शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सीमावासीयांचा टाहो: सरकारकडे मांडायची किती गाऱ्हाणी? दारी केव्हा खळखळणार पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 18:58 IST

पाण्याविना शेती पिकत नसल्याने शंभर एकरांचा शेतकरी दरवर्षी उसाच्या फडावर मजूर म्हणून जातो.

गजानन पाटीलदरीबडची : जत तालुक्यातील ६४ गावांतील जनतेने सरकारकडे पाण्याशिवाय कोणतीही विशेष मोठी मागणी केली नाही. याकडे मागील सरकारने काय केले, यावर ऊहापोह करण्याऐवजी सरकारने, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्याला कोणत्याही योजनेतून पाणी देता येते, यावर गांभीर्याने विचार करावा. मग ती म्हैसाळची विस्तारित योजना असो वा तुबची-बबलेश्वर योजना, हे महत्त्वाचे नसून वंचित गावांना पाणी मिळणे हा महत्त्वाचा विषय आहे.तालुक्यातील ६४ गावे म्हैसाळ पाण्यापासून वंचित आहेत. निसर्गाबरोबरच राज्यकर्त्यांनी सापत्न वागणूक दिली आहे. पाण्याविना शेती पिकत नसल्याने शंभर एकरांचा शेतकरी दरवर्षी उसाच्या फडावर मजूर म्हणून जातो.वंचित गावातील पाणीप्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने कर्नाटक सरकार आपले वाटायला लागले आहे, अन्यथा ही गावे कर्नाटकात जाण्यासाठी एल्गार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. तातडीने राज्याकडे प्रस्तावित असणारी म्हैसाळ विस्तारित योजना व तुबची-बबलेश्वर योजना प्रत्यक्षात सुरू करण्याची गरज आहे.पाण्याच्या योजनेबाबत यापूर्वी कर्नाटक-महाराष्ट्र सरकार यांच्यात बोलणी झाली आहे. महाराष्ट्र शासनाने पाच टीएमसी पाणी कर्नाटकला द्यावे, त्या मोबदल्यात चार टीएमसी पाणी महाराष्ट्राला द्यावे लागणार आहे. चर्चा होवूनही पुढे काहीच पावले पडली नाहीत.

म्हैसाळ विस्तारित योजनेला सिंचन योजनांच्या अनुशेषातून २ हजार १०० कोटींचा निधी आणला आहे, असे सांगितले जात आहे. तो निधी कधी येणार माहिती नाही. त्या अगोदर शासनाने लोकसहभागातून म्हैसाळ मायथळ कॅनाॅलपासून व्हसपेठ तलावापर्यंत, शेड्याळ, कारानजगी डोणतील काम करण्यास परवानगी द्यावी. -तुकारामबाबा महाराज 

शासनाने म्हैसाळ विस्तार योजनेसाठी तत्काळ आर्थिक निधीची तरतूद करावी किंवा तुबची-बबलेश्वर योजनेसाठी आंतरराज्य करार करावा. यासाठी शासनाला ५ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. पाणी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेऊन जनजागृती करणार आहे. -अनिल शिंदे, उपाध्यक्ष, पाणी संघर्ष समिती

जत पूर्व भागातील ४२ वंचित गावांतील प्रमुख प्रश्न पाण्याचा आहे. कर्नाटक शासनाने मोफत तुबची-बबलेश्वर योजनेतून तीन वर्षांपासून पाणी सोडले. मात्र, सरकारने कोणतीही पाणी योजना न राबविल्याने आम्ही कर्नाटकात जायचा विचार करत आहोत. त्वरित पाणी देण्यासाठी हालचाल करावी, अशी आमची मागणी आहे. - मधू मुरगोंड, द्राक्ष बागायतदार उमदी.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकjat-acजाट