शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

लग्नपत्रिकेच्या कागदात बियांचे रोपण : पत्रिकेचा लगदा करून वृक्षारोपण करण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:48 IST

मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्या बिया रुजविण्यात आल्या आहेत. यातून त्यांनी ‘सेव्ह पेपर सेव्ह ट्री’ असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पत्रिकेतील ...

ठळक मुद्देनवदाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम

मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्या बिया रुजविण्यात आल्या आहेत. यातून त्यांनी ‘सेव्ह पेपर सेव्ह ट्री’ असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पत्रिकेतील बीजाला अंकुर फुटून तुळस व फूलझाडांना हिरवीगार पालवी फुटणार आहे.

महे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले तेजस शंकर कांबळे यांचे शिक्षण एम. टेक्. झाले आहे, तर त्यांची नियोजित पत्नी काजल यांचे शिक्षण एम.एस्सी.पर्यंत झाले आहे. तेजस इस्लामपूरच्या आरआयटी. महाविद्यालयामध्ये, तर काजल न्यू लॉ कॉलेज (कोल्हापूर) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या दोघांचा विवाह रविवार दि. १३ मे रोजी होत आहे. या दोन विद्याविभूषित वधू-वरांच्या निसर्ग वाचविण्याच्या संकल्पनेतून ही बीजारोपण करणारी लग्नपत्रिका आकारास आली आहे.समाजाला चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने तेजस यांनी पुणे येथे संपर्क साधून कापूस, तुळस व फुलांच्या बियांचे मिश्रण करून हाताने बनविलेला कागद औरंगाबाद येथून मागविला व ही लग्नपत्रिका कोल्हापूर येथे छापून घेतली.

या पत्रिकेचा आकार १९ सेंटीमीटर आहे. लग्नानंतर निमंत्रण पत्रिकेचा कागद पाण्यात दोन दिवस भिजवून त्या कागदाचा लगदा माती टाकलेल्या कुंडीमध्ये घालावयाचा आहे. त्यास थोडे थोडे पाणी दिल्यानंतर त्या कुंडीमधून तुळस व फुलांचे रोपटे उगवणार आहे. पाच महिन्यात त्याचे झाडात रूपांतर होणार आहे. याबाबतची सर्व माहिती लग्नपत्रिकेत चित्रासह रेखाटली असून यामधून ‘पेपर वाचवा निसर्ग वाचवा’ हा संदेश मिळत आहे.निसर्ग वाढीचा हेतूविद्यार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानाचे धडे देणाऱ्या तेजस व काजल यांची, लग्नपत्रिकेच्या कागदापासून निसर्गाची वाढ करण्याच्या हेतूने बीजांच्या निर्मितीची संकल्पना समाजाला नवीन दिशा दाखविणारी ठरत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न