शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

सुभाषनगर कृती समिती आक्रमक : चाळीस वर्षे वंचित

टाकळी : टाकळी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सुभाषनगरमधील ग्रामस्थांना गेल्या चाळीस वर्षांपासून मूलभूत सुविधा न देणाऱ्या टाकळी ग्रामपंचायतीचा सुभाषनगर येथे झालेल्या नागरी कृती समितीच्या बैठकीत निषेध करून भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे होते.टाकळी ग्रामपंचायत सदस्य गावच्या विकासापेक्षा स्वत:चाच विकास करीत आहेत. ‘आठ अ’चा उतारा हवा असेल, सातबारावर नोंदी घालायच्या असतील, तर वीस हजारांपासून तीस हजारांपर्यंत मागणी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. सत्तेचा वापर ग्रामस्थांच्या पिळवणुकीसाठीच केला जात आहे. सुभाषनगरचे ८ व टाकळीचे फक्त ५ सदस्य असूनही परिसराचा विकास करण्यात सुभाषनगरचे सदस्य अपयशी ठरले आहेत. टाकळी ग्रामपंचायतीस घरपट्टी व अन्य करातून सुभाषनगरातून जादा उत्पन्न मिळते. तरीही सुभाषनगरच्या ग्रामस्थांना टाकळी ग्रामपंचायत नागरी सुविधा देण्यास दुर्लक्ष करीत आहे. सुभाषनगरमध्ये रस्ते नाहीत, डांबरीकरण कधीही करण्यात आले नाही, मात्र कागदोपत्री लाखो रुपये खर्च डांबरीकरणासाठी दाखविण्यात आला आहे. सुभाषनगर येथे ग्रामसभा घेण्याची मागणी करूनही ग्रामसभा घेण्यात आली नाही. टाकळी ग्रामपंचायतीची निष्क्रियता व खाबूगिरीच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. शामराव कुलकर्णी, सुनील जाधव, एस. डी. जोशी, प्रकाश हंकारे, पांडुरंग यमगर, विजय कुंभार, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला लोंढे उपस्थित होते. (वार्ताहर)सुभाषनगर सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्षसुभाषनगरच्या नागरी समस्या जाणून घेण्यासाठी सुभाषनगरला ग्रामसभा घेण्याची मागणी मासिक सभेत केली होती; मात्र या मागणीकडे टाकळीच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सुभाषनगरच्या समस्यांबाबत वारंवार टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार सदस्य सुलेमान मुजावर, शोभा बंडगर, जयश्री माने, बंडू कुलाल, भीमा नंदीवाले, गौरी शिरसाट यांनी केली.