शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:56 IST

भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावून खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा नगराध्यक्ष केला. यामुळे भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत आले. राष्ट्रवादीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फुटीचा, तर भाजपमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडून इनकमिंग करण्याचा पायंडाच बनल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांची परिस्थिती पाहता तर खासदार गटाला निवडणुकीत, तर आमदार गटाला सत्तेत आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व गट अशी निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. पक्षांतर्गत धोरणानुसार नगराध्यक्ष बदलाचा निर्णय झाला. पुढील नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र याच काळात राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा घेत खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावून भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया केली.खासदारांच्या फोडाफोडीनंतर आमदार विरुद्ध खासदार गटातील राजकारण चर्चेत आले. मात्र, दोन्ही गटातील फुटाफुटीचा जुनाच पायंडा कायम राहिल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.तासगाव नगरपालिकेत आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील गटात फूट पडल्यानंतर खासदार गटाने फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिला प्रयत्न अपयशी ठरला. आर. आर. पाटील यांच्या पश्चात खासदार गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडून भाजपचा नगराध्यक्ष केला होता.

त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये झालेले फोडाफोडीचे राजकारण तासगावचीच पुनरावृत्ती असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेच्या रिंगणात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.का आहे आत्मपरीक्षणाची गरज?  आमदार गट : आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव कवठेमहांकाळ-मधील आबा गट संपेल अशी चर्चा असतानादेखील आबा गटाचे अस्तित्व प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. किंबहुना अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत आबा गटाला घवघवीत यश मिळाले. मात्र निवडणुकीत एकनिष्ठ असणारे अनेक पदाधिकारी, पदावर गेल्यानंतर नाराजीचा सूर ओढून भाजपशी जवळीक करत असल्याचे चित्र वेळोवेळी दिसून येत आहे. त्यामुळेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आमदार गट किंबहुना रोहित पाटील यांना आहे.खासदार गट : राज्यात सत्तेत असताना आणि समोर तुल्यबळ विरोधक नसतानादेखील खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिकेची सत्ता काठावर मिळाली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत बहुमत मिळवण्यात अपयश आले. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीवर भिस्त ठेवणाऱ्या खासदार गटाला निवडणुकीच्या रिंगणात वर्चस्व सिद्ध करण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने आत्मपरीक्षणाची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRohit Patilरोहित पाटिल