शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक महामार्गांसाठी एकरी दोन कोटी भरपाई द्या, शेतकरी आक्रमक 

By संतोष भिसे | Updated: December 18, 2023 14:04 IST

'हे' आहेत सध्याचे प्रमुख महामार्ग

संतोष भिसे

सांगली : व्यावसायिक महामार्गांसाठी जमिनी घेताना दोन कोटी रुपये प्रतिएकर भरपाईसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, आदी महापालिका क्षेत्रात चार कोटी रुपये भरपाईची मागणी केली जात आहे.राज्यभरातील विविध महामार्गांमध्ये शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर यासाठी मोर्चाही काढला. जमिनीला बिगरशेती दराने प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये भाव देण्याची मागणी केली. राजन क्षीरसागर, दिगंबर कांबळे, राजाभाऊ चोरगे, बाळासाहेब मोरे, नारायण विभूते, आदी आंदोलकांनी सरकारसोबत तीव्र संघर्षाचा इशारा दिला.राज्यात सध्या व्यावसायिक महामार्गांचे अनेक प्रकल्प राज्य व केंद्र शासनाच्या पुढाकाराने सुरू आहेत. त्यामध्ये काॅर्पोरेट, खासगी विकसक आणि देशी-विदेशी वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. व्यावसायिक महामार्ग असलेल्या या प्रकल्पांतून काॅर्पोरेट क्षेत्रासाठी विकसित जमिनी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या परताव्यासाठी पथकर आकारणी व अन्य उत्पन्नाचे स्रोत फायदेशीर व व्यावसायिक तत्त्वावर आखण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.त्यांनी सांगितले की, प्रती किलोमीटर सुमारे ७५ कोटी रुपये बांधकाम खर्च असणाऱ्या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या जात आहेत. चालू बाजारभावापेक्षाही अत्यल्प दर देण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने ६ ऑक्टोबर २०२१ व १४ जानेवारी २०२२ रोजीच्या निर्णयाद्वारे भूसंपादनासाठीच्या भरपाईत मोठ्या प्रमाणावर कपात केली. जमिनींचे मूल्यांकनही विसंगत केले. हे महामार्ग व्यावसायिक असतानाही भूसंपादनासाठी सार्वजनिक प्रयोजन दाखविले जात आहे. सरकार स्वत:च बेकायदेशीर व्यवहार करीत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनही दंडेलशाहीची भाषा करीत आहे. पोलिसी बळावर जमिनी ताब्यात घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने अत्यल्प मोबदला मंजूर केल्याने ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी मूल्यांकन नोटिसा स्वीकारलेल्या नाहीत.राज्यभरात विविध महामार्गांसाठी राजन क्षीरसागर, तुकाराम भस्मे, बाळासाहेब माेरे, ओम पाटील, गाेविंद घाटूळ, सुधीर देशमुख, प्रल्हाद चौधरी, दासराव हंबर्डे, आदी शासनासोबत संघर्ष करीत आहेत.

हे आहेत सध्याचे प्रमुख महामार्गजालना-नांदेड समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग, पुणे बाह्यवळण रस्ता, पुणे-बंगळुरू हरित महामार्ग, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हे प्रकल्प सध्या राज्यभरात आकाराला येत आहेत. त्यासाठी कवडीमोल भावाने जमिनी देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ग्रामीणला दोन कोटी, शहरी भागात चार कोटी द्या

शेतकऱ्यांनी सांगितले की, शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा. ग्रामिण भागात व्यावसायिक व बिगरशेती दराने किमान दोन कोटी रुपये प्रती एकर मोबदला द्यावा. पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड, आदी महापालिका प्रभाव क्षेत्रात किमान चार कोटी रुपये द्यावेत.

महामार्गाची उपउत्पादने वाढलीमहामार्गावर पथकर आकारणीतून गुंतवणूक वसूल होते. त्याशिवाय रस्त्याकडेला खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या फायबर केबलसाठी परवाना शुल्क, गॅस वाहिन्या, हॉटेल्स व अन्य व्यापारी आस्थापनांसाठी जमिनींची विक्री यातूनही सरकारला उत्पन्न मिळते. यामुळे महामार्गाची उपउत्पादने गेल्या काही वर्षांत वाढली आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी