शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीचा प्रश्न राष्ट्रवादी विधिमंडळात मांडणार

By admin | Updated: July 10, 2017 04:04 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे. त्यावर तोडग्यासाठी राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि जमीन परत करण्याच्या मागणीवर राष्ट्रवादी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवेल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेवाळी पाडा, भाल आणि वसार या गावांना भेट दिली. पीडित शेतकऱ्यांसह महिलांची भेट घेतली. तेव्हा पवार यांच्यापेक्षा तटकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, गावातील संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीने उपचार उरकल्याची भावना
नेवाळी पाडा, वसार, भाल गावात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली. खोणी गावात नेते जाणार होते. पण पवार यांची गाडी पुढे निघून गेल्याने ही भेट रद्द झाली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवादही न साधल्याने या भेटीचा फक्त उपचार उरकला गेला. काहीही साध्य झाले नसल्याची भावना नेवाळी आंदोलन पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे आंदोलन २२ जूनला झाले आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आले, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना २० दिवसांनी आंदोलनकर्त्यांची आठवण झाली. स्थानिक नेत्यांनीही या काळत दुर्लक्ष केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठ फिरवल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
‘आमच्या माणसांना बाहेर काढा’
नेवाळी आंदोलनात अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. कर्ते पुरुष लॉकअपमध्ये आहेत. त्यांना मारहाण होते. फक्त महिला व मुलांना शेतीची कामे करता येत नाही. मुले शाळेत जात नाहीत. नेवाळी नाक्यावर भाजी घेण्यासाठीही कोणी गेले, तर त्याला पोलिस उचलून नेतात. पोलिसांची दहशत आहे. यावर काही तोडगा काढा, अशी मागणी गावातील महिलांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे केली. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेऊनही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
>आंदोलकांतही दुजाभाव
नेवाळी आंदोलनप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तीन व मानपाडा पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. ६७ जणांविरोधात कलमे सारखीच लावली होती. मानपाडा पोलीस ठाण्यातील २५ जणांना न्यायालयाने जामीन दिला. मात्र हिललाईन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांप्रकरणी अद्याप जामीन न मिळाल्याने आंदोलकांत दुजाभाव केल्याची कूरबूर नेवाळी परिसरातील ग्रामस्थांनी केली.