शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
5
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
6
हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
7
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
8
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
9
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
10
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
11
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
12
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
13
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
14
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
15
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
16
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
17
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
18
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
19
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
20
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
Daily Top 2Weekly Top 5

सोनी, करोली (एम) येथे गारपीट

By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST

चौघे जखमी : घरांवरील पत्रे उडाले; अवकाळी पावसाने हानी

सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह करोली (एम) परिसरामध्ये सोसाट्याचा वारा व गारपीटीसह पडलेल्या पावसाने जवळपास ५० हून अधिक घरांवरील छप्पर उडाले. तसेच घरांवरील पत्रे उडून लागल्याने चौघे जखमी झाले आहेत. अनेक घरे उघडी पडली आहेत. विजेचे खांबही पडले आहेत. नवीन द्राक्षबागांचे कोंब या पावसाने मोडले आहेत. पावसामुळे करोली (एम) परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विट्यातही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.
सायंकाळी ५.१५ च्या दरम्यान सोनीसह करोली (एम) परिसरात गारपीटीसह पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला १५ ते २० मिनिटे पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात गारपीट सुरू होती. त्यानंतर सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. पत्रे उडून लागल्याने आनंदराव पाटील, तसेच मैथिली श्रीकांत चव्हाण, समृध्दी श्रीकांत चव्हाण, दर्शनी श्रीकांत चव्हाण या तीन सख्ख्या बहिणी जखमी झाल्या आहेत.
करोली मळा भागातही घरांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली असून त्याची माहिती घेण्याचे काम सर्कल बी. एस. नागरगोजे, तलाठी पोपट ओमासे, ग्रामपंचायत पदाधिकारी करीत होते. वाऱ्याने विजेचे खांबही पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नवीन लागण केलेल्या द्राक्षबागांचेही नुकसान झाले असून गारपीटीने कोंब मोडले आहेत. (वार्ताहर)


रांजणीत वीज कोसळून जनावरांचा मृत्यू
रांजणी : येथील उंबरओढा वस्तीवरील चंद्रकांत मारुती भोसले यांच्या राहत्या घरासमोर वीज पडून एक शेळी व दोन बोकडांचा मृत्यू झाला. गुरुवारी साडेपाचच्या सुमारास कडाडून वीज पडली. भोसले यांच्या घराजवळ दहा ते पंधरा शेळ्यांचा कळप होता. जोराने वारा सुटला होता. आभाळ भरून आले होते. वादळी वारे इतके जोराचे होते की, पुढचे काहीच दिसत नव्हते. यातच विजेचा जोरात आवाज झाला. वीज घरासमोरच पडल्यामुळे भीतीचे वातावरण दिसून आले. बाहेर पाहताच कळपातील एक शेळी व दोन बोकडांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तसेच एक लहान बोकड जखमी झाले. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी ए. ए. रुपनूर यांनी केला असून, त्यांची किंमत वीज हजाराच्या आसपास करण्यात आली आहे.



आगळगावात अवकाळी
ढालगाव : आगळगाव, शेळकेवाडी, घाटनांद्रे, तिसंगी परिसरात गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळासह अर्धा तास पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे बेदाण्याचे नुकसान झाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आज दिवसभर मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

जत तालुक्यात वादळी पाऊस
जत : तालुक्यातील तिकोंडी, बनाळी मुचंडी, रावळगुंडवाडी, दरीबडची या भागात गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, आंबा, बेदाणा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा पाऊस उन्हाळी मका, कापूस, भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.