शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

सांगली: भिलवडीनंतर 'या' गावात ग्रामपंचायीकडून दररोज होतेय राष्ट्रगीत गायन, महाराष्ट्रातील पहिलेच गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 13:00 IST

देशप्रेमाचा हा अनोखा पायंडा सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे.

विनोद पाटीलशिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात जनगणमन या राष्ट्रगीताने होते. देशभक्ती जोपासण्याचा वसा तसेच गावातील शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आदर म्हणून ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित दि. १५ ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू आहे. गेले दोन महिने हा उपक्रम नियमित सुरू आहे.सकाळचे ११ वाजले की, सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक ऑडिओ सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. लोक असतील त्या जागीच उभे राहतात आणि राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय!’ असा जयघोष करून आपापले काम सुरू करतात. देशप्रेमाचा हा अनोखा पायंडा सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे.नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकीत होण्यासारखेच. मात्र, इथल्या ग्रामस्थांसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा व आपल्या रोमितला आदरांजली देण्याचा प्रयोग आहे. सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावातील नागरिकांमध्ये देशभक्तिचा उत्साह जागृत करण्याचे काम सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत आहे.

जिल्ह्यातील भिलवडीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून व्यापारी संघटनेकडून नित्यनियमाने सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत गायले जाते. पण ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेत या उपक्रमाचा रीतसर ठराव मंजूर करून राष्ट्रगीत गायले जाणारे शिगाव हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलेच गाव असेल. शिगावमध्ये हा अभिनव उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सदैव करणार आहोत. - उत्तम गावडे, सरपंच, शिगाव

टॅग्स :Sangliसांगली