शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

कलिंगड, पपई उत्पादक वेठीस

By admin | Updated: July 23, 2016 23:55 IST

नियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरण

कलिंगड, पपई उत्पादक वेठीसनियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरणदादा खोत ल्ल सलगरे राज्यभरात अडत्यांनी फळभाज्या नियमन मुक्तीविरोधात बंद पुकारला. यावर उपाययोजना म्हणून शासनाने शेतकऱ्यांना राज्यात व मुंबईतील विविध मंडईत थेट मालाची विक्री करण्यास परवानगी दिली. ‘शासनाच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभ’, अशा बातम्याही प्रसारमाध्यमातून दाखविण्यात आल्या. पण राज्यात पावसाचे वातावरण असताना, या पुकारलेल्या बंदचा आणि शासन निर्णयाचा फटका कलिंगड, पपई या पिकांना बसला आहे.राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असताना, मुंबईसारख्या मार्केटमध्ये आवक मर्यादित होती. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढल्यामुळे दरांची झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमनमुक्त बाजारपेठेचा अध्यादेश आणि व्यापाऱ्यांचा संप याचा सर्वाधिक फटका कलिंगड व पपई यासारख्या फळपिकांना बसला आहे.कलिंगड, पपईसारख्या पिकांचे हार्वेस्टिंग एकाच वेळेला होत असल्याने शेकडो टन माल बाजारात नेऊन मार्केटिंग करणे शेतकऱ्यांना शक्य होणे कठीण बनले आहे. मिरज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील पश्चिम भाग शिरोळ तालुक्यातील सर्वच भाजी उत्पादक व कलिंगड, पपई उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रमजानचा महिना लक्ष्य करून पपई, कलिंगड या पिकांच्या लागणी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. जूनपासून कलिंगडांचे मार्केट स्थिर होते. १४ ते १५ रुपये किलो असा सरासरी दर असल्याने शेतकरी आनंदित होते. परंतु ऐन रमजानच्या शेवटी शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे व मार्केटमधील गोंधळामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. बंद मिटल्यानंतर कलिंगडाचा दर ५ ते ६ रुपयांपर्यंत घसरला. शेतकऱ्यांनी माल पाठविलेल्या गाड्यांचे भाडे व उत्पादन खर्चही त्यातून निघणार नाही, अशी स्थिती आहे.पपई पिकाचीही हीच परिस्थिती आहे. मिरज पूर्व भागामध्ये बेळंकी, सलगरे, चाबुकस्वारवाडी या परिसरात कित्येक टन माल शेतामध्ये पडून आहे. मान्सूनचा अचानक वाढलेला पाऊस आणि शासनाची बाजारपेठ नियमनमुक्ती, व्यापाऱ्यांनी केलेले बंद आंदोलन अशा कात्रीत सापडल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. यामुळे कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मार्केटिंगची गरज : नुकसानीचे काय?शेतीमालाचे उत्पादन आणि व्यवस्थापन या प्रक्रियेमधून शेतकऱ्यांना मार्केटिंग करण्यास पुरेसा वेळ आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे भले होणार असले तरी, या परिस्थितीने फळपिकांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.सहा एकर कलिंगडाच्या लागवडीतून उत्पादन खर्च वजा जाता १२ लाख रुपये निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा असताना, बाजारपेठेतील गोंधळामुळे एक किलोही माल विकला नाही व एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. १७५ टन माल शेतात तसाच पडून आहे. याला जबाबदार कोण?- बसगौंडा गुंडेवाडी, कलिंगड उत्पादक, चाबुकस्वारवाडी