र याच काळात राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा घेत खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावून भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया केली.खासदारांच्या फोडाफोडीनंतर आमदार विरुद्ध खासदार गटातील राजकारण चर्चेत आले. मात्र, दोन्ही गटातील फुटाफुटीचा जुनाच पायंडा कायम राहिल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.तासगाव नगरपालिकेत आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील गटात फूट पडल्यानंतर खासदार गटाने फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिला प्रयत्न अपयशी ठरला. आर. आर. पाटील यांच्या पश्चात खासदार गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडून भाजपचा नगराध्यक्ष केला होता.

त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये झालेले फोडाफोडीचे राजकारण तासगावचीच पुनरावृत्ती असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेच्या रिंगणात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.का आहे आत्मपरीक्षणाची गरज?  आमदार गट : आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव कवठेमहांकाळ-मधील आबा गट संपेल अशी चर्चा असतानादेखील आबा गटाचे अस्तित्व प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. किंबहुना अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत आबा गटाला घवघवीत यश मिळाले. मात्र निवडणुकीत एकनिष्ठ असणारे अनेक पदाधिकारी, पदावर गेल्यानंतर नाराजीचा सूर ओढून भाजपशी जवळीक करत असल्याचे चित्र वेळोवेळी दिसून येत आहे. त्यामुळेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आमदार गट किंबहुना रोहित पाटील यांना आहे.खासदार गट : राज्यात सत्तेत असताना आणि समोर तुल्यबळ विरोधक नसतानादेखील खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिकेची सत्ता काठावर मिळाली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत बहुमत मिळवण्यात अपयश आले. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीवर भिस्त ठेवणाऱ्या खासदार गटाला निवडणुकीच्या रिंगणात वर्चस्व सिद्ध करण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने आत्मपरीक्षणाची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRohit Patilरोहित पाटिल