शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर यावेळी कुणाचा झेंडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 12:14 IST

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये ते महाआघाडीचा प्रयोग करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्जुन कर्पेकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतचे बिगुल वाजले असून, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेस महाआघाडी चालणार की स्थानिक आघाड्या एकत्रित येणार याकडे तालुक्याचे लक्ष आता लागले आहे. सध्या नगरपंचायतीत स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता आहे.

मागील निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे आ. सुमन पाटील, अनिता सगरे, गजानन कोठावळेंनी स्वाभिमानी विकास आघाडी करुन निवडणूक लढविली होती. विरोधामध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी भूमिका बजावली होती. नगरपंचायतच्या सत्तेवर ही स्वाभिमानी आघाडी १७ पैकी १३ जागा जिंकत सत्तासिहासनावर आली होती. विरोधी संजयकाका पाटील गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते. या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी गेले. संजयकाका पाटील यांनी राजकीय चाली खेळत नगरसेवकांची संख्या सहावर पोहोचवली व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पद ही पदरात पाडून घेतले. सध्या घोरपडे गटाकडे नगराध्यक्ष पद आहे. उपनगराध्यक्ष पद हे अनिता सगरे गटाकडे आहे. कवठेमहांकाळ शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच सगरे गट व कोठावळे यांची वेगळी राजकीय चूल आहे. संजयकाका पाटील व भाजप यांचाही गट सक्रिय आहे. काँग्रेस ही एखाद्या प्रभागात आपले राजकीय कसब अाजमावणार आहे. शहराच्या राजकारणाचा विचार केला तर घोरपडे व सगरे हे राजकीय प्राबल्य असणारे दोन प्रमुख गट आहेत. सुमन पाटील यांची नगरपंचायतमधील राजकीय मदार ही अनिता सगरे आणि कोठावळे यांच्यावरच अवलंबून आहे. सध्या तरी कोठावळे आणि सगरे यांच्यामधून विस्तव जात नाही. कवठेमहांकाळ शहरात शिवसेना व आरपीआयकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. यांची मते ही काही प्रभागात निर्णायक ठरणार हे निश्चित आहेत.

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये ते महाआघाडीचा प्रयोग करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

घोरपडे, सगरे, संजयकाका गटांचे शर्थीचे प्रयत्न

कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या राजकीय युत्या ह्या स्थानिक पातळीवर न होता, या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठरवणार असे स्पष्ट चित्र आहे. यंदाची नगरपंचायत निवडणूक ही अनेक बाबींनी महत्त्वपूर्ण असून, या निवडणुकीचे परिणाम हे आगामी विधानसभेवर उमटणारे आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत आपलीच सत्ता आणण्यासाठी अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, भाजपचे संजयकाका पाटील प्रामुख्याने शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक