शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

Independence Day (12590) साक्षीदारांच्या हृदयात कोरला पहिला स्वातंत्र्य दिन : सांगली जिल्ह्यातील स्फूर्तिदायी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 9:32 PM

स्वातंत्र्याची उर्मी बाळगून धगधगते पर्व नोंदविणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात पहिला स्वातंत्र्य दिन हा अत्यंत मंतरलेला, भारावलेला होता. सांगली, मिरज, तासगाव याठिकाणी झेंडावंदनासह मिरवणुका, खाऊ वाटप अशाप्रकारच्या

ठळक मुद्देमंतरलेल्या दिवसाची सत्तरी उत्तर कहाणी

अविनाश कोळीसांगली : स्वातंत्र्याची उर्मी बाळगून धगधगते पर्व नोंदविणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात पहिला स्वातंत्र्य दिन हा अत्यंत मंतरलेला, भारावलेला होता. सांगली, मिरज, तासगाव याठिकाणी झेंडावंदनासह मिरवणुका, खाऊ वाटप अशाप्रकारच्या कार्यक्रमांनी एक स्फूर्तिदायी उत्सवही साजरा करण्यात आला होता. स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब अण्णासाहेब पाटील आणि माधवराव माने या दोन साक्षीदारांच्या हृदयात आजही त्या दिवसाच्या आठवणी ताज्या आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्यासह हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या चळवळीचा गाजावाजा देशभर झाला. म्हणूनच क्रांतिकारकांच्या या भूमीतील पहिला स्वातंत्र्य दिनही तसा भारावलेला आणि मंतरलेलाच होता. सांगलीच्या राजवाड्यात, मिरजेच्या किल्ला भागात आणि तासगावच्या राजवाड्याच्या पिछाडीस झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी साक्षीदार असलेल्या दोघा स्वातंत्र्यसेनानींच्या हृदयात आजही तितक्याच ताज्या आहेत.

सांगलीतील बापूसाहेब पाटील म्हणाले की, सांगलीतील पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ््यास नागरिकांसह काही स्वातंत्र्यसैनिकही उपस्थित होते. त्यावेळी बºयाच स्वातंत्र्यसैनिकांची अद्याप तुरुंगातून सुटका व्हायची होती. स्वातंत्र्याचा पहिला सोहळा सांगलीतील राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर झाला होता. याठिकाणी चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी पहिल्यांदा याठिकाणी तिरंगा फडकवला होता. यावेळी माझ्यासह स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील, डॉ. देशपांडे, जयराम कुष्टे, बाळकृष्ट बुकटे, तुकाराम रखमाजी चौगुले, पुरंदर शेटे, दीपचंद व्होरा, आर. पी. पाटील यांच्यासह अनेक सेनानी उपस्थित होते.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने म्हणाले की, मला तासगावमधील झेंडावंदनाचा तो दिवस आणि जागा स्पष्टपणे आठवते. तासगावच्या राजवाड्याच्या पिछाडीस मोठे मैदान होते. त्याठिकाणी झेंडावंदन झाले होते. त्यावेळी शालेय मुलांना खाऊवाटप करण्यात आले होते. शालेय मुलांची एक मिरवणूकही तासगाव शहरातून निघाली होती. स्वातंत्र्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक मोर्चाही तासगाव शहरात काढण्यात आला होता.

मिरज संस्थानातही पहिला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला होता. शहरात पूर्वी किल्ला भागात असलेल्या पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी संस्थानचे नारायणराव तात्यासाहेब पटवर्धन राजे यांच्याहस्ते राष्टÑध्वज फडकविण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने मिरजेतील लक्ष्मी मार्केटला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अशापद्धतीने झेंडावंदन व स्वातंत्र्याच्या उत्सवाचा आनंद स्वातंत्र्यसैनिकांसह जनतेने लुटला होता.

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिवस