शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आम्ही चालवत असल्याचा गैरसमज

By admin | Updated: September 1, 2015 22:22 IST

जयंत पाटील : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : जिल्ह्यातील भाजप आपण चालवित असल्याचा कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही. आम्ही आमचाच राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. दुष्काळी भागातील लोकांना खुल्या मनाने आणि सढळ हाताने मदत करण्याची राज्य सरकारची भावना नाही,असा आरोपही त्यांनी केला. आ़ पाटील यांनी जत तालुक्यातील डफळापूर, संख, उमदी, जत आदी दुष्काळी गावांचा दिवसभर दौरा केल्यानंतर सांगलीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सांगली जिल्ह्यातील भाजप आपण चालविता? असे खासगीत बोलले जाते. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, पक्षीय पातळीवर आम्ही आमचाच पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत. काहींच्याबरोबर व्यक्तिगत संबंध असू शकतात़ मात्र कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही़ पूर्वीच आमच्या पक्षातून काहीजण भाजपमध्ये गेले आहेत़ त्यात कोणाचा काय फायदा? मला माहीत नाही़ त्यानंतर कोणाच्या मदतीचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, राज्य शासनाने तातडीने यंत्रणा राबवून लोकांना मदत करण्याची गरज आहे़ मात्र तसे होताना दिसत नाहीत़ मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील आहेत़ त्यांची १०-१५ वर्षातील भाषणे पाहता, पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगविला जात असल्याच्या शंकेला वाव असल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)‘म्हैसाळ’चे पाणी द्या म्हैसाळ योजनेतून भोकरचौंडी, डोर्ली, अंकले, बसाप्पावाडी, कोकळे, बेळुंखी, शिंगणापूर, बिरनाळ आदी तलावात पाणी सोडावे, संख येथील निकृष्ट दर्जाच्या कोल्हापूर बंधाऱ्याची तातडीने दुरूस्ती करावी, बिरूळची उर्वरित कामे पूर्ण करून डफळापूर गावांना पाणी देण्यात यावी अशी कामे निवेदनात सूचवण्यात आली आहे.