शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कलिंगड, पपई उत्पादक वेठीस

By admin | Updated: July 23, 2016 23:55 IST

नियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरण

कलिंगड, पपई उत्पादक वेठीसनियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरणदादा खोत ल्ल सलगरे राज्यभरात अडत्यांनी फळभाज्या नियमन मुक्तीविरोधात बंद पुकारला. यावर उपाययोजना म्हणून शासनाने शेतकऱ्यांना राज्यात व मुंबईतील विविध मंडईत थेट मालाची विक्री करण्यास परवानगी दिली. ‘शासनाच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभ’, अशा बातम्याही प्रसारमाध्यमातून दाखविण्यात आल्या. पण राज्यात पावसाचे वातावरण असताना, या पुकारलेल्या बंदचा आणि शासन निर्णयाचा फटका कलिंगड, पपई या पिकांना बसला आहे.राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असताना, मुंबईसारख्या मार्केटमध्ये आवक मर्यादित होती. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढल्यामुळे दरांची झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमनमुक्त बाजारपेठेचा अध्यादेश आणि व्यापाऱ्यांचा संप याचा सर्वाधिक फटका कलिंगड व पपई यासारख्या फळपिकांना बसला आहे.कलिंगड, पपईसारख्या पिकांचे हार्वेस्टिंग एकाच वेळेला होत असल्याने शेकडो टन माल बाजारात नेऊन मार्केटिंग करणे शेतकऱ्यांना शक्य होणे कठीण बनले आहे. मिरज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील पश्चिम भाग शिरोळ तालुक्यातील सर्वच भाजी उत्पादक व कलिंगड, पपई उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रमजानचा महिना लक्ष्य करून पपई, कलिंगड या पिकांच्या लागणी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. जूनपासून कलिंगडांचे मार्केट स्थिर होते. १४ ते १५ रुपये किलो असा सरासरी दर असल्याने शेतकरी आनंदित होते. परंतु ऐन रमजानच्या शेवटी शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे व मार्केटमधील गोंधळामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. बंद मिटल्यानंतर कलिंगडाचा दर ५ ते ६ रुपयांपर्यंत घसरला. शेतकऱ्यांनी माल पाठविलेल्या गाड्यांचे भाडे व उत्पादन खर्चही त्यातून निघणार नाही, अशी स्थिती आहे.पपई पिकाचीही हीच परिस्थिती आहे. मिरज पूर्व भागामध्ये बेळंकी, सलगरे, चाबुकस्वारवाडी या परिसरात कित्येक टन माल शेतामध्ये पडून आहे. मान्सूनचा अचानक वाढलेला पाऊस आणि शासनाची बाजारपेठ नियमनमुक्ती, व्यापाऱ्यांनी केलेले बंद आंदोलन अशा कात्रीत सापडल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. यामुळे कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मार्केटिंगची गरज : नुकसानीचे काय?शेतीमालाचे उत्पादन आणि व्यवस्थापन या प्रक्रियेमधून शेतकऱ्यांना मार्केटिंग करण्यास पुरेसा वेळ आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे भले होणार असले तरी, या परिस्थितीने फळपिकांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.सहा एकर कलिंगडाच्या लागवडीतून उत्पादन खर्च वजा जाता १२ लाख रुपये निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा असताना, बाजारपेठेतील गोंधळामुळे एक किलोही माल विकला नाही व एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. १७५ टन माल शेतात तसाच पडून आहे. याला जबाबदार कोण?- बसगौंडा गुंडेवाडी, कलिंगड उत्पादक, चाबुकस्वारवाडी