शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

ते मजूर अखेर बसने गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 7:40 PM

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन नाही. या मजुरांना घेऊन आलेले ठेकेदार यापूर्वीच निघून गेले.

ठळक मुद्देमिरज आगार व सांगली आगार च्या एस टी कर्मचाऱ्यांनी मदत केली

सांगली : छत्तीसगड येथील मजूर तीन ते चार आठवड्यापासून सर्व कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु गावाकडे कसे जायचे याचा मार्गच सापडत नसल्याने शेवटी सांगलीमधून त्यांच्या गावी चालत निघाले होते. त्याबाबत सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी या मजुरांची समजूत काढून त्यांना थांबायला सांगितले. चार दिवस सुधार समितीच्या टीम ने त्या सर्व मजुरांच्या कागदपत्रांची पूर्तता करून अखेर ११३ मजुरांना त्यांच्या परिवारासह एस टी महामंडळाच्या बसने गावाकडे काल रवाना केले.उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन नाही. या मजुरांना घेऊन आलेले ठेकेदार यापूर्वीच निघून गेले. ज्या ठिकाणी काम करत होते तेथे कसेबसे दोन महिने काढले. जेवणाची सोय होईना, ठेकेदार निघून गेल्याने कामाला कोठे जायचे हे समजेना. त्यात गावी असणाऱ्या घरच्यांनी लवकर परत या म्हणून सारखे निरोप द्यायला सुरुवात केली. परंतु गावी जायचे कसे हे त्यांना समजत नव्हते. त्यामुळे अखेर त्यांनी चालत गावी जाण्याचा निर्णय घेतला.त्याची माहिती मिळाल्यानंतर अ‍ॅड. अमित शिंदे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बसने जाण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. शिंदे यांना या मजुरांना एस टी ने गोंदिया जिल्ह्यापर्यंत छत्तीसगडसीमेपर्यंत सोडता येऊ शकते व तेथून छत्तीसगड शासन या मजूरांना त्यांच्या गावी पोहचवू शकते हे समजले.त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय व एस टी महामंडळाकडे संपर्क साधला.

तिथे व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना याची माहिती दिली व त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भेट घेतली. त्यांनी तहसीलदार यांना सूचना करून त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. सुधार समितीचे कार्यकर्ते तहसील कार्यलय सांगेल त्या कागदपत्रांची पूर्तता करत होते. परंतु जिल्हाधिकारी यांनी सांगून देखील दोन दिवस तहसीलदार कार्यालयात कोणी व्यवस्थित दखल घेत नव्हते. त्यामुळे अखेर तहसील कार्यालयात सर्वांना धारेवर धरून त्यांच्या कामाबद्दल जाब विचारल्यानंतर व मजुरांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर सूत्रे हलली व मजुरांना गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

काल या ११३ मजुर व त्यांच्या लहान मुलांना घेऊन चार एस टी गोंदीयकडे रवाना झाल्या.त्या मजुरांनी जाताना समाधान व्यक्त करत सुधार समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. सुधार समितीचे प्रशांत साळुंखे, अ‍ॅड. अरुणा शिंदे, महालिंग हेगडे, रोहित शिंदे, नितीन मोरे, निलेश मोरे, सुधिर भोसले, नितीन शिंदे, रविंद्र काळोखे, जयंत जाधव, सद्दाम खाटीक हे यासाठी चार दिवस झटत होते.या मजुरांच्या राहण्याची सोय मालू हायस्कूल येथे करण्यात आली होती. हॉटेल व्यावसायिक प्रविण शेट्टी यांनी देखील या मजुरांची जेवणाची सोय केली. प्रा.आर. बी. शिंदे यांनी सर्वांना वाटेत जाण्यासाठी पाण्याची सोय केली. हितेश ओंकार यांच्यामुळे कमी वेळेत सर्वांना पाणी उपलब्ध झाले. मिरज आगार व सांगली आगार च्या एस टी कर्मचाऱ्यांनी मदत केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी