शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

क्रांतिकारकांनी रेल्वे पाडल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण चार जणांनी केली होती कामगिरी फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:34 IST

महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता.

ठळक मुद्देब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात उसळला होता असंतोषबिसूर ओढ्याजवळील घटनेच्या आठवणी ताज्या...

शीतल पाटील ।सांगली : महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. वसंतदादा पाटील यांनी १४ साथीदारांसह सांगलीचा तुरूंग फोडला. त्यानंतर वर्षभराने म्हणजे ७ सप्टेंबर १९४३ रोजी सांगलीच्या चार क्रांतिकारकांनी बिसूर ओढ्याजवळ मालगाडी पाडली. आज, शुक्रवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

तत्कालीन सातारा जिल्हा स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिला होता. तेव्हाच्या दक्षिण सातारा म्हणजे आताच्या सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, आर. पी. पाटील, वि. स. पागे अशा हजारो क्रांतिकारकांनी या लढ्यात सहभाग घेतला. कधी तुरूंगवास, तर कधी भूमिगत राहून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली होती. वसंतदादा पाटील यांनी सांगलीचा तुरूंग फोडला. दादा व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी इंग्रज पोलिसांनी गोळीबारही केला. त्यावेळी दोघेजण हुतात्मा झाले. या घटनेनंतर सांगलीत इंग्रजांच्या राजवटीविरोधात असंतोष आणखी वाढला. त्यात महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिल्याने स्वातंत्र्यसैनिक पेटून उठले. सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करीत होते. दूरध्वनी यंत्रणेच्या तारा तोडून सरकारचा संपर्क तोडण्यात येत होता. चावड्या, सरकारी कार्यालये जाळली जात होती.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्रीसरकारच्या माध्यमातून इंग्रजांवर दहशत निर्माण केली होती. मोर्चे, आंदोलने सुरूच होती. याच काळात सांगलीत रेल्वे पाडण्यासाठी पाच जणांची बैठक झाली. सध्याच्या कापडपेठेतील पवार ड्रेसेस या दुकानात नाना जोशी, गणपती पवार, देवाप्पा खोत, धोंडीरामबापू माळी, शामगौंडा पाटील या पाचजणांनी रेल्वे पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला.मालगाडीचा चालक ठारसांगली-पुणे मार्गावरील बिसूर ओढ्याजवळ रेल्वेचा रूळ उखडण्याचे नियोजन करण्यात आले. पण त्यासाठी साहित्य कोठून आणायचे, असा प्रश्न होता. देवाप्पा खोत येथील गजानन मिलमध्ये कामाला होते. त्यांनी मिलमधून पाना आणण्याची जबाबदारी उचलली. ७ सप्टेंबर १९४३ रोजी धोंडीरामबापू माळी, गणपती पवार, देवाप्पा खोत, शामगोंडा पाटील बिसूर ओढ्याजवळ आले. त्यांनी रेल्वेचा रूळ उखडून टाकला. यावेळी प्रवासी रेल्वे एका स्टेशनवर थांबल्याने मालगाडी पुढे आली. बिसूर ओढ्याजवळ ही मालगाडी उलटली. यात मालगाडीचा चालक नंदपाल ठार झाला.दोघांना अटक, दोघे भूमिगतरेल्वे पाडल्याने इंग्रज पोलिसांनी या क्रांतिकारकांचा शोध सुरू केला. गणपती पवार यांच्या दुकानासमोर तीन दिवस पहारा ठेवला होता. पवार यांच्या दुकानात धोंडीरामबापू, शामगौंडा पाटील येत होते. तीन दिवसानंतर गणपती पवार व शामगौंडा पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. धोंडीरामबापू माळी व देवाप्पा खोत भूमिगत झाले. माळी व खोत यांना पकडून देणाऱ्यास ब्रिटिश सरकारने ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. पण हे दोघेही दोन वर्षे भूमिगत होते. त्यानंतर त्यांना मिरज येथे अटक करण्यात आली. आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे