शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीची ओळख ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी व्हावी !

By admin | Updated: August 4, 2016 01:27 IST

अमरसिंह देशमुखांची तळमळ : खेबूडकर कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन; तालुक्यात पाणी व्यवस्थापनाची गरज

अविनाश बाड -आटपाडी--प्यायला पाणी नाही, कायम दुष्काळी परिस्थिती, ओळखच दुष्काळी भाग अशी. तसेच जगण्यासाठी गोदीमध्ये जाऊन काम करणारी, मेंढरं घेऊन कोकणामध्ये जाणारी आणि वर्षानुवर्षे ऊस तोडायला जाणारी माणसं, ही तालुक्याची दुसरी ओळख. पण येत्या पाच वर्षात ही ओळख पुसायची आहे. हिरवा तालुका आणि अधिकाऱ्यांचा तालुका अशी नवी ओळख निर्माण करणे आपले स्वप्न आहे, अशी तळमळ रविवारी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी जाहीरपणे व्यक्त केली. इथल्या नेत्यांची स्वप्नं बदलू लागली, तालुक्याचं चित्र बदलेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथील दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून बांधलेल्या आबासाहेब खेबूडकर ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या इमारतीचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. वास्तविक अवघ्या महिन्यापूर्वी आटपाडीत माजी मंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याहस्ते पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाची इमारत तयार असताना आणि महाविद्यालयाच्या आवारातच कार्यक्रमाचे आयोजन केलेले असताना, त्यावेळी उद्घाटन करण्यात आले नाही. त्यासाठी रविवारी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर राजकारणी मंडळी असूनही राजकारणविरहित केवळ शैक्षणिक आणि तालुक्याची ओळख बदलासाठीची घोषणा होणारा हा तालुक्यातील पहिला कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आटपाडीतील स्वागताचा हा माझा शेवटचा कार्यक्रम समजा. मी या तालुक्यातील तरुणांना युपीएससी आणि एमपीएससीसाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहे. अमरसिंह देशमुख यांच्या तळमळीची त्यांनी प्रशंसाही केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहारला मागे टाकणारी अधिकाऱ्यांची संख्या आपण आटपाडी तालुक्यातून निर्माण करू. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, टेंभूचे पाणी आले म्हणून केवळ विकास होणार नाही, त्याचे नियोजन हवे. दिशा देणाऱ्या नेत्याची गरज आहे. देशमुखांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून तलावातून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीने शेती करण्यासाठी गेले वर्षभर रान उठविले आहे. आटपाडी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे उताराची आहे. जागोजागी सर्वच तलाव बांधले आहेत. ओढ्याने जरी ‘टेंभू’च्या पाण्याने तलाव भरले आणि पाण्याची आवर्तने ठरविली तर, सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीमुळे तालुका हिरवागार होेण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातली सर्वात मोठी शिक्षण संस्था त्यांच्याकडे आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळाला, संधी मिळाली, तर हे स्वप्न सत्यात उतरणे शक्य आहे. मात्र या मंडळींना त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणात राजकारणाचा अडसर येणार काय?पुण्या-मुंबईसह आटपाडीत शिकून शहरात स्थायिक झालेले अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी रविवारी येथे आल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून ते आटपाडीचे वाटतच नव्हते. यातील ज्येष्ठ मंडळींना स्वत: खुर्ची उचलून देताना हर्षवर्धन देशमुखही दिसले. त्या मंडळींचं एवढंच म्हणणं होतं की, आटपाडीत शिक्षणाची सोय झाली नसती, तर आम्ही शहरात दिसलो नसतो. आता सामूहिक ठिबक सिंचनला परवानगी न देण्यात राजकारण आहे म्हणतात. मग स्पर्धा परीक्षेमध्येही अडसर निर्माण होणार काय? आणि देशमुख त्यावर कशी मात करणार? यावर स्वागतार्ह स्वप्नाचे भवितव्य अवलंबून आहे.