शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त

By admin | Updated: January 3, 2015 00:10 IST

बदलत्या हवामानाचा फटका : कोट्यवधींचे नुकसान

कवठेएकंद : गेल्या काही वर्षांपासून तासगाव तालुक्यातील द्राक्षशेतीसह सर्वच प्रकारच्या शेतीला नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ, अति पाऊस, अवकाळी, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.सध्या द्राक्ष हंगामातील काढणीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे आगाप असणाऱ्या द्राक्षबागांमध्ये द्राक्ष काढणी सुरू आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान, दोन दिवसात पडलेल्या पावसाच्या सरी यामुळे काढणीच्या द्राक्षबागांना मोठा धोका पोहोचत असून कोट्यवधीचे नुकसान होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्याने फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे द्राक्ष मण्यांचे अंकुर गळून गेले, तर अधिक फटका बसलेल्या भागात द्राक्षांचे घडही गळून पडले. त्यामुळे हंगामावर विपरित परिणाम झाला होता. काही भागात ५० टक्केहून अधिक द्राक्षाचे नुकसान झाले. त्या अवकाळीत कशाबशा वाचलेल्या द्राक्षबागा आता अंतिमक्षणीही अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. कवठेएकंद, उपळावी, मणेराजुरी, कुमठे, नागाव कवठे, योगेवाडी, सावर्डेसह परिसरास गेल्या चार दिवसात दोनवेळा पावसाने झोडपले. यामुळे परिसरातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. परिपक्व असणाऱ्या द्राक्षमण्यांमध्ये पाणी गेल्याने फळकूज, मणी तडकणे यासारखा प्रादुर्भाव होत असल्याने, पावसाने उत्पन्नात घट होत आहे. अवकाळीच्या तडाख्यातून द्राक्षबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी आव्हान बनले आहे. बागा वाचविण्यासाठी महागडी औषधफवारणी करून शेतकरी मेटाकुटीस आला असून, आता अंतिम टप्प्यातही पावसाने झोडपल्याने शेतकरी हतबल झाला आहे.द्राक्षबागांसाठी अमाप पैसे खर्चूनही हाती काहीच लागत नाही, असे चित्र असल्याने भीतीचे वातावरण आहे. काही बागायतदारांनी पावसापासून द्राक्षघडांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक द्राक्षघडांना प्लॅस्टिक पिशव्या बांधून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांची, द्राक्ष बागायतदारांची कळा मात्र बिघडून गेली आहे. (वार्ताहर)ढगाळ हवामान व कडाक्याची थंडी पलूससह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. पलूस तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान व कडाक्याची थंडी यामुळे द्राक्षपिकावर बुरशी व दावण्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यातील लहरी हवामानामुळे ज्या बागा बागायतदारांनी वाचविल्या, त्या बागा आता हंगाम सुरु होण्यापूर्वीच ढगाळ हवामानामुळे धोक्यात आल्या आहेत. परिसरात ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा परिणाम होऊ नये म्हणून दिवसातून दोनवेळा शेतकरी औषधांची फवारणी करु लागला आहे. या लहरी हवामान बदलाचा तालुक्यातील द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने, सर्व बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे.