शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शिराळा तालुक्यात वादळाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान-पंचनाम्यांबाबत उदासीनता-आंबे गळून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 1:14 PM

शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले

ठळक मुद्दे प्रशासनाकडून  नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची शेतकºयांकडून मागणी 

शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेला २४ तास उलटून गेले तरी पंचनामे केले नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. पंचनामे लवकर करावेत, अशी मागणी आंबा -झेंडू बागायतदार शेतकºयांनी केली आहे.

कापरी (ता. शिराळा) येथील आनंदा शंकर पाटील, विलास जगन्नाथ पाटील, जयसिंग केशव पाटील या तिघांची चार एकर आंबा बाग, तर रिळे (ता. शिराळा) येथील महादेव मारूती मस्के तीन एकर, रामचंद्र ईश्वरा पाटील यांची दीड एकर, लक्ष्मण बंडू पाटील यांची साडेपाच एकर, तुकाराम चंद्रू पाटील यांची एक एकर, बाळू चंद्रू पाटील यांची एक एकर, बळीराम नामदेव कुंभार यांची एक एकर, राजाराम पांडुरंग पाटील, वसंत ज्ञानू पाटील व खेड (ता. शिराळा) येथील दगडू शंकर नाईक, भास्कर निवृत्ती पाटील, विष्णू नाना पाटील, रंगराव नाना पाटील, शंकर नाना पाटील, पंडित पांडुरंग पाटील, मानसिंग पांडुरंग पाटील, शिराळा येथील फिरोज गौस मुल्ला व भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील पांडुरंग तुकाराम माने यांची ३० गुंठे आदींसह शेतकºयांच्या जवळपास ३० एकरामधील आंब्याचे नुकसान झाले. 

खेड (ता. शिराळा) येथील महादेव तुकाराम माळी यांच्या तोड चालू झालेल्या काकडीच्या जवळपास दीड एकरातील शेतीतील काकडीचे वेल गारांमुळे तुटल्याने दीड लाखाचे, तर अशोक आत्माराम माळी यांच्या एक एकरातील झेंडूच्या बागेचे जवळपास एक लाखाचे, आबासाहेब शंकर खबाले व विकास वसंत खबाले यांच्या काढावयास आलेल्या मका पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर येथील जयसिंग बाळू माळी यांच्या घराचा पत्रा उडून गेल्याने जवळपास ४० हजाराचे, तर बिऊर (ता. शिराळा) येथील गणपती मारुती पाटील यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्यामुळे व सिमेंटचा पत्रा फुटल्यामुळे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीkonkanकोकण