शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील ऊसदराची कोंडी फोडण्यात जयंतरावांचाच अडथळा, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:30 IST

शेतकऱ्यांच्या विरोधात साखर कारखानदार एकसंघ

सांगली : ऊसदराची कोंडी फोडून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडू नये, अशीच राजारामबापू कारखान्याचे नेते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका आहे. अन्य कारखाने शेतकऱ्यांना योग्य ऊसदर देण्यास तयार असतानाही जयंत पाटील त्यामध्ये अडथळा ठरले आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केली.

जिल्ह्यातील ऊसदराच्या आंदोलनाची धग अजून पेटलेलीच आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी आपले गळीत हंगाम सुरू केलेले आहेत. यामधील चार कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे आहेत. तसेच मोहनराव शिंदे, विश्वासराव नाईक, क्रांती साखर कारखाना जयंत पाटील यांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत. त्यांचे सहकारी मित्र असलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे चार कारखाने आहेत. म्हणजे जवळपास १६ पैकी ११ कारखाने हे जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्याकडे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दराचा तोडगा काढावा, या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरू आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित होऊन यंदाच्या वर्षीची पहिली उचल तीन हजार १०० रुपये ठरविली आहे. यामध्ये सहा कारखान्यांची पहिली उचल एफआरपीप्रमाणे तीन हजार २०० पेक्षा जास्त जाते. पाच कारखान्यांची उचल एफआरपीप्रमाणे दोन हजार ४५० ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत आहे. मग जे पाच कारखाने दोन हजार ४५० ते दोन हजार ७०० दर देतात. या कारखान्यांना तीन हजार १०० रुपये प्रतिटन म्हणजेच ४०० ते ६५० रुपये प्रतिटन जादा दर देण्यास परवडते.

मग बाकीच्या ११ कारखान्यांना एफआरपीपेक्षा १०० रुपये अधिक देण्यास का परवडत नाही. याचाच अर्थ एफआरपीपेक्षा कमी दर देऊन जयंत पाटील, विश्वजित कदम, अरुण लाड, मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. राजारामबापू कारखाना, सोनहिरा, क्रांती, दत्त इंडिया, विश्वासराव नाईक, दालमिया शुगर हे कारखाने साखळी करून दर कमी देऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा..जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे प्रतिटन २०० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. मग शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा. जर तुमचा १०० टन ऊस गेला असेल, तर २० हजार रुपयांचे तुमचे नुकसान होणार आहे. आता साखर कारखान्यांचे मार्गदर्शक जयंत पाटील हे राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून परिपत्रक काढून आम्हाला शेतकऱ्यांना तीन हजार १०० रुपये दर मान्य आहे, असे लिहून घेऊन एफआरपीपेक्षा कमी दर देऊ लागले आहेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीJayant Patilजयंत पाटीलsugarcaneऊस