शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; अपुरी कामे, भरधाव वेग कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:25 IST

महेश देसाई कवठेमहांकाळ : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर ...

महेश देसाईकवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर घोरपडी ते खरशिंग फाट्यादरम्यान अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर छोट्या मोठ्या अपघातात शेकडो जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा कवठेमहांकाळ तालुक्यात मृत्यूचा सापळा बनला आहे.राष्ट्रीय महामार्गावर असलेली अपुरी कामे तसेच भरधाव वेग, नियम मोडण्यासारख्या मानवी चुका अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे अपघातात वाढ होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाची लांबी खरशिंग फाटा ते घोरपडी दरम्यान ३५ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीतील खरशिंग ते घोरपडी दरम्यान अपघाताची संख्या वाढली आहे.बहुतांश अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालविणे हे प्रमुख कारण आढळून आले आहे. वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे. महामार्ग प्रशासनाकडून अपघाताची ठिकाणे व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काही ठिकाणी केल्या नाहीत. वाहनधारकांना महामार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत. मात्र, दुसरीकडे बोरगाव येथे नित्यनियमाने टोल वसुली मात्र जोमाने केली जात आहे.अपघातात वाढरत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री अपघातात म्हैसाळमधील तीन महिला मजूर ठार झाल्या तर अनेक जण लहान मुलासह गंभीर जखमी झाले. हा अपघात ट्रक चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.उपाययोजनांचा अभावपंढरपूर, तुळजापूर तसेच अक्कलकोट, कोल्हापूर येथील महालक्ष्मी, गणपतीपुळेला जाणारे लाखो भाविक या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा वापर करतात. वाहनांसोबतच पायी जाणारे भाविक, दिंड्यांची संख्याही या मार्गावर मोठी आहे. महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अभाव प्रशासनाकडून पाहावयास मिळत आहे.

चारचाकी वाहने अति वेगाने वाहनधारक चालवतात, तर दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचे नियम अजून माहिती नाहीत. ते रस्त्याच्या विरोधी दिशेने जात असतात. वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे. -श्रीकृष्ण नवले, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस ठाणे, कवठेमहांकाळ.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात