शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

क्रांतिकारकांनी रेल्वे पाडल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण चार जणांनी केली होती कामगिरी फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:34 IST

महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता.

ठळक मुद्देब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात उसळला होता असंतोषबिसूर ओढ्याजवळील घटनेच्या आठवणी ताज्या...

शीतल पाटील ।सांगली : महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. वसंतदादा पाटील यांनी १४ साथीदारांसह सांगलीचा तुरूंग फोडला. त्यानंतर वर्षभराने म्हणजे ७ सप्टेंबर १९४३ रोजी सांगलीच्या चार क्रांतिकारकांनी बिसूर ओढ्याजवळ मालगाडी पाडली. आज, शुक्रवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

तत्कालीन सातारा जिल्हा स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिला होता. तेव्हाच्या दक्षिण सातारा म्हणजे आताच्या सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, आर. पी. पाटील, वि. स. पागे अशा हजारो क्रांतिकारकांनी या लढ्यात सहभाग घेतला. कधी तुरूंगवास, तर कधी भूमिगत राहून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली होती. वसंतदादा पाटील यांनी सांगलीचा तुरूंग फोडला. दादा व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी इंग्रज पोलिसांनी गोळीबारही केला. त्यावेळी दोघेजण हुतात्मा झाले. या घटनेनंतर सांगलीत इंग्रजांच्या राजवटीविरोधात असंतोष आणखी वाढला. त्यात महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिल्याने स्वातंत्र्यसैनिक पेटून उठले. सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करीत होते. दूरध्वनी यंत्रणेच्या तारा तोडून सरकारचा संपर्क तोडण्यात येत होता. चावड्या, सरकारी कार्यालये जाळली जात होती.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्रीसरकारच्या माध्यमातून इंग्रजांवर दहशत निर्माण केली होती. मोर्चे, आंदोलने सुरूच होती. याच काळात सांगलीत रेल्वे पाडण्यासाठी पाच जणांची बैठक झाली. सध्याच्या कापडपेठेतील पवार ड्रेसेस या दुकानात नाना जोशी, गणपती पवार, देवाप्पा खोत, धोंडीरामबापू माळी, शामगौंडा पाटील या पाचजणांनी रेल्वे पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला.मालगाडीचा चालक ठारसांगली-पुणे मार्गावरील बिसूर ओढ्याजवळ रेल्वेचा रूळ उखडण्याचे नियोजन करण्यात आले. पण त्यासाठी साहित्य कोठून आणायचे, असा प्रश्न होता. देवाप्पा खोत येथील गजानन मिलमध्ये कामाला होते. त्यांनी मिलमधून पाना आणण्याची जबाबदारी उचलली. ७ सप्टेंबर १९४३ रोजी धोंडीरामबापू माळी, गणपती पवार, देवाप्पा खोत, शामगोंडा पाटील बिसूर ओढ्याजवळ आले. त्यांनी रेल्वेचा रूळ उखडून टाकला. यावेळी प्रवासी रेल्वे एका स्टेशनवर थांबल्याने मालगाडी पुढे आली. बिसूर ओढ्याजवळ ही मालगाडी उलटली. यात मालगाडीचा चालक नंदपाल ठार झाला.दोघांना अटक, दोघे भूमिगतरेल्वे पाडल्याने इंग्रज पोलिसांनी या क्रांतिकारकांचा शोध सुरू केला. गणपती पवार यांच्या दुकानासमोर तीन दिवस पहारा ठेवला होता. पवार यांच्या दुकानात धोंडीरामबापू, शामगौंडा पाटील येत होते. तीन दिवसानंतर गणपती पवार व शामगौंडा पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. धोंडीरामबापू माळी व देवाप्पा खोत भूमिगत झाले. माळी व खोत यांना पकडून देणाऱ्यास ब्रिटिश सरकारने ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. पण हे दोघेही दोन वर्षे भूमिगत होते. त्यानंतर त्यांना मिरज येथे अटक करण्यात आली. आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे