शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

महाविकास आघाडीच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:27 PM

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते हरवलेशेतकऱ्यांना कसलाही फायदा नाही

अशोक पाटील इस्लामपूर : तत्कालीन भाजप, शिवसेना युतीच्या राज्यात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, परंतु याचा कसलाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत.इस्लामपूर शहरातील यल्लम्मा चौक येथे झालेल्या भाजपच्या सभेत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामील व्हावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला होता.

त्यानंतर भाजपच्याच ताकदीवर त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यात आले. विशेष म्हणजे कृषी राज्यमंत्रीपद मिळाल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार, असेच वाटत होते. परंतु तसे काहीच घडले नाही. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला यश मिळाले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ताही आली. परंतु महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. येथेही भाजप-शिवसेनेची सत्ता येता येता तो मान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळाला. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालेले सदाभाऊ खोत आता विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनच राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका-टिप्पणी करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही राहिले नाही.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नाराज झालेले राजू शेट्टी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे ऊस परिषद घेतली. यावेळच्या परिषदेला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. त्याची साखरसम्राटांसह ऊस उत्पादकांत चर्चाही झाली नाही.

याचे एकमेव कारण म्हणजे राजू शेट्टी हे साखरसम्राटांच्या बरोबरीने बसलेले शेतकऱ्यांना रुचलेले नाही. हेच मोठे कारण त्यांच्या पराभवासही कारणीभूत ठरले आहे. आता तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणाला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याकडे केली आहे.एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेट्टी आणि खोत यांची जोडी आता सत्तेच्या सारीपाटाच्या खेळात गुंतली आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या गोळाबेरजेत हे नेते शेतकऱ्यांपासून दुरावलेत, हे नक्की.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली