शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कदम-दादा गटांना दाबण्याचे जयंतरावांचे इरादे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST

श्रीनिवास नागे राज्यात महाआघाडीचे सरकार स्थिर झाल्यापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा ...

श्रीनिवास नागे

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थिर झाल्यापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. सत्तेतील बलदंड ताकदीवर काँग्रेसमधील वसंतदादा आणि कदम गटांना दाबण्याचे त्यांचे इरादे लपून राहिलेले नाहीत. किंबहुना गेल्या काही महिन्यांपासून त्यात ते कमालीचे यशस्वीही होत आहेत. अर्थात नेहमीची गटबाजी, खमक्या नेतृत्वाचा अभाव, अनुभवाची वानवा, जिल्हाभरात प्रभावाची कमतरता याद्वारे काँग्रेसनेच जयंतरावांना मखमली पायघड्या घातल्या आहेत.

जिल्हाभरात स्वत:चा सशक्त गट निर्माण करण्याचे जयंतरावांचे मनसुबे काही वर्षांपूर्वी पूर्णत्वास गेलेही होते. त्यावेळी काँग्रेसमधील पतंगराव कदम, मदन पाटील आणि राष्ट्रवादीतील आर. आर. पाटील या मातब्बरांना शह देण्यासाठी त्यांनी खेळ्या केल्या होत्या. पतंगराव आणि आर. आर. आबांनी सुरुवातीपासून, तर शेवटी मदनभाऊंनीही मुत्सद्दीपणा दाखवत त्यांच्याशी हातमिळवणी केली होती. या तीन दिग्गजांच्या निधनानंतर मात्र जयंतरावांचा वारू सुसाट सुटला; पण त्यादरम्यान राज्यातील सत्ता गेल्यामुळे गटविस्ताराला मर्यादा आली. शिलेदार फुटले. पक्ष सोडून गेले. राजकारणातील या चढउतारांची एव्हाना सवय झालेल्या जयंतरावांनी सत्तेपासून दूर होण्याची कडू फळे पाच वर्षे चाखली. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, यावर त्यांचा गाढा विश्वास... आणि राज्यातील सत्तेत ते परतले. वजनदार मंत्री बनले. मग जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी पुन्हा उचल खाल्ली नसती तरच नवल!

काँग्रेसमध्ये कदम आणि वसंतदादा गटातील राजकीय हाडवैर सर्वज्ञात आहे. हे दोन्ही गट एकमेकांशी लढण्यातच शक्ती खर्ची करतात. गेल्या काही वर्षांपासून सततच्या पराभवांनी वसंतदादा गट कमजोर झाला आहे. मदनभाऊंचे निधन झाले आहे, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत, तर वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाशिवाय कोणतेच पद नाही. पतंगरावांचे मोठे बंधू तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम वयोमानामुळे जिल्हाभरात फिरू शकत नाहीत. परिणामी काँग्रेसची आणि कदम गटाची धुरा कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आहे. राज्य मंत्रिमंडळातील जबाबदारी, भारती विद्यापीठाचा अवाढव्य पसारा सांभाळताना त्यांना जिल्ह्यातील पक्षविस्ताराकडे पूर्ण क्षमतेने लक्ष देता येत नाही. नेमका याचाच फायदा जयंतराव उठवत आहेत.

चौकट

विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यातील दरी

विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही तरुण नेते. काँग्रेसचे आश्वासक चेहरे. राजकारणात भरारी घेण्याची दोघांकडेही क्षमता, आस आणि हुशारी; पण यातूनच दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. दोघांनी याचा इन्कार केला असला तरी ते सत्य कार्यकर्त्यांनी कधीच स्वीकारले आहे. वरिष्ठ नेत्यांनीही दोन्ही गटांतील दरी सांधायचा प्रयत्न केला; पण कुरबुरी संपलेल्या नाहीत. विश्वजित यांना राज्यासह जिल्ह्यातही पक्षावर पकड ठेवायची आहे, तर विशाल यांना पुन्हा दादा गट मजबूत करत स्वत:चे नेतृत्व सिद्ध करायचे आहे. गटबाजीमुळे त्यांच्याच नेतृत्वाला खीळ बसल्याने अलीकडे मात्र दोघेही पक्षाच्या सर्व कार्यक्रमांत एकत्र दिसतात. महापालिकेत राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची सत्ता आल्यामुळे हा गोडवा वाढला आहे....

चौकट

सतर्क आणि सावध झाले की काय?

जयंतरावांनी दादा-कदम गटांना वारंवार दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे दोन्ही गट अलीकडे एकत्र आल्याचे बोलले जाते. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथविण्यात जयंतराव यशस्वी झाले. संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी असतानाही राष्ट्रवादीचा महापौर झाला. जिल्ह्यात आणि विधानसभा मतदारसंघात निधी आणण्यापासून महत्त्वाचे निर्णय घेण्यापर्यंत जयंतरावांचा वचक दिसतो. आढावा बैठकीवर त्यांचीच हुकूमत असते. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात ओढण्यासाठी तेच पुढे असतात... आणि दादा-कदम गटांत कलागती लावून देण्यामागेही त्यांचाच हात असतो... हे कळल्यामुळे दोन्ही गट सतर्क आणि सावध झाले की काय? (पूर्वार्ध)