शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सांगलीतील ऊसदराची कोंडी फोडण्यात जयंतरावांचाच अडथळा, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:30 IST

शेतकऱ्यांच्या विरोधात साखर कारखानदार एकसंघ

सांगली : ऊसदराची कोंडी फोडून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडू नये, अशीच राजारामबापू कारखान्याचे नेते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका आहे. अन्य कारखाने शेतकऱ्यांना योग्य ऊसदर देण्यास तयार असतानाही जयंत पाटील त्यामध्ये अडथळा ठरले आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केली.

जिल्ह्यातील ऊसदराच्या आंदोलनाची धग अजून पेटलेलीच आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी आपले गळीत हंगाम सुरू केलेले आहेत. यामधील चार कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे आहेत. तसेच मोहनराव शिंदे, विश्वासराव नाईक, क्रांती साखर कारखाना जयंत पाटील यांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत. त्यांचे सहकारी मित्र असलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे चार कारखाने आहेत. म्हणजे जवळपास १६ पैकी ११ कारखाने हे जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्याकडे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दराचा तोडगा काढावा, या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरू आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित होऊन यंदाच्या वर्षीची पहिली उचल तीन हजार १०० रुपये ठरविली आहे. यामध्ये सहा कारखान्यांची पहिली उचल एफआरपीप्रमाणे तीन हजार २०० पेक्षा जास्त जाते. पाच कारखान्यांची उचल एफआरपीप्रमाणे दोन हजार ४५० ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत आहे. मग जे पाच कारखाने दोन हजार ४५० ते दोन हजार ७०० दर देतात. या कारखान्यांना तीन हजार १०० रुपये प्रतिटन म्हणजेच ४०० ते ६५० रुपये प्रतिटन जादा दर देण्यास परवडते.

मग बाकीच्या ११ कारखान्यांना एफआरपीपेक्षा १०० रुपये अधिक देण्यास का परवडत नाही. याचाच अर्थ एफआरपीपेक्षा कमी दर देऊन जयंत पाटील, विश्वजित कदम, अरुण लाड, मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. राजारामबापू कारखाना, सोनहिरा, क्रांती, दत्त इंडिया, विश्वासराव नाईक, दालमिया शुगर हे कारखाने साखळी करून दर कमी देऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा..जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे प्रतिटन २०० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. मग शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा. जर तुमचा १०० टन ऊस गेला असेल, तर २० हजार रुपयांचे तुमचे नुकसान होणार आहे. आता साखर कारखान्यांचे मार्गदर्शक जयंत पाटील हे राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून परिपत्रक काढून आम्हाला शेतकऱ्यांना तीन हजार १०० रुपये दर मान्य आहे, असे लिहून घेऊन एफआरपीपेक्षा कमी दर देऊ लागले आहेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीJayant Patilजयंत पाटीलsugarcaneऊस