शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर कृष्णाकाठी पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:54 IST

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत ...

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत असल्याने नदी काठावर पाणीचपाणी पहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी ही केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यात व राज्याच्या अनेक भागांत टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.  उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहीरी, ओढे, कॅनाल ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण व भटकंती करावी लागत आहे. माणसा बरोबर जनावरांच्या ही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे.काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागली आहेत. अशा भीषण परिस्थितीत उद्भवली असताना कृष्णा नदी काठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याच प्रकारची झळ बसताना दिसत नाही. हि बाब कृष्णा नदी काठावरील नागरिकांनी भाग्यशाली ठरत आहे. कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदी काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, ताकारी, बहे, तांबवे नरसिंहपूर, वाळवा, भिलवडी पर्यंतच्या भागात पाणीच पाणी आहे.

कृष्णाकाठावरील मुबलक पाण्यामुळे नदीकाठावरील जनता स्वत:लागली भाग्यशाली समजत आहे. अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा विनियोग व पाण्याची नासाडी चालल्याचे चित्र ही कृष्णा काठावर पाह्यला मिळत आहे. नागरिकांनी  पाणी टंचाई भागाची परिस्थिती डोळ्या समोर आणावी व पाण्याचा गैरवापर व नासाडी थांबवावी. - भागवत जाधव, अध्यक्ष वाळवा तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळriverनदीWaterपाणी