शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:47 IST

दुचाकी वाहने बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरून बेभान धावणारी वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. नागज फाटा ते तानंग फाटा या महामार्गाच्या या टप्प्यात सध्या दररोज एक-दोन गंभीर अपघात होत आहेत. सरासरी आठवड्याला दोघा-तिघांचा बळी जात आहे.महामार्ग झाला, पण त्याची शिस्त पाळण्याची सवय वाहनचालकांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वन वे मधून वाहन दामटण्याने सर्वाधिक अपघात झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग वापरता पादचारी दुभाजकावरून जातात. दुचाकी वाहनेही बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात.काही दिवसांपूर्वी एक महाभाग पहारीने चक्क दुभाजक फोडताना दिसला. दुचाकीसाठी रस्ता बनविण्याचा त्याचा प्रयत्न होत. १०० टक्के महामार्ग अधिकृतरीत्या सुरु झाला नसल्याने पोलिसांची गस्तही पूर्ण क्षमतेने सुरु नाही. सध्या फक्त बोरगाव पथकर नाक्याजवळच पथक थांबल्याचे दिसते.

खरशिंग फाटा डेंजर झोनखरशिंग फाटा (महामार्ग लगतचा दंडोबाचा डोंगरपायथा) सध्या डेंजर झोन बनला आहे. तेथे तीव्र वळण आहे. महामार्गावर १०० च्या गतीने धावणारी वाहने या वळणावर नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर धडकतात. खरशिंगकडून महामार्गावर येणारी वाहनेही अचानकपणे भरधाव वाहनांसमोर अवतरतात. यामुळेही अपघात होत आहेत. पंढरपूरकडून येणारी वाहने खरशिंगच्या वाहनचालकांना दिसत नाहीत. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच फाट्यावर झाले आहेत.

दोन ठिकाणी स्पीडगणमहामार्गावर कमाल गती मर्यादा ८० किलोमीटर प्रति तास आहे. पण महामार्गाचे वारे कानात शिरलेले वाहन चालक १०० ते १२० च्या गतीने गाड्या दामटळतात. त्यांच्यावर नियंत्रणासाठी शिरढोण आणि भोसे जवळ स्पीडगण बसविल्या आहेत. गती मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाला टिपून दंडाची कारवाई तत्काळ होते. वाहनाच्या क्रमांकावरुन मालकाला अवघ्या पाचच मिनिटात दंडाचा संदेश मोबाइलवर जातो. दंडाची रक्कम सरासरी दोन हजार रुपये आहे.दररोजचे पथकर संकलन सव्वासात लाखावरमहामार्गावर वाहतूक आता चांगलीच वाढली आहे. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) पथकर नाक्यावर दररोजची वसुली सरासरी सात ते सव्वासात लाख रुपयांवर पोहोचली आहे. पुढे अनकढाळ, इंचगाव नाक्यांवर याहून अधिक संकलन होते. अंकली-मिरज-तानंग फाटा हा उर्वरित महामार्ग पूर्ण झाल्यावर वाहतूक आणखी वाढेल. त्याच्या बरोबरीने अपघातही वाढण्याची भीती आहे.

ही आहेत अपघातांची कारणे

  • वन वे मध्ये बिनधास्त घुसणे
  • महामार्ग खालील भुयारी मार्गात भन्नाट वेगाने गाड्या पळविणे
  • दुभाजकावरून रस्ता ओलांडणे
  • चुकीच्या ठिकाणी पार्किंग
  • बोरगाव टोलनाका परिसरही धोक्याचा बनला आहे.
टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात