शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

सांगलीतील ऊसदराची कोंडी फोडण्यात जयंतरावांचाच अडथळा, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:30 IST

शेतकऱ्यांच्या विरोधात साखर कारखानदार एकसंघ

सांगली : ऊसदराची कोंडी फोडून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडू नये, अशीच राजारामबापू कारखान्याचे नेते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका आहे. अन्य कारखाने शेतकऱ्यांना योग्य ऊसदर देण्यास तयार असतानाही जयंत पाटील त्यामध्ये अडथळा ठरले आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केली.

जिल्ह्यातील ऊसदराच्या आंदोलनाची धग अजून पेटलेलीच आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी आपले गळीत हंगाम सुरू केलेले आहेत. यामधील चार कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे आहेत. तसेच मोहनराव शिंदे, विश्वासराव नाईक, क्रांती साखर कारखाना जयंत पाटील यांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत. त्यांचे सहकारी मित्र असलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे चार कारखाने आहेत. म्हणजे जवळपास १६ पैकी ११ कारखाने हे जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्याकडे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दराचा तोडगा काढावा, या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरू आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित होऊन यंदाच्या वर्षीची पहिली उचल तीन हजार १०० रुपये ठरविली आहे. यामध्ये सहा कारखान्यांची पहिली उचल एफआरपीप्रमाणे तीन हजार २०० पेक्षा जास्त जाते. पाच कारखान्यांची उचल एफआरपीप्रमाणे दोन हजार ४५० ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत आहे. मग जे पाच कारखाने दोन हजार ४५० ते दोन हजार ७०० दर देतात. या कारखान्यांना तीन हजार १०० रुपये प्रतिटन म्हणजेच ४०० ते ६५० रुपये प्रतिटन जादा दर देण्यास परवडते.

मग बाकीच्या ११ कारखान्यांना एफआरपीपेक्षा १०० रुपये अधिक देण्यास का परवडत नाही. याचाच अर्थ एफआरपीपेक्षा कमी दर देऊन जयंत पाटील, विश्वजित कदम, अरुण लाड, मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. राजारामबापू कारखाना, सोनहिरा, क्रांती, दत्त इंडिया, विश्वासराव नाईक, दालमिया शुगर हे कारखाने साखळी करून दर कमी देऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा..जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे प्रतिटन २०० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. मग शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा. जर तुमचा १०० टन ऊस गेला असेल, तर २० हजार रुपयांचे तुमचे नुकसान होणार आहे. आता साखर कारखान्यांचे मार्गदर्शक जयंत पाटील हे राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून परिपत्रक काढून आम्हाला शेतकऱ्यांना तीन हजार १०० रुपये दर मान्य आहे, असे लिहून घेऊन एफआरपीपेक्षा कमी दर देऊ लागले आहेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीJayant Patilजयंत पाटीलsugarcaneऊस