शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा, आता ‘वरुण राजा’चीच आस 

By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2024 18:03 IST

कोयनेत २५.४५ टक्के, तर वारणेत ३५.१८ टक्के पाणी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील ८३ पैकी ४४ छोटे-मोठे तलाव कोरडे पडले असून, उर्वरित तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सांगली जिल्ह्याची टंचाईमध्ये तहान भागविणाऱ्या कोयना धरणात २५.४५ टक्के, तर वारणा धरणात ३५.१८ टक्के पाणी आहे. आता वरुण राजा वेळेवर बरसला, तरच या पाणीटंचाईतून दुष्काळग्रस्तांची सुटका होणार आहे.जिल्ह्यात २०२३ च्या हंगामात पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला. काही ठिकाणी सरासरी, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पुरेसा पाऊस झाला नसल्याने तलाव, धरणातही अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यात पिकांना काही पाणी सोडले होते. कोयना धरणात २६.७९ टीएमसी, म्हणजे २५.४५ टक्के, तर वारणा धरणात १२.०९ टीएमसी, म्हणजे ३५.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आता धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनचा वेगही वाढला आहे. दररोज पाणीसाठा खालावत चालला आहे. अनेक जलसाठे कोरडे पडत आहेत.जिल्ह्यात मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १ हजार ७६० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या केवळ ६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ४ टक्केच आहे. छोट्या पाझर तलावांची ७८ संख्या असून, त्याची सहा हजार १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ९८३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो १६ टक्के आहे.

२५ तलाव कोरडे १९ तलावांत मृत पाणीसाठाजिल्ह्यातील ८३ पाझर तलावांपैकी २५ तलाव कोरडे ठणठणीत असून, १९ तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. आठ तलावांमध्ये २५ टक्क्यांवर पाणी असून, एका तलावामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. ७५ टक्के पाणीसाठा खानापूर, कडेगाव, शिराळा तालुक्यांतील प्रत्येकी एका तलावाचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील दोन तलाव टेंभू योजनेच्या पाण्यातून पूर्ण भरलेले आहेत.

जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठातालुका - तलाव संख्या - पाण्याची टक्केवारीतासगाव - ७  - १खानापूर - ८ - १६कडेगाव - ७  - ३६शिराळा - ५  - १६आटपाडी - १३ - ३३जत - २७ - ०३क. महांकाळ - ११ - १२वाळवा - ३  - १३मिरज - २ - १०एकूण - ८३ - १३

गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी पाणीसाठाजिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये १५ मे २०२३ रोजी एक हजार ९२९.७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. टक्केवारीत म्हटले, तर २५ टक्के होता. यावर्षी १५ मे २०२४ रोजी एक हजार ४५.३५ घनफूट पाणीसाठा असून, तो १३ टक्के आहे. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास गतवर्षीपेक्षा यावर्षी चक्क १२ टक्के पाणीसाठा कमी आहे. मान्सून १५ जूनपर्यंत सांगली जिल्ह्यात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे, म्हणजे महिनाभर पाणी पुरेल, असे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.

जिल्ह्यात टँकरचे शतक

जिल्ह्यातील जत, आटपाडी, शिराळा तालुक्यांतील ८४ गावे आणि ६२९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ९९ हजार २६४ लोकसंख्येला १०८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तसेच परिसरातील तलाव कोरडे पडल्यामुळे ३७ हजार ८१५ पशुधनालाही टँकरच्या पाण्याचाच आधार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ