शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

निधी काँग्रेसचा, उद्घाटने जयंतरावांची!

By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST

महापालिकेत नवा वाद : नेत्यांवर झालेल्या टीकेमुळे काँग्रेसचे नगरसेवक संतप्त

शीतल पाटील- सांगली -विकासकामांचे मार्केटिंग करण्याची परंपरा असलेल्या राष्ट्रवादीने आता विरोधी बाकावरून ही परंपरा जोपासताना त्याला राजकारणाचा वेगळाच रंग दिला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विकास कामांची उद्घाटने करताना त्यांनी नेहमीप्रमाणे गाजावाजा केला नाही. तरीही या कार्यक्रमांमधून जयंतरावांनी काँग्रेस नेत्यांवर घेतलेले तोंडसुख आता महापालिकेत कळीचा मुद्दा बनला आहे. वास्तविक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न करून आणलेल्या निधीवर राष्ट्रवादीने नारळ फोडताना त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने, राजकारणाचे हे अजब रसायन काँग्रेसवाल्यांना पचनी पडताना जड जात आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, स्नेहा औंधकर, शेडजी मोहिते यांच्या प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात जयंतरावांनी नेहमीच्या शैलीत पालिकेतील कारभारी काँग्रेसचा पंचनामा केला. जयंतरावांच्या टीकेनंतर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व अधिकाऱ्यांना विकास कामांची उद्घाटने झाल्याचे समजले. यापूर्वी असा प्रकार राष्ट्रवादीकडून कधीच झाला नव्हता. अगदी दोन-चार लाखाचे काम असले तरी, राष्ट्रवादीचे नगरसेवक त्याचा मोठा गाजावाजा करत. कार्यक्रमाच्या तयारीपासून ते संपेपर्यंत नगरसेवकांची धावपळ असे. पण यावेळी या साऱ्या गोष्टीला फाटा दिला होता. कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका छापली होती; पण ती केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवक व प्रभागातील नागरिकांपुरतीच मर्यादित होती. उद्घाटनाचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मात्र सत्ताधारी काँग्रेस व प्रशासनाच्या भुवया उंचावल्या. त्याला कारण होते, जयंतरावांची टीका. जयंतरावांनी स्थापन केलेली महाआघाडी सत्तेतून गेल्यापासून पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. तरीही राष्ट्रवादीचे नगरसेवक नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करीत आहेत, असे वक्तव्य करून जयंतरावांनी काँग्रेसला चिमटा काढला, पण आता हा प्रकार राष्ट्रवादीच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मदन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून निधी आणला होता. या निधीतून कोणती कामे करायची, याचे पत्रही खुद्द मदन पाटील यांनीच दिले होते, तर पालकमंत्रीपदी असताना पतंगराव कदम यांनी जिल्हा नियोजन समितीतून पालिकेला पाच कोटींचा निधी दिला होता. या निधीतून सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना प्रााधान्य देण्यात आले. वीस कोटींच्या निधीतील कामांना दिग्विजय सूर्यवंशी यांनीच विरोध करत जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. तरीही ही कामे आता मार्गी लागल्याने भविष्यात काँग्रेसचे कार्यकर्ते या कामाचे श्रेय घेऊ शकतात, त्यासाठीच उदघाटनाचे सोपस्कार राष्ट्रवादीने घाईगडबडीत उरकल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक करू लागले आहेत. माझ्या प्रभागातील काही कामे जिल्हा नियोजन समिती, बायनेम व शासकीय निधीतील आहेत, तर काही कामे जयंत पाटील यांनी आणलेल्या निधीतील आहेत. आम्ही गुपचूप उद्घाटने केली नाहीत. प्रभागात रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली होती. निमंत्रणपत्रिकाही छापल्या होत्या. महापौर, उपमहापौरांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याने आणि आयुक्त बाहेरगावी असल्याने त्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापली नाहीत. काँग्रेसनेही अनेक कार्यक्रमात ‘प्रोटोकॉल’ पाळलेला नाही. - दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते, महापालिका.‘प्रोटोकॉल’ची ऐशीतैशीदिग्विजय सूर्यवंशी व विष्णू माने यांच्या प्रभागातील कामांसाठी पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला असला, तरी किमान उद्घाटनांचे कार्यक्रम घेताना ‘प्रोटोकॉल’ पाळण्याची आवश्यकता होती. महापालिका व शासकीय निधीतून झालेल्या या कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे होती. महापौर, उपमहापौर, गटनेता, आयुक्त, स्थायी समिती सभापती यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर अपेक्षित होते, पण राष्ट्रवादीने ‘प्रोटोकॉल’च धुडकावल्याची चर्चा आहे. सत्ताधारी काँग्रेसच ‘प्रोटोकॉल’ पाळत नसेल, तर आम्ही कशासाठी पाळायचा?, असा सवाल दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला.