शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांची कामे रखडणार

By admin | Updated: June 17, 2016 23:24 IST

विदर्भाकडे स्थलांतर : ‘कृष्णा-कोयना’नंतर ‘ताकारी-म्हैसाळ’ची कार्यालये गुंडाळण्यात येणार

मिरज : कृष्णा खोरे विकास महामंडाळांतर्गत कृष्णा-कोयना उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यालय विदर्भात स्थलांतरित केल्यानंतर ‘ताकारी व म्हैसाळ’ची दोन मंडल कार्यालये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे स्थलांतरित होणार आहेत. यामुळे अपूर्ण असलेल्या ताकारी म्हैसाळ सिंचन योजनांना फटका बसणार असून कालवे व पोटकालव्यांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्यातील ३० मंडल कार्यालये बंद करण्यात येणार असून कृष्णा खोरे प्रकल्पाच्या ताकारी, म्हैसाळ योजनेची प्रत्येकी दोन मंडल कार्यालये असून, त्यापैकी बांधकाम कार्य प्रकारातील दोन मंडल कार्यालये बंद करून ती विदर्भात हलविण्याचा प्रस्ताव आहे. कृष्णा खोरे महामंडळांतर्गत टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असताना, येथील बांधकाम कार्यालये विदर्भात हलवून केवळ सिंचन व्यवस्थापन कार्यालये अस्तित्वात राहणार असल्याने सिंचन योजनांची अपूर्ण कामे थांबणार आहेत. जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार विदर्भात सिंचन व्यवस्थापनाची स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची फेररचना करण्यात येत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत दोन नवीन सिंचन व्यवस्थापन मंडळांच्या निर्मितीसाठी कृष्णा खोरे प्रकल्पाची बांधकाम कार्यालये गुंडाळण्यात येत आहेत. ताकारी, म्हैसाळ योजनेचे कालवे व पोटकालवे अपूर्ण असल्याने लाभक्षेत्रात पाणी पोहोचत नाही. परिणामी पाणीपट्टी वसुली होत नसल्याने या योजना अगोदरच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कृष्णा खोरे प्रकल्पाची बांधकाम कार्यालये बंद करण्यात येत असल्याने अपूर्ण कामे वर्षानुवर्षे रखडणार आहेत. कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ हे बांधकाम कार्य प्रकारातील मंडळ कार्यालय यवतमाळकडे वर्ग करून या कार्यालयाची आस्थापना सांगली पाटबंधारे मंडळाच्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे, कृष्णा खोरे प्रकल्पाच्या सिंचन योजनांच्या व्यवस्थापनासाठी पाटबंधारे मंडळावर ताण पडणार आहे. पाटबंधारे विभागाकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असताना, बंद करण्यात येणाऱ्या कार्यालयांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)बाराशे कोटींची कामे अद्याप अपूर्ण म्हैसाळ योजनेसाठी गेल्या १८ वर्षात सुमारे दोन हजार कोटी रूपये खर्च झाले असून अद्याप बाराशे कोटी रूपयांची कामे अपूर्ण आहेत. ताकारीसाठी सुमारे एक हजार कोटी खर्च झाले असून अद्याप चारशे कोटी रूपयांची कामे अपूर्ण आहेत. कालवे व पोटकालवे, कालव्यांचे अस्तरीकरण ही बांधकाम विभागाकडील कामे अपूर्ण असल्याने ताकारी म्हैसाळच्या लाभक्षेत्रापैकी केवळ ३० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.