शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

..त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे शरद पवार ठरले पहिले बळी - प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:18 IST

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. ...

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. पण रत्नागिरीतील सभेत त्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे ते पहिले बळी ठरले आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. सोमनाथ साळुंखे, इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, नितीन सोनवणे, विज्ञान माने आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पवार यांनी जरांगे यांच्या मागणीला आतापर्यंत अत्यंत शिताफीने टाळले होते. पण रत्नागिरीतील सभेत त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे ते सध्या फक्त मराठा नेते राहिले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून फेब्रुवारीत निवडणुकांचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न होते, पण आम्ही त्यातील संविधानिक पेच सांगितला. त्यानुसार १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील...त्यामुळे विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाहीआंबेडकर म्हणाले, एससी, एसटी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील, असे वाटत नाही. मुस्लिम घटकही टक्केवारीच्या आधारे महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत आहे. त्याची पूर्तता झाली, तरच ते आघाडीच्या पाठीशी राहतील. लोकसभेत आमचा वापर झाल्याने विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

तर पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे यांचे आंदोलनमनोज जरांगेंमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यांची लवचिक भूमिका आता संपली आहे. सामान्य मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा फायदा होणार नाही. जरांगे यांची मागणी संविधानिक नाही. ५५ लाख कुणबी प्रमाणपत्रे बेकायदा आहेत, ती रद्द करावीत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नाही, तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर ते आंदोलन करीत होते, हे स्पष्ट होईल.

आंबेडकर म्हणाले..- सांगली, मिरजेच्या उमेदवारांची यादी तयार- मराठवाड्यात मराठा व ओबीसी लढत- विधानसभेला लोकसभेसारखे निकाल नसतील- अडीच महिन्यांत २२ ठिकाणी दंगलीची परिस्थिती

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरreservationआरक्षणSharad Pawarशरद पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील