शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
2
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
5
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
6
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
7
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
8
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
9
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
10
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
11
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
12
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
13
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
14
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
15
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
16
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
17
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
18
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
19
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
20
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगड, पपई उत्पादक वेठीस

By admin | Updated: July 23, 2016 23:55 IST

नियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरण

कलिंगड, पपई उत्पादक वेठीसनियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरणदादा खोत ल्ल सलगरे राज्यभरात अडत्यांनी फळभाज्या नियमन मुक्तीविरोधात बंद पुकारला. यावर उपाययोजना म्हणून शासनाने शेतकऱ्यांना राज्यात व मुंबईतील विविध मंडईत थेट मालाची विक्री करण्यास परवानगी दिली. ‘शासनाच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभ’, अशा बातम्याही प्रसारमाध्यमातून दाखविण्यात आल्या. पण राज्यात पावसाचे वातावरण असताना, या पुकारलेल्या बंदचा आणि शासन निर्णयाचा फटका कलिंगड, पपई या पिकांना बसला आहे.राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असताना, मुंबईसारख्या मार्केटमध्ये आवक मर्यादित होती. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढल्यामुळे दरांची झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमनमुक्त बाजारपेठेचा अध्यादेश आणि व्यापाऱ्यांचा संप याचा सर्वाधिक फटका कलिंगड व पपई यासारख्या फळपिकांना बसला आहे.कलिंगड, पपईसारख्या पिकांचे हार्वेस्टिंग एकाच वेळेला होत असल्याने शेकडो टन माल बाजारात नेऊन मार्केटिंग करणे शेतकऱ्यांना शक्य होणे कठीण बनले आहे. मिरज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील पश्चिम भाग शिरोळ तालुक्यातील सर्वच भाजी उत्पादक व कलिंगड, पपई उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रमजानचा महिना लक्ष्य करून पपई, कलिंगड या पिकांच्या लागणी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. जूनपासून कलिंगडांचे मार्केट स्थिर होते. १४ ते १५ रुपये किलो असा सरासरी दर असल्याने शेतकरी आनंदित होते. परंतु ऐन रमजानच्या शेवटी शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे व मार्केटमधील गोंधळामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. बंद मिटल्यानंतर कलिंगडाचा दर ५ ते ६ रुपयांपर्यंत घसरला. शेतकऱ्यांनी माल पाठविलेल्या गाड्यांचे भाडे व उत्पादन खर्चही त्यातून निघणार नाही, अशी स्थिती आहे.पपई पिकाचीही हीच परिस्थिती आहे. मिरज पूर्व भागामध्ये बेळंकी, सलगरे, चाबुकस्वारवाडी या परिसरात कित्येक टन माल शेतामध्ये पडून आहे. मान्सूनचा अचानक वाढलेला पाऊस आणि शासनाची बाजारपेठ नियमनमुक्ती, व्यापाऱ्यांनी केलेले बंद आंदोलन अशा कात्रीत सापडल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. यामुळे कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मार्केटिंगची गरज : नुकसानीचे काय?शेतीमालाचे उत्पादन आणि व्यवस्थापन या प्रक्रियेमधून शेतकऱ्यांना मार्केटिंग करण्यास पुरेसा वेळ आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे भले होणार असले तरी, या परिस्थितीने फळपिकांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.सहा एकर कलिंगडाच्या लागवडीतून उत्पादन खर्च वजा जाता १२ लाख रुपये निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा असताना, बाजारपेठेतील गोंधळामुळे एक किलोही माल विकला नाही व एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. १७५ टन माल शेतात तसाच पडून आहे. याला जबाबदार कोण?- बसगौंडा गुंडेवाडी, कलिंगड उत्पादक, चाबुकस्वारवाडी