शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त

By admin | Updated: January 3, 2015 00:10 IST

बदलत्या हवामानाचा फटका : कोट्यवधींचे नुकसान

कवठेएकंद : गेल्या काही वर्षांपासून तासगाव तालुक्यातील द्राक्षशेतीसह सर्वच प्रकारच्या शेतीला नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ, अति पाऊस, अवकाळी, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.सध्या द्राक्ष हंगामातील काढणीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे आगाप असणाऱ्या द्राक्षबागांमध्ये द्राक्ष काढणी सुरू आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान, दोन दिवसात पडलेल्या पावसाच्या सरी यामुळे काढणीच्या द्राक्षबागांना मोठा धोका पोहोचत असून कोट्यवधीचे नुकसान होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्याने फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे द्राक्ष मण्यांचे अंकुर गळून गेले, तर अधिक फटका बसलेल्या भागात द्राक्षांचे घडही गळून पडले. त्यामुळे हंगामावर विपरित परिणाम झाला होता. काही भागात ५० टक्केहून अधिक द्राक्षाचे नुकसान झाले. त्या अवकाळीत कशाबशा वाचलेल्या द्राक्षबागा आता अंतिमक्षणीही अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. कवठेएकंद, उपळावी, मणेराजुरी, कुमठे, नागाव कवठे, योगेवाडी, सावर्डेसह परिसरास गेल्या चार दिवसात दोनवेळा पावसाने झोडपले. यामुळे परिसरातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. परिपक्व असणाऱ्या द्राक्षमण्यांमध्ये पाणी गेल्याने फळकूज, मणी तडकणे यासारखा प्रादुर्भाव होत असल्याने, पावसाने उत्पन्नात घट होत आहे. अवकाळीच्या तडाख्यातून द्राक्षबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी आव्हान बनले आहे. बागा वाचविण्यासाठी महागडी औषधफवारणी करून शेतकरी मेटाकुटीस आला असून, आता अंतिम टप्प्यातही पावसाने झोडपल्याने शेतकरी हतबल झाला आहे.द्राक्षबागांसाठी अमाप पैसे खर्चूनही हाती काहीच लागत नाही, असे चित्र असल्याने भीतीचे वातावरण आहे. काही बागायतदारांनी पावसापासून द्राक्षघडांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक द्राक्षघडांना प्लॅस्टिक पिशव्या बांधून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांची, द्राक्ष बागायतदारांची कळा मात्र बिघडून गेली आहे. (वार्ताहर)ढगाळ हवामान व कडाक्याची थंडी पलूससह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. पलूस तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान व कडाक्याची थंडी यामुळे द्राक्षपिकावर बुरशी व दावण्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यातील लहरी हवामानामुळे ज्या बागा बागायतदारांनी वाचविल्या, त्या बागा आता हंगाम सुरु होण्यापूर्वीच ढगाळ हवामानामुळे धोक्यात आल्या आहेत. परिसरात ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा परिणाम होऊ नये म्हणून दिवसातून दोनवेळा शेतकरी औषधांची फवारणी करु लागला आहे. या लहरी हवामान बदलाचा तालुक्यातील द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने, सर्व बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे.