शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवा, वानरांच्या त्रासाला कंटाळून वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 13:37 IST

environment Tree Shirla Sangli :  सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या , ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे .

ठळक मुद्देवानरांच्या त्रासाला कंटाळून शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडशेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवण्यासाठी आवाहन

विकास शहाशिराळा सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या, ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे.प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वतीने सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे .केल्यानंतर व शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असे आढळून येते की , शेतीच्या बांधावर असणारी मोठी झाडे तोडल्यानंतर वानरांचा त्रास कमी होईल , असे शेतकऱ्यांचे मत आहे . त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बांधावरची आणि ओढया शेजारील मोठी झाडे विचार न करता तोडली आहेत. वानरांचे शेतीवरील हल्ले कमी होण्यापेक्षा अधिक वाढले आहेत. वानरांना उपलब्ध होणारे नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळे आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास संपल्यामुळे वानरे जास्त प्रमाणात शेतीकडे आकर्षित होत आहेत .या संदर्भात संस्थेने एक उदाहरण दिले आहे. समजा एखाद्या गावातील १०० झाडे आहेत . त्यामधील काही शेतकऱ्यांनी ७० झाडे तोडली , तर उर्वरित ३० झाडांवर वानरे जास्त प्रमाणात आढळतात . ज्यांच्या मालकीची ही उरलेली तीस झाडे असतील ज्यांच्या मालकीची ही उरलेली तीस झाडे असतील त्यांना वानरांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो , त्यामुळे उरलेली तीस झाडे सुद्धा तोडली जात आहेत .

या प्रकारामुळे गावात असलेली सर्व झाडे नष्ट होत आहेत . तसेच माणूस आणि वानर यांच्यातील संघर्षाचे दृष्टचक्र वृक्षतोड करून थांबल्याचे दिसत नाही . महत्वाच म्हणजे त्या झाडावरील नैसर्गिक जैवविविधता देखील नष्ट होत आहे . या होणाऱ्या वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने कडुलिंब , जांभूळ , करंज , निलगिरी , आंबा , वड , पिंपळ , उंबर , काटेसावर इत्यादी वृक्षांच्या तोडीचे प्रमाण जास्त आहे .आपल्या पूर्वजांनी बांधावर झाड का ठेवले होते याचा विचार करणे गरजेचे आहे . बांधावरील झाडावर असणाऱ्या मधमाश्या शेतीतील पिकांचे परागीभवन करतात , झाडावरील पक्षी शेतीवरील किडीचा नाश करतात , मोठी झाडे जमिनीची धूप थांबवतात , सुपीक माती टिकवून ठेवतात , उन्हाळ्यात शेतकऱ्याला बसण्यास सावली , फळे, लाकूड फाटा , आयुर्वेदिक औषधी उपयोग तसेच शेतीला आडोसा असे अनेक फायदे शेतीच्या बांधावरील मोठी झाडे करून देतात. पूर्वजांचे हे विचार नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजेत.

सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोनाचे उदाहरण लोकांनी लक्षात घ्यावे व जगभरात तापमान वाढीमुळे होणारी भीषण परिस्थिती सुधारण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून आपले बांधावरील झाड वाचवावे. शेतकऱ्यांनी व लाकूड तोड करणाऱ्या कंत्राटदारांनी तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबवावी व पर्यावरण समतोल साधण्यास मदत करावी.-प्रणव महाजन ,पर्यावरण अभ्यासक, उपाध्यक्ष, प्लॅनेट अर्थ फौंडेशन.

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगलीshirala-acशिराळा