शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:47 IST

दुचाकी वाहने बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरून बेभान धावणारी वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. नागज फाटा ते तानंग फाटा या महामार्गाच्या या टप्प्यात सध्या दररोज एक-दोन गंभीर अपघात होत आहेत. सरासरी आठवड्याला दोघा-तिघांचा बळी जात आहे.महामार्ग झाला, पण त्याची शिस्त पाळण्याची सवय वाहनचालकांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वन वे मधून वाहन दामटण्याने सर्वाधिक अपघात झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग वापरता पादचारी दुभाजकावरून जातात. दुचाकी वाहनेही बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात.काही दिवसांपूर्वी एक महाभाग पहारीने चक्क दुभाजक फोडताना दिसला. दुचाकीसाठी रस्ता बनविण्याचा त्याचा प्रयत्न होत. १०० टक्के महामार्ग अधिकृतरीत्या सुरु झाला नसल्याने पोलिसांची गस्तही पूर्ण क्षमतेने सुरु नाही. सध्या फक्त बोरगाव पथकर नाक्याजवळच पथक थांबल्याचे दिसते.

खरशिंग फाटा डेंजर झोनखरशिंग फाटा (महामार्ग लगतचा दंडोबाचा डोंगरपायथा) सध्या डेंजर झोन बनला आहे. तेथे तीव्र वळण आहे. महामार्गावर १०० च्या गतीने धावणारी वाहने या वळणावर नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर धडकतात. खरशिंगकडून महामार्गावर येणारी वाहनेही अचानकपणे भरधाव वाहनांसमोर अवतरतात. यामुळेही अपघात होत आहेत. पंढरपूरकडून येणारी वाहने खरशिंगच्या वाहनचालकांना दिसत नाहीत. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच फाट्यावर झाले आहेत.

दोन ठिकाणी स्पीडगणमहामार्गावर कमाल गती मर्यादा ८० किलोमीटर प्रति तास आहे. पण महामार्गाचे वारे कानात शिरलेले वाहन चालक १०० ते १२० च्या गतीने गाड्या दामटळतात. त्यांच्यावर नियंत्रणासाठी शिरढोण आणि भोसे जवळ स्पीडगण बसविल्या आहेत. गती मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाला टिपून दंडाची कारवाई तत्काळ होते. वाहनाच्या क्रमांकावरुन मालकाला अवघ्या पाचच मिनिटात दंडाचा संदेश मोबाइलवर जातो. दंडाची रक्कम सरासरी दोन हजार रुपये आहे.दररोजचे पथकर संकलन सव्वासात लाखावरमहामार्गावर वाहतूक आता चांगलीच वाढली आहे. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) पथकर नाक्यावर दररोजची वसुली सरासरी सात ते सव्वासात लाख रुपयांवर पोहोचली आहे. पुढे अनकढाळ, इंचगाव नाक्यांवर याहून अधिक संकलन होते. अंकली-मिरज-तानंग फाटा हा उर्वरित महामार्ग पूर्ण झाल्यावर वाहतूक आणखी वाढेल. त्याच्या बरोबरीने अपघातही वाढण्याची भीती आहे.

ही आहेत अपघातांची कारणे

  • वन वे मध्ये बिनधास्त घुसणे
  • महामार्ग खालील भुयारी मार्गात भन्नाट वेगाने गाड्या पळविणे
  • दुभाजकावरून रस्ता ओलांडणे
  • चुकीच्या ठिकाणी पार्किंग
  • बोरगाव टोलनाका परिसरही धोक्याचा बनला आहे.
टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात