शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

सांगली जिल्ह्यातील तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा, आता ‘वरुण राजा’चीच आस 

By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2024 18:03 IST

कोयनेत २५.४५ टक्के, तर वारणेत ३५.१८ टक्के पाणी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील ८३ पैकी ४४ छोटे-मोठे तलाव कोरडे पडले असून, उर्वरित तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सांगली जिल्ह्याची टंचाईमध्ये तहान भागविणाऱ्या कोयना धरणात २५.४५ टक्के, तर वारणा धरणात ३५.१८ टक्के पाणी आहे. आता वरुण राजा वेळेवर बरसला, तरच या पाणीटंचाईतून दुष्काळग्रस्तांची सुटका होणार आहे.जिल्ह्यात २०२३ च्या हंगामात पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला. काही ठिकाणी सरासरी, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पुरेसा पाऊस झाला नसल्याने तलाव, धरणातही अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यात पिकांना काही पाणी सोडले होते. कोयना धरणात २६.७९ टीएमसी, म्हणजे २५.४५ टक्के, तर वारणा धरणात १२.०९ टीएमसी, म्हणजे ३५.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आता धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनचा वेगही वाढला आहे. दररोज पाणीसाठा खालावत चालला आहे. अनेक जलसाठे कोरडे पडत आहेत.जिल्ह्यात मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १ हजार ७६० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या केवळ ६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ४ टक्केच आहे. छोट्या पाझर तलावांची ७८ संख्या असून, त्याची सहा हजार १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ९८३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो १६ टक्के आहे.

२५ तलाव कोरडे १९ तलावांत मृत पाणीसाठाजिल्ह्यातील ८३ पाझर तलावांपैकी २५ तलाव कोरडे ठणठणीत असून, १९ तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. आठ तलावांमध्ये २५ टक्क्यांवर पाणी असून, एका तलावामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. ७५ टक्के पाणीसाठा खानापूर, कडेगाव, शिराळा तालुक्यांतील प्रत्येकी एका तलावाचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील दोन तलाव टेंभू योजनेच्या पाण्यातून पूर्ण भरलेले आहेत.

जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठातालुका - तलाव संख्या - पाण्याची टक्केवारीतासगाव - ७  - १खानापूर - ८ - १६कडेगाव - ७  - ३६शिराळा - ५  - १६आटपाडी - १३ - ३३जत - २७ - ०३क. महांकाळ - ११ - १२वाळवा - ३  - १३मिरज - २ - १०एकूण - ८३ - १३

गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी पाणीसाठाजिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये १५ मे २०२३ रोजी एक हजार ९२९.७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. टक्केवारीत म्हटले, तर २५ टक्के होता. यावर्षी १५ मे २०२४ रोजी एक हजार ४५.३५ घनफूट पाणीसाठा असून, तो १३ टक्के आहे. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास गतवर्षीपेक्षा यावर्षी चक्क १२ टक्के पाणीसाठा कमी आहे. मान्सून १५ जूनपर्यंत सांगली जिल्ह्यात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे, म्हणजे महिनाभर पाणी पुरेल, असे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.

जिल्ह्यात टँकरचे शतक

जिल्ह्यातील जत, आटपाडी, शिराळा तालुक्यांतील ८४ गावे आणि ६२९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ९९ हजार २६४ लोकसंख्येला १०८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तसेच परिसरातील तलाव कोरडे पडल्यामुळे ३७ हजार ८१५ पशुधनालाही टँकरच्या पाण्याचाच आधार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ