शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप, सांगलीत महापुराचा धोका टळला; वारणा धरणाचे दरवाजे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:58 IST

अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर

सांगली : पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून दिवसात ७४ हजार ४०० क्युसेकने कमी करून २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीचीपाणीपातळी कराड येथून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. वारणा धरण वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग गुरुवारी सायंकाळी ६ वाजता बंद केला आहे. विद्युत गृहातून केवळ एक हजार ६३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णा, वारणा नद्यांचा महापुराचा धोका टळल्यामुळे नदीकाठच्यासांगली, मिरज शहरासह १०४ गावांना दिलासा मिळाला आहे.कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी उघडीप दिली आहे. कोयना धरण क्षेत्रात दिवसभरात केवळ १७ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा आहे. पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सकाळपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली. बुधवारी रात्री ९५ हजार ३०० क्युसेक असलेला विसर्ग सकाळी ८० हजारांवर आणला.त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने सकाळी दहा वाजता ६७ हजार आणि रात्री ९ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फूट ६ इंचांवरून ३ फुटांपर्यंत खाली आणून १९ हजार ८०० क्युसेक विसर्ग केला. धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार १०० क्युसेक असा एकूण कोयना नदीमध्ये एकूण २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग केला आहे.वारणा धरण क्षेत्रात दिवसभरात १५ मिलिमीटर पाऊस झाला असून ३१.३४ टीएमसी पाणीसाठा आहे. गुरुवारी धरणात पावसाची तीव्रता कमी झाल्याने सायंकाळी धरणाचे चारही वक्र दरवाजे बंद केले. मात्र विद्युत गृहातून एक हजार ६३० क्युसेक विसर्ग सुरू आहे.सकाळपासून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरूच राहिली. दिवसभरात साडेतीन फुटांनी पाण्यात वाढ झाली होती. सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाची पातळी स्थिर राहिली. कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलांसह ताकारी, बहे पुलाची पाणीपातळी कमी झाली.

अडीच हजार नागरिकांचे स्थलांतरपुरामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दोन हजार ३१३ नागरिकांचे स्थलांतर केले आहे. महापालिका प्रशासनाने १६९ कुटुंबातील ८३० जणांचे स्थलांतर केले आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील ८४ गावांना पुराचा फटका बसला आहे. २८६ कुटुंबातील दीड हजारांवर नागरिकांचे स्थलांतर केले.

३८ रस्ते पाण्याखालीचकृष्णा, वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारीही कायम राहिले. शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमणापूर, भिलवडी पूल पाण्याखाली आहेत. याशिवाय ३८ रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूक बंदच राहिली.

कृष्णा नदीची पाणी पातळी (फूट इंचामध्ये)

  • कृष्णा पूल कराड २८.११
  • बहे पूल १७.६
  • ताकारी पूल ५२.५
  • भिलवडी पूल ४९.९
  • सांगली आयर्विन ४३.६
  • राजापूर बंधारा ४८.११

तालुकानिहाय चोवीस तासांतील पाऊसतालुका - पाऊस मिलिमीटरमध्ये

  • मिरज - ५.४
  • जत - २.८
  • खानापूर - २
  • वाळवा - ५.८
  • तासगाव - ३.४
  • शिराळा - १६.३
  • आटपाडी - १
  • क. महांकाळ - ५.२
  • पलूस - ४.७
  • कडेगाव - २.१

प्रमुख धरणातील पाणीसाठा, विसर्गधरण / पाणीसाठा (टीएमसी) / टक्केवारी / विसर्ग (क्युसेक)

  • कोयना - ९९.७४ / ९४ / ३६,७००
  • वारणा - ३१.३३ / ९१ / १६३०
  • धूम - १३.०५ / ९७ / ०००
  • कण्हेर - ९.५६ / ९५ / ७४०
  • उरमोडी - ९.६४ / ९७ / ४५०
  • अलमट्टी - १००.५१ / ८२ / २,५०,०००