शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

४९ वर्षांचा अखंड प्रवास, ११ मे १९७१ ला पहिल्यांदा धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:01 PM

कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.

ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पणपश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी

संतोष भिसे।सांगली : पश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने ११ मेरोजी अखंड प्रवासाची ४९ वर्षे पूर्ण केली. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या महालक्ष्मीचा सुवर्णमहोत्सवी प्रवास सुरू झाला आहे. प्रवाशांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि मध्य रेल्वेला अभिमानाची असणारी ‘महालक्ष्मी’ पश्चिम महाराष्ट्रासाठी जणू विकासवाहिनीच ठरली आहे.

मिरज-कोल्हापूर लोहमार्गाच्या ब्रॉडगेजनंतर ११ मे १९७१ रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली. त्यावेळी स्लिपरबर्थ नसल्याने प्रथम श्रेणीच्या डब्यातच बर्थवर झोपावे लागायचे. आसने लाकडाची आणि इंजिन कोळशाचे होते. कºहाड आणि वाठारमध्ये कोळसा व पाण्यासाठी थांबा घ्यावा लागायचा. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापुरातून निघून मुंबईत त्यावेळच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला दुसºयादिवशी दुपारी साडेबाराला पोहोचायची. कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.

ही गाडी हुबळी विभागाकडून मुंबईला ३०४ व परतताना ३०३ क्रमांकासह धावायची. कालांतराने क्रमांक ७४११ व ७४१२, १०११ आणि १०१२ झाले. सध्या १७४११ व १७४१२ असा या एक्स्प्रेसचा क्रमांक आहे. सत्तरच्या दशकात बेंगलोरहून थेट मुंबईला पुरेशा गाड्या नव्हत्या. कर्नाटकातील प्रवासी हुबळी-मिरज पॅसेंजरने मिरजेत येऊन पुढे महालक्ष्मीमधून मुंबईला जायचे.

कोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. महालक्ष्मीने मुंबईला जाणे हा जणू विमानप्रवासाचा अनुभव असे. काळ बदलला तरी महालक्ष्मीची ‘क्रेझ’ कायम आहे. बाराही महिने तिचे आरक्षण फुल्ल असते. अत्यंत किरकोळ दुर्घटनांचा अपवाद करता ती अखंड धावत आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न महालक्ष्मी एक्स्प्रेसने रेल्वेला मिळवून दिले आहे.

महालक्ष्मी-तिरुपतीचा भावनिक बंधमहालक्ष्मी एक्स्प्रेसला हरिप्रियाचे कनेक्शन दिल्याने महालक्ष्मी-बालाजीचा भावनिक बंधही तयार झाला आहे. मुंबईहून येणारी महालक्ष्मी दुपारी हरिप्रिया एक्स्प्रेस म्हणून तिरुपतीला निघते.

वायंगणीची दुर्घटनागतवर्षी २७ जुलै २०१९ रोजी बदलापूरजवळ वायंगणी येथे उल्हास नदीच्या महापुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली होती. हवाई दलाच्या मदतीने आॅपरेशन महालक्ष्मी राबविण्यात आले. महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इतिहासात ही दुर्घटना कधीही न विसरण्यासारखी आहे.

कोट्यवधींचे उत्पन्न दिलेकोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. ठरली आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले आहे.

उद्घाटन : ११ मे १९७१प्रवास : ५१८ कि.मी.वेळ : १०.५७ तासक्रमांक : १७४११, येताना १८ थांबेक्रमांक : १७४१२, जाताना १९ थांबेसरासरी गती : ४७.३८ कि.मी./प्रति तासकमाल गती : ११० कि.मी./प्रति तास

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय