शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई गुजरातशी जोडण्याचा मोदींचा घाट

By admin | Updated: October 9, 2014 00:18 IST

जयंत पाटील : भाजपवर टीकास्त्र-- आमदारकीसाठी पक्षातून बाहेर पडले

सांगली : मुंबईवर गुजरातचा पहिल्यापासूनच डोळा होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासात्मक कामाऐवजी ते मुंबई गुजरातला जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू केली आहे. आता तर भाजपला स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता पाहिजे, ती केवळ महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच, अशी टीका माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादीलाच स्पष्ट बहुमत मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ते म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. या राजधानीवर नरेंद्र मोदींचा डोळा असल्यामुळेच त्यांनी देशाचा कारभार बाजूला ठेवून महाराष्ट्रात प्रचारासाठी तळ ठोकला आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, हेच कळत नाही. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांचा आहे. त्यांचा हा हेतू महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने धोक्याचा असल्यामुळे मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. महाराष्ट्रात अन्य पक्षांपेक्षा राष्ट्रवादीची शक्ती जास्त असल्यामुळे नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यांच्या टीकेने आम्हाला काही फरक पडत नाही. राज्यातील ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रवादीनेच सोडविले असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. जिल्ह्यातील पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावाही पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)आमदारकीसाठी पक्षातून बाहेर पडलेराष्ट्रवादीतून जे बाहेर पडले, ते केवळ स्वार्थासाठी आणि आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याचा त्यांना पश्चाताप होईल. पक्षातून नेते बाहेर पडले असले तरी, कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, अशी टीका त्यांनी दिनकर पाटील यांच्यावर केली.