शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवा, वानरांच्या त्रासाला कंटाळून वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 13:37 IST

environment Tree Shirla Sangli :  सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या , ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे .

ठळक मुद्देवानरांच्या त्रासाला कंटाळून शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडशेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवण्यासाठी आवाहन

विकास शहाशिराळा सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या, ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे.प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वतीने सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे .केल्यानंतर व शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असे आढळून येते की , शेतीच्या बांधावर असणारी मोठी झाडे तोडल्यानंतर वानरांचा त्रास कमी होईल , असे शेतकऱ्यांचे मत आहे . त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बांधावरची आणि ओढया शेजारील मोठी झाडे विचार न करता तोडली आहेत. वानरांचे शेतीवरील हल्ले कमी होण्यापेक्षा अधिक वाढले आहेत. वानरांना उपलब्ध होणारे नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळे आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास संपल्यामुळे वानरे जास्त प्रमाणात शेतीकडे आकर्षित होत आहेत .या संदर्भात संस्थेने एक उदाहरण दिले आहे. समजा एखाद्या गावातील १०० झाडे आहेत . त्यामधील काही शेतकऱ्यांनी ७० झाडे तोडली , तर उर्वरित ३० झाडांवर वानरे जास्त प्रमाणात आढळतात . ज्यांच्या मालकीची ही उरलेली तीस झाडे असतील ज्यांच्या मालकीची ही उरलेली तीस झाडे असतील त्यांना वानरांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो , त्यामुळे उरलेली तीस झाडे सुद्धा तोडली जात आहेत .

या प्रकारामुळे गावात असलेली सर्व झाडे नष्ट होत आहेत . तसेच माणूस आणि वानर यांच्यातील संघर्षाचे दृष्टचक्र वृक्षतोड करून थांबल्याचे दिसत नाही . महत्वाच म्हणजे त्या झाडावरील नैसर्गिक जैवविविधता देखील नष्ट होत आहे . या होणाऱ्या वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने कडुलिंब , जांभूळ , करंज , निलगिरी , आंबा , वड , पिंपळ , उंबर , काटेसावर इत्यादी वृक्षांच्या तोडीचे प्रमाण जास्त आहे .आपल्या पूर्वजांनी बांधावर झाड का ठेवले होते याचा विचार करणे गरजेचे आहे . बांधावरील झाडावर असणाऱ्या मधमाश्या शेतीतील पिकांचे परागीभवन करतात , झाडावरील पक्षी शेतीवरील किडीचा नाश करतात , मोठी झाडे जमिनीची धूप थांबवतात , सुपीक माती टिकवून ठेवतात , उन्हाळ्यात शेतकऱ्याला बसण्यास सावली , फळे, लाकूड फाटा , आयुर्वेदिक औषधी उपयोग तसेच शेतीला आडोसा असे अनेक फायदे शेतीच्या बांधावरील मोठी झाडे करून देतात. पूर्वजांचे हे विचार नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजेत.

सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोनाचे उदाहरण लोकांनी लक्षात घ्यावे व जगभरात तापमान वाढीमुळे होणारी भीषण परिस्थिती सुधारण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून आपले बांधावरील झाड वाचवावे. शेतकऱ्यांनी व लाकूड तोड करणाऱ्या कंत्राटदारांनी तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबवावी व पर्यावरण समतोल साधण्यास मदत करावी.-प्रणव महाजन ,पर्यावरण अभ्यासक, उपाध्यक्ष, प्लॅनेट अर्थ फौंडेशन.

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगलीshirala-acशिराळा