शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; अपुरी कामे, भरधाव वेग कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:25 IST

महेश देसाई कवठेमहांकाळ : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर ...

महेश देसाईकवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर घोरपडी ते खरशिंग फाट्यादरम्यान अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर छोट्या मोठ्या अपघातात शेकडो जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा कवठेमहांकाळ तालुक्यात मृत्यूचा सापळा बनला आहे.राष्ट्रीय महामार्गावर असलेली अपुरी कामे तसेच भरधाव वेग, नियम मोडण्यासारख्या मानवी चुका अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे अपघातात वाढ होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाची लांबी खरशिंग फाटा ते घोरपडी दरम्यान ३५ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीतील खरशिंग ते घोरपडी दरम्यान अपघाताची संख्या वाढली आहे.बहुतांश अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालविणे हे प्रमुख कारण आढळून आले आहे. वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे. महामार्ग प्रशासनाकडून अपघाताची ठिकाणे व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काही ठिकाणी केल्या नाहीत. वाहनधारकांना महामार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत. मात्र, दुसरीकडे बोरगाव येथे नित्यनियमाने टोल वसुली मात्र जोमाने केली जात आहे.अपघातात वाढरत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री अपघातात म्हैसाळमधील तीन महिला मजूर ठार झाल्या तर अनेक जण लहान मुलासह गंभीर जखमी झाले. हा अपघात ट्रक चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.उपाययोजनांचा अभावपंढरपूर, तुळजापूर तसेच अक्कलकोट, कोल्हापूर येथील महालक्ष्मी, गणपतीपुळेला जाणारे लाखो भाविक या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा वापर करतात. वाहनांसोबतच पायी जाणारे भाविक, दिंड्यांची संख्याही या मार्गावर मोठी आहे. महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अभाव प्रशासनाकडून पाहावयास मिळत आहे.

चारचाकी वाहने अति वेगाने वाहनधारक चालवतात, तर दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचे नियम अजून माहिती नाहीत. ते रस्त्याच्या विरोधी दिशेने जात असतात. वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे. -श्रीकृष्ण नवले, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस ठाणे, कवठेमहांकाळ.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात