शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

'भाजपच्या सुजाण नगरसेवकांमुळे महापालिकेत आघाडीची सत्ता'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 13:47 IST

प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला.

सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेने भाजपला बहुमताने सत्ता दिली, पण त्यांची सत्ता जनतेच्या उपयोगी नव्हती. त्यामुळेच काँग्रेस व भाजपमधील सुजाण नगरसेवकांमुळे आघाडीची सत्ता आली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केले. प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला.

महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, शेखर माने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मयूर पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, हारुण शिकलगार यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. मदनभाऊ पाटील यांनाही कायम साथ दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण सतत राजकीय विचार करणाऱ्यांमुळे बिनविरोध झाली नाही.

महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत. रस्ते, रुग्णालयांच्या सुधारणा होत आहेत. तौफिक याच्यारूपाने तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यरत आहेत. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या प्रभागाच्या विकासासाठी सर्व नेते, महापौर लक्ष देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जातीयवादी शक्ती रोखा

विश्वजित कदम म्हणाले की, हारूण शिकलगार यांनी २५ वर्षे वाॅर्डाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविल्या. त्यांच्या अकाली निधनानंतर तौफिकला काम करण्याची संधी द्या. ही निवडणूक जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. काहीजण निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडू नका, असे आवाहनही केले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा