शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

लाचखोर सापळ्यातून शिक्षेच्या कचाट्यात सापडणार कधी?, सांगली जिल्ह्यात दहा वर्षांत किती खटल्यांचा निकाल लागला.. जाणून घ्या

By घनशाम नवाथे | Updated: June 23, 2025 14:25 IST

जलदगती न्यायालयात सुनावणी हवी

घनश्याम नवाथेसांगली : एकीकडे लोकसेवक लाचेच्या सापळ्यात अडकत असले तरी दुसरीकडे शिक्षेच्या कचाट्यात सापडण्याचे प्रमाण नगण्यच आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत केवळ सातच खटल्यांतील लाचखोरांना शिक्षा लागली आहे. दहा वर्षांत दोनशेहून अधिक लाचखोर जाळ्यात सापडले असले तरी याच काळात शिक्षेचे प्रमाण मात्र घटल्याचे चित्र दिसते.लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तो गुन्हा ठरतो. अशांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर प्रथम तक्रारीची पडताळणी केली जाते. पडताळणीमध्ये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यास सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ पकडले जाते.जिल्ह्यात दरवर्षी २० ते २५ लाचखोर जाळ्यात सापडतात, असे चित्र दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील गुन्ह्यात प्रथम पुरावे गोळा करून नंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे या गुन्ह्यात लाचखोर सुटत नाहीत असेच अनेकांना वाटते. तसेच लाचखोरीच्या गुन्ह्यात अलीकडे सरकारी पंच घेतले जातात. ते फितूर होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतला आहे. एकीकडे लाचखोरांना पकडल्यानंतर त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असताना दुसरीकडे कायद्याच्या पळवाटा शोधून लाचखोरांना सहीसलामत बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू असतात.

सांगली जिल्ह्यात लाचखोरीच्या शिक्षेचे प्रमाण फारच कमी आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत दोनशेहून अधिक लाचखोर जाळ्यात सापडले. परंतु दुसरीकडे जिल्हा न्यायालयात दहा वर्षांत केवळ सात खटल्यातील लाचखोर शिक्षेच्या कचाट्यात पकडले गेले आहेत. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत लाचखोरीचे खटलेच मोठ्या प्रमाणात चालवले गेले नसल्याचे चित्र दिसून येते. सध्या लाचखोरीच्या अनेक खटल्यांची सुनावणी सुरू आहे. परंतु सुनावणी पूर्ण होऊन प्रत्यक्षात निकाल लागण्यास जास्त कालावधी लागू शकतो, असे चित्र आहे.सात खटल्यांचा निकालगेल्या दहा वर्षांत सात खटल्यांचा निकाल लागून नऊ जणांना शिक्षा झाली. त्यामध्ये कालिदास भारते (२०१५), आनंदा शिर्के (मृत) व वसंतराव कुराडे (२०१७), दगडू कुंभार (२०१८), अरविंद देशपांडे (२०२१), सतीश साने व जिवंधर नेमिनाथ (२०२२), अशोक कांबळे (२०२२), वसंत मिरजकर (२०२३) यांना दोषी ठरवले.

सहा वर्षांतील सापळेवर्ष - सापळे२०१९ - २२२०२० - २२२०२१ - २७२०२२ - २३२०२३ - २०२०२४ - १४

विलंबामुळे तडजोडींना वावलाचखोराला पकडल्यानंतर प्रत्यक्षात तपास होऊन लाचखोर कार्यरत असलेल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल होऊन खटला सुनावणीस येण्यास विलंब होतो. या काळात फिर्यादी, पंच आदींना ‘मॅनेज’ करण्यासाठी वाव मिळतो.

जलदगती न्यायालयात सुनावणी हवीलाचखोरी ही शासकीय कार्यालयांना लागलेली कीड आहे. लाचखोरांना एकीकडे जाळ्यात पकडले जात असले तरी त्यांना शिक्षेच्या कचाट्यात पकडले गेले तर इतरांवर जरब बसू शकते. त्यामुळे जलदगती न्यायालयात या खटल्यांची सुनावणी हवी.

शिक्षेची तरतूद जास्त हवीलाचखोरीच्या खटल्यात शिक्षेची तरतूद कमी आहे. त्यामुळे लाचखोरांवर कायद्याचा धाक राहत नसल्याचे चित्र दिसून येते. लाचखोरांना शिक्षेची तरतूद जास्त असावी, अशी अनेकदा मागणी होती. शिक्षेमुळे इतरांना चाप बसू शकतो.