शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर यावेळी कुणाचा झेंडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 12:14 IST

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये ते महाआघाडीचा प्रयोग करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्जुन कर्पेकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतचे बिगुल वाजले असून, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेस महाआघाडी चालणार की स्थानिक आघाड्या एकत्रित येणार याकडे तालुक्याचे लक्ष आता लागले आहे. सध्या नगरपंचायतीत स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता आहे.

मागील निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे आ. सुमन पाटील, अनिता सगरे, गजानन कोठावळेंनी स्वाभिमानी विकास आघाडी करुन निवडणूक लढविली होती. विरोधामध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी भूमिका बजावली होती. नगरपंचायतच्या सत्तेवर ही स्वाभिमानी आघाडी १७ पैकी १३ जागा जिंकत सत्तासिहासनावर आली होती. विरोधी संजयकाका पाटील गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते. या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी गेले. संजयकाका पाटील यांनी राजकीय चाली खेळत नगरसेवकांची संख्या सहावर पोहोचवली व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पद ही पदरात पाडून घेतले. सध्या घोरपडे गटाकडे नगराध्यक्ष पद आहे. उपनगराध्यक्ष पद हे अनिता सगरे गटाकडे आहे. कवठेमहांकाळ शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच सगरे गट व कोठावळे यांची वेगळी राजकीय चूल आहे. संजयकाका पाटील व भाजप यांचाही गट सक्रिय आहे. काँग्रेस ही एखाद्या प्रभागात आपले राजकीय कसब अाजमावणार आहे. शहराच्या राजकारणाचा विचार केला तर घोरपडे व सगरे हे राजकीय प्राबल्य असणारे दोन प्रमुख गट आहेत. सुमन पाटील यांची नगरपंचायतमधील राजकीय मदार ही अनिता सगरे आणि कोठावळे यांच्यावरच अवलंबून आहे. सध्या तरी कोठावळे आणि सगरे यांच्यामधून विस्तव जात नाही. कवठेमहांकाळ शहरात शिवसेना व आरपीआयकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. यांची मते ही काही प्रभागात निर्णायक ठरणार हे निश्चित आहेत.

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये ते महाआघाडीचा प्रयोग करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

घोरपडे, सगरे, संजयकाका गटांचे शर्थीचे प्रयत्न

कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या राजकीय युत्या ह्या स्थानिक पातळीवर न होता, या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठरवणार असे स्पष्ट चित्र आहे. यंदाची नगरपंचायत निवडणूक ही अनेक बाबींनी महत्त्वपूर्ण असून, या निवडणुकीचे परिणाम हे आगामी विधानसभेवर उमटणारे आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत आपलीच सत्ता आणण्यासाठी अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, भाजपचे संजयकाका पाटील प्रामुख्याने शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक