शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; अपुरी कामे, भरधाव वेग कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:25 IST

महेश देसाई कवठेमहांकाळ : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर ...

महेश देसाईकवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर घोरपडी ते खरशिंग फाट्यादरम्यान अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर छोट्या मोठ्या अपघातात शेकडो जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा कवठेमहांकाळ तालुक्यात मृत्यूचा सापळा बनला आहे.राष्ट्रीय महामार्गावर असलेली अपुरी कामे तसेच भरधाव वेग, नियम मोडण्यासारख्या मानवी चुका अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे अपघातात वाढ होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाची लांबी खरशिंग फाटा ते घोरपडी दरम्यान ३५ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीतील खरशिंग ते घोरपडी दरम्यान अपघाताची संख्या वाढली आहे.बहुतांश अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालविणे हे प्रमुख कारण आढळून आले आहे. वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे. महामार्ग प्रशासनाकडून अपघाताची ठिकाणे व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काही ठिकाणी केल्या नाहीत. वाहनधारकांना महामार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत. मात्र, दुसरीकडे बोरगाव येथे नित्यनियमाने टोल वसुली मात्र जोमाने केली जात आहे.अपघातात वाढरत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री अपघातात म्हैसाळमधील तीन महिला मजूर ठार झाल्या तर अनेक जण लहान मुलासह गंभीर जखमी झाले. हा अपघात ट्रक चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.उपाययोजनांचा अभावपंढरपूर, तुळजापूर तसेच अक्कलकोट, कोल्हापूर येथील महालक्ष्मी, गणपतीपुळेला जाणारे लाखो भाविक या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा वापर करतात. वाहनांसोबतच पायी जाणारे भाविक, दिंड्यांची संख्याही या मार्गावर मोठी आहे. महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अभाव प्रशासनाकडून पाहावयास मिळत आहे.

चारचाकी वाहने अति वेगाने वाहनधारक चालवतात, तर दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचे नियम अजून माहिती नाहीत. ते रस्त्याच्या विरोधी दिशेने जात असतात. वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे. -श्रीकृष्ण नवले, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस ठाणे, कवठेमहांकाळ.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात