शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

By अशोक डोंबाळे | Updated: January 27, 2024 17:05 IST

कुणाला खुश करण्यासाठी धरणातील पाणी रोखता, आंदोलकांचा सवाल

सांगली : कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सांगलीचेपाणी रोखत आहेत, असा आरोपही संतप्त आंदोलकांनी केला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असाही आरोप आंदोलकांनी केला.मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीनवेळा कृष्णा नदी कोरडी पडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरिक जागृती मंच आणि कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागिरकांनी कृष्णा नदीवरील सांगलीतील बंधाऱ्यावर शनिवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधीच्या जोरदार घोषणा दिल्या. जलसंपदा विभागाने जिल्ह्याचे हक्काचे पाणी कृष्णेत सोडून ती बारमाही वाहती ठेवावी, अशी मागणी केली. कृष्णा नदी कोरडी पडायचे कोणतेही कारण नाही.

मात्र, राज्याचा जलसंपदा आणि सांगली जलसंपदा विभाग जिल्ह्यावर अन्याय करीत आहे. कोणाला तरी खुश करण्यासाठी धरणातून पाणी सोडले जात नाही. सांगलीच्या हक्काचे पाणी अडवून ठेवून अन्याय करत आहेत. यापुढे सांगलीतील आणि जिल्ह्यातील नागरिक हा अन्याय सहन करणार नाहीत. जर पुन्हा नदी कोरडी पाडण्याचा खेळ झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला.नागरिक जागृती मंच जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण, डॉ. रवींद्र व्होरा, मनोज पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, माजी नगरसेवक हनमंतराव पवार, तानाजी सरगर, मोहन चोरमुले, संजय चव्हाण, अजितकुमार पाटील, अविनाश जाधव, उदय पाटील, जयराज बर्गे, गोपाळ मर्दा, अविनाश जाधव, अशोक माने, सतीश दुधाळ, गजानन साळुंखे, अण्णासाहेब शिंदे, संजय वाईंगडे, शीतल वानखंडे, डॉ. अशोक चव्हाण आदी आंदोलनात सहभागी होते.

सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ३४ टीएमसी पाणीकोयना धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ७१ टीएमसी असून विद्युत निर्मितीसाठी ४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी कृष्णा नदीसाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धोम, उरमोडी, तारळी धरणात १२ टीएमसी पाणी आहे. असे एकूण हक्काचे ३४ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याच्या हक्काचे उपलब्ध आहे. ते पूर्णपणे सोडल्यास येथून पुढे जून अखेरपर्यंत कृष्णा अखंडित वाहती राहू शकते, तरीही कृष्णा नदी कोरडी का पाडली जात आहे, असा संतप्त सवाल सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी