शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

..त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे शरद पवार ठरले पहिले बळी - प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:18 IST

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. ...

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. पण रत्नागिरीतील सभेत त्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे ते पहिले बळी ठरले आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. सोमनाथ साळुंखे, इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, नितीन सोनवणे, विज्ञान माने आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पवार यांनी जरांगे यांच्या मागणीला आतापर्यंत अत्यंत शिताफीने टाळले होते. पण रत्नागिरीतील सभेत त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे ते सध्या फक्त मराठा नेते राहिले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून फेब्रुवारीत निवडणुकांचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न होते, पण आम्ही त्यातील संविधानिक पेच सांगितला. त्यानुसार १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील...त्यामुळे विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाहीआंबेडकर म्हणाले, एससी, एसटी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील, असे वाटत नाही. मुस्लिम घटकही टक्केवारीच्या आधारे महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत आहे. त्याची पूर्तता झाली, तरच ते आघाडीच्या पाठीशी राहतील. लोकसभेत आमचा वापर झाल्याने विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

तर पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे यांचे आंदोलनमनोज जरांगेंमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यांची लवचिक भूमिका आता संपली आहे. सामान्य मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा फायदा होणार नाही. जरांगे यांची मागणी संविधानिक नाही. ५५ लाख कुणबी प्रमाणपत्रे बेकायदा आहेत, ती रद्द करावीत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नाही, तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर ते आंदोलन करीत होते, हे स्पष्ट होईल.

आंबेडकर म्हणाले..- सांगली, मिरजेच्या उमेदवारांची यादी तयार- मराठवाड्यात मराठा व ओबीसी लढत- विधानसभेला लोकसभेसारखे निकाल नसतील- अडीच महिन्यांत २२ ठिकाणी दंगलीची परिस्थिती

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरreservationआरक्षणSharad Pawarशरद पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील