शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:44 IST

महापूर नियंत्रण समितीची भूमिका

सांगली : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्याने राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा दावा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे. कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिप्परगीचे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत उघडेच ठेवण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग व कर्नाटक सरकारला पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूरचा संभाव्य महापूर रोखण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदी अखंड प्रवाहित राहणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ७ जूनरोजी महापूर नियंत्रण समितीची बैठक झाली होती. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हिप्परगी धरणारे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत खुले ठेवून संपूर्ण विसर्ग पुढे सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यासंदर्भात पाटबंधारे विभाग पुढील आवश्यक कार्यवाही करेल असेही ठरले होते. मात्र आजमितीस धरणाचे २२ पैकी १६ दरवाजे बंद आहेत. धरणात २१००० क्युसेक क्षमतेने पाणी जमा होत आहे. उघडलेल्या सहा दरवाजांतून १२००० क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ५२२.६० मीटर आहे. धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे राजापूर व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे. पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षम कारभारामुळे ३० जूनरोजीच ही स्थिती उद्भवली आहे.

अलमट्टी ५१७ खालीच ठेवाहवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी हिप्परगी धरणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्यवाही करावी. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होऊ शकेल. अलमट्टीची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरपेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकfloodपूरDamधरण