शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बंडखोरांवर कारवाई करायची तरी कशी? : महायुतीच्या नेत्यांसमोर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:51 PM

आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत.

ठळक मुद्देआधीच राजीनामे दिल्याने अडचण; पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट

शीतल पाटील ।सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यात महायुतीत तीन ठिकाणी बंडखोरी झाल्याने भाजप-शिवसेना नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. राज्यपातळीवरील नेत्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्याचा इशाराही दिला, पण आतापर्यंत तरी या बंडखोरांवर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट बंडखोरांनीच पक्षाचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.

आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत. या तिरंगी लढतीमुळे शिराळ्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाडिक गटाने गेल्या काही वर्षांपासून भाजपशी जवळीक साधली होती. त्यांचा शिराळा मतदारसंघात स्वतंत्र गटही आहे, पण दिवंगत नानासाहेब महाडिक, सम्राट व राहुल महाडिक यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत सम्राट यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण भाजपने पुन्हा शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. ते सदस्य नसल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करायची, असा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे.

महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. वाळव्याचे गौरव नायकवडी यांनी शेवटच्याक्षणी शिवबंधन बांधत उमेदवारी मिळविली. त्यांच्या पाठीशी भाजपची नेतेमंडळी उभी राहिली, पण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र वेगळी वाट धरली. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये उभी फूट पडली. काही नेते नायकवडींकडे, तर काहीजण पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले. उमेदवारी अर्ज माघारीपूर्वी पाटील यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपच्या तालुका, शहर, महिला कार्यकारिणीने पाटील यांना पाठिंबा दिला. भाजपच्या नेत्यांना जाग आली आणि त्यांनी तालुका कार्यकारिणी बरखास्त करून टाकली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पाटील भाजपमध्ये कुठल्याच पदावर नसल्याने त्यांच्यावरही कारवाईची अडचण आहे.

जत विधानसभा मतदारसंघातही भाजपचे आ. विलासराव जगताप यांच्याविरोधात जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसने विक्रम सावंत यांना उमेदवारी दिली आहे. बंडखोर आरळी यांच्यामागे भाजपची तालुका कार्यकारिणी उभी आहे. आरळी यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र तालुका कार्यकारिणीने राजीनामे दिले आहेत. आरळी यांच्यावर पक्षाने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे. सांगलीतही भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात शिवसेनेचे शेखर माने यांनी बंडखोरी केली आहे; पण माने शिवसेनेत कोणत्याच पदावर नसल्याने त्यांच्यावर कारवाईची अडचण निर्माण झाली आहे.वेगवेगळा : न्याय का?इस्लामपूर मतदारसंघात भाजप बंडखोर निशिकांत पाटील यांच्या मागे तालुका, शहर व महिला कार्यकारिणीतील सदस्य उभे आहेत. पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी बराच प्रयत्न झाला; पण त्यांची बंडखोरी कायम राहिल्यानंतर भाजपने तातडीने कार्यकारिणी बरखास्त केली. पण हाच न्याय जत मतदारसंघात मात्र लावला नाही. तेथील कार्यकारिणीतील अनेक सदस्य बंडखोर डॉ. आरळींच्या मागे आहेत. जतच्या कार्यकारिणीवर मात्र अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोन मतदारसंघात वेगवेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदPoliticsराजकारणSangliसांगली