शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:56 IST

भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावून खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा नगराध्यक्ष केला. यामुळे भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत आले. राष्ट्रवादीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फुटीचा, तर भाजपमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडून इनकमिंग करण्याचा पायंडाच बनल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांची परिस्थिती पाहता तर खासदार गटाला निवडणुकीत, तर आमदार गटाला सत्तेत आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व गट अशी निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. पक्षांतर्गत धोरणानुसार नगराध्यक्ष बदलाचा निर्णय झाला. पुढील नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र याच काळात राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा घेत खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावून भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया केली.खासदारांच्या फोडाफोडीनंतर आमदार विरुद्ध खासदार गटातील राजकारण चर्चेत आले. मात्र, दोन्ही गटातील फुटाफुटीचा जुनाच पायंडा कायम राहिल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.तासगाव नगरपालिकेत आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील गटात फूट पडल्यानंतर खासदार गटाने फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिला प्रयत्न अपयशी ठरला. आर. आर. पाटील यांच्या पश्चात खासदार गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडून भाजपचा नगराध्यक्ष केला होता.

त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये झालेले फोडाफोडीचे राजकारण तासगावचीच पुनरावृत्ती असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेच्या रिंगणात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.का आहे आत्मपरीक्षणाची गरज?  आमदार गट : आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव कवठेमहांकाळ-मधील आबा गट संपेल अशी चर्चा असतानादेखील आबा गटाचे अस्तित्व प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. किंबहुना अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत आबा गटाला घवघवीत यश मिळाले. मात्र निवडणुकीत एकनिष्ठ असणारे अनेक पदाधिकारी, पदावर गेल्यानंतर नाराजीचा सूर ओढून भाजपशी जवळीक करत असल्याचे चित्र वेळोवेळी दिसून येत आहे. त्यामुळेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आमदार गट किंबहुना रोहित पाटील यांना आहे.खासदार गट : राज्यात सत्तेत असताना आणि समोर तुल्यबळ विरोधक नसतानादेखील खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिकेची सत्ता काठावर मिळाली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत बहुमत मिळवण्यात अपयश आले. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीवर भिस्त ठेवणाऱ्या खासदार गटाला निवडणुकीच्या रिंगणात वर्चस्व सिद्ध करण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने आत्मपरीक्षणाची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRohit Patilरोहित पाटिल