शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर कृष्णाकाठी पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:54 IST

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत ...

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत असल्याने नदी काठावर पाणीचपाणी पहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी ही केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यात व राज्याच्या अनेक भागांत टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.  उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहीरी, ओढे, कॅनाल ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण व भटकंती करावी लागत आहे. माणसा बरोबर जनावरांच्या ही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे.काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागली आहेत. अशा भीषण परिस्थितीत उद्भवली असताना कृष्णा नदी काठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याच प्रकारची झळ बसताना दिसत नाही. हि बाब कृष्णा नदी काठावरील नागरिकांनी भाग्यशाली ठरत आहे. कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदी काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, ताकारी, बहे, तांबवे नरसिंहपूर, वाळवा, भिलवडी पर्यंतच्या भागात पाणीच पाणी आहे.

कृष्णाकाठावरील मुबलक पाण्यामुळे नदीकाठावरील जनता स्वत:लागली भाग्यशाली समजत आहे. अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा विनियोग व पाण्याची नासाडी चालल्याचे चित्र ही कृष्णा काठावर पाह्यला मिळत आहे. नागरिकांनी  पाणी टंचाई भागाची परिस्थिती डोळ्या समोर आणावी व पाण्याचा गैरवापर व नासाडी थांबवावी. - भागवत जाधव, अध्यक्ष वाळवा तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळriverनदीWaterपाणी