शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतामधील खळे होत आहे आता इतिहासजमा...

By admin | Updated: November 16, 2014 23:35 IST

ट्रॅक्टरच्या साहाय्याने मळणी : आधुनिक काळात सुगीचे मंतरलेले दिवस संपले

अमर पाटील - शिरशी --शेतकरी व शेती हे अतूट नाते आहे. सुगीच्या काळात सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये शेतातील ही कामे सलगपणे सुरु असतात. शेतातील मध्यवर्ती संपर्क कार्यालय म्हणून जोडणारे व सर्व मदतीला उभे असणारे ‘खळे’ हे आता आधुनिक काळात इतिहासजमा होत आहे. त्याची जागा आता प्लॅस्टिकच्या कागदाने घेतली आहे.सपाट माळरानावरील तण खुरपून त्यावर शेणाचा सडा टाकून सुमारे दोन गुंठे जागेवर सपाट गोलाकार जमीन तयार केली जाते. यामध्ये मधोमध केंद्रस्थानी एक लाकडी खांब रोवला जातो. त्याला ‘तिवडा’ असे म्हणतात. खळ्यामध्ये भाताची मळणी केली जाते. शेतातील भातपीक अंथरुण त्यावर गाई, म्हैशी तिवड्याला जुंपून गोलाकार फिरवल्या जात. काही शेतकरी बैलजोडी दगडी रोलरला जुंपून मळणी करत होते. अलीकडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने मळणी केली जात आहे.मागील १५ वर्षांपूर्वी सुगीचे हे दिवस शेतकऱ्यांच्या जीवनातील मंतरलेले दिवस असायचे. याच खळ्याशेजारी असणाऱ्या खोपीतूनच सगळा कारभार चालायचा. बांबू, गवताच्या साहाय्याने उभारलेली ही खोप ऊन, वारा, पाऊस, थंडीपासून त्यांचे संरक्षण करायची. दरवाजा नाही, परंतु चोरीही नाही. लाखमोलाचे धान्य उघड्यावरच पडलेले असायचे. मोकळ्या खळ्यावर धान्य वाळवणे, वारे देऊन स्वच्छ करणे आदी कामेही चालायची.कर्ता माणूस सुमारे दोन महिने येथे मुक्कामालाच असायचा. सकाळी, सायंकाळी गावातून जेवण पोहोच व्हायचे. झुंजूमुंजू होताच सुरु झालेला दिवस मध्यरात्रीपर्यंत काढलेल्या भाताच्या मळणीनेच संपायचा. दिवाळी सणाचे फार अप्रूप नसायचे. शेतातील कामे महत्त्वाची वाटायची. घरच्या सुगरणीने केलेला एखाद्दुसरा गोड पदार्थ व दिवाळीच्या सणादिवशीचे पाणी (अभ्यंगस्नान) इतकेच ते महत्त्व. रिकाम्या झालेल्या शेतात पुन्हा रब्बी पिकांची पेरणी. या दोन महिन्यात मालकाबरोबरच बैलांचीही खळ्याला सोबत असायची. रिकाम्या वेळेत गवतात चरणे व आराम. मालक कधी जुंपेल तेव्हा कामास तयार. हे मंतरलेले दिवस ज्या जुन्या पिढीतील शेतकऱ्यांनी अनुभवले, ते खरंच भाग्यवान. अन्यथा आतासारख्या आधुनिक काळात ताण—तणाव, कमी झालेली व आतबट्ट्यात आलेली शेती, लाडक्या बैलजोडीला गमावलेली शेती, ही राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता शेती करण्यास तरुण तयार नाहीत.बळिराजापुढील अनेक प्रश्न अनुत्तरीत शेतीला सरकारचे प्रोत्साहन नाही. वेळेवर वीज नाही. हमीभाव नाही. कारभार हाकणारं खोपीसारखं संपर्क कार्यालय कधीच मोडून गेलंय. जुन्या शेताला पाणी पाजायच्या मोटी भंगारात गेल्यात. बैलजोडी परवडत नाही. सुगीपुरता एखादा बैल, सुगी संपताच कसायाच्या हाती. हाता—तोंडाची मिळवणी करण्यासाठी पिकेल ते धान्य मिळेल त्या किमतीला व्यापाऱ्याला विकणे अनिवार्य झालेय. गोदामातील धान्यावर व्यापाऱ्याला कर्ज मिळतंय. वर्षभर जगायचं कसं? शेतीत गुंतवायला पैसा नाही. दूध धंद्याचीच तेवढी साथ. सरकार नावाची यंत्रणा याचा काही विचार करेल काय? खरोखर दु:ख भोगणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारची धोरणं ठरतील काय? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न गेली कित्येक वर्षे बळिराजासमोर उभे आहेत.