शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:47 IST

दुचाकी वाहने बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरून बेभान धावणारी वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. नागज फाटा ते तानंग फाटा या महामार्गाच्या या टप्प्यात सध्या दररोज एक-दोन गंभीर अपघात होत आहेत. सरासरी आठवड्याला दोघा-तिघांचा बळी जात आहे.महामार्ग झाला, पण त्याची शिस्त पाळण्याची सवय वाहनचालकांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वन वे मधून वाहन दामटण्याने सर्वाधिक अपघात झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग वापरता पादचारी दुभाजकावरून जातात. दुचाकी वाहनेही बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात.काही दिवसांपूर्वी एक महाभाग पहारीने चक्क दुभाजक फोडताना दिसला. दुचाकीसाठी रस्ता बनविण्याचा त्याचा प्रयत्न होत. १०० टक्के महामार्ग अधिकृतरीत्या सुरु झाला नसल्याने पोलिसांची गस्तही पूर्ण क्षमतेने सुरु नाही. सध्या फक्त बोरगाव पथकर नाक्याजवळच पथक थांबल्याचे दिसते.

खरशिंग फाटा डेंजर झोनखरशिंग फाटा (महामार्ग लगतचा दंडोबाचा डोंगरपायथा) सध्या डेंजर झोन बनला आहे. तेथे तीव्र वळण आहे. महामार्गावर १०० च्या गतीने धावणारी वाहने या वळणावर नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर धडकतात. खरशिंगकडून महामार्गावर येणारी वाहनेही अचानकपणे भरधाव वाहनांसमोर अवतरतात. यामुळेही अपघात होत आहेत. पंढरपूरकडून येणारी वाहने खरशिंगच्या वाहनचालकांना दिसत नाहीत. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच फाट्यावर झाले आहेत.

दोन ठिकाणी स्पीडगणमहामार्गावर कमाल गती मर्यादा ८० किलोमीटर प्रति तास आहे. पण महामार्गाचे वारे कानात शिरलेले वाहन चालक १०० ते १२० च्या गतीने गाड्या दामटळतात. त्यांच्यावर नियंत्रणासाठी शिरढोण आणि भोसे जवळ स्पीडगण बसविल्या आहेत. गती मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाला टिपून दंडाची कारवाई तत्काळ होते. वाहनाच्या क्रमांकावरुन मालकाला अवघ्या पाचच मिनिटात दंडाचा संदेश मोबाइलवर जातो. दंडाची रक्कम सरासरी दोन हजार रुपये आहे.दररोजचे पथकर संकलन सव्वासात लाखावरमहामार्गावर वाहतूक आता चांगलीच वाढली आहे. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) पथकर नाक्यावर दररोजची वसुली सरासरी सात ते सव्वासात लाख रुपयांवर पोहोचली आहे. पुढे अनकढाळ, इंचगाव नाक्यांवर याहून अधिक संकलन होते. अंकली-मिरज-तानंग फाटा हा उर्वरित महामार्ग पूर्ण झाल्यावर वाहतूक आणखी वाढेल. त्याच्या बरोबरीने अपघातही वाढण्याची भीती आहे.

ही आहेत अपघातांची कारणे

  • वन वे मध्ये बिनधास्त घुसणे
  • महामार्ग खालील भुयारी मार्गात भन्नाट वेगाने गाड्या पळविणे
  • दुभाजकावरून रस्ता ओलांडणे
  • चुकीच्या ठिकाणी पार्किंग
  • बोरगाव टोलनाका परिसरही धोक्याचा बनला आहे.
टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात