शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- पूरग्रस्तांच्या व्यथा: कृष्णामाई येते, प्रशासन इशारा देते, घरापासून दूर नेते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 18:34 IST

कर्नाळ रस्त्यावरील पूरग्रस्त महापालिकेच्या शाळांत आश्रयाला

हणमंत पाटील/संतोष भिसे

सांगली : कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढेल तसा विस्तारित भागाला पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कर्नाळ रस्त्यावरील पुराच्या भीतीने धास्तावलेल्या कुटुंबांनी घरे रिकामी करून महापालिकेच्या शाळांत आश्रय घेतला होता.सांगलीत आजवर तीनवेळा महापुराचे फटका सोसलेल्या नागरिकांनी यंदा लवकरच घराबाहेर पडायला सुरुवात केली. सांगलीत गुरुवारी कृष्णा नदीची पाणीपातळी ३५ फुटांवर जाऊ लागताच लोक घराबाहेर पडू लागले. गुरुवारी दुपारी कर्नाळ रस्त्यावर पाणी आले. रस्ता पूर्ण बंद होण्यापूर्वीच तेथील रहिवाशांनी शहरात धाव घेतली. काकानगर, दत्तनगरमधील लोकही मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले आहेत.

येथून सुरू आहे स्थलांतरकर्नाळ रस्त्यावरील काकानगर, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, शिवशंभो चौक, शिव मंदिर परिसर, पटवर्धन प्लॉट, जामवाडी, मगरमछ कॉलनी, इदगाह मैदान, सांगलीवाडीत गावडे मळा, कदमवाडी, स्मशानभूमी, शामरावनगर येथील रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. राहण्या-खाण्याचे साहित्य, जनावरे आणि आठवडाभराच्या कपड्यांसह रहिवासी घराबाहेर पडत आहेत.

महापालिकेकडून राहण्या-खाण्याची सोयमहापालिकेने शाळांमध्ये पूरग्रस्तांची राहण्याची सोय केली आहे. पंचशीलनगर शाळा, हिराबाग कॉर्नर येथील दोन शाळा, सह्याद्रीनगरमध्ये शाळा क्रमांक २३ येथे पूरग्रस्त राहत आहेत. महापालिकेने त्यांच्या जेवणाचीही सोय केली आहे. घराबाहेर पडणाऱ्या पूरग्रस्तांसाठी काही स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहनांची सोय करून दिली. जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था मात्र पूरग्रस्तांनाच करावी लागत आहे.

शुक्रवारी सायंकाळी ३९ फूट पातळीशुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फुटांपर्यंत स्थिर होती. दिवसभर पावसाने ओढ दिल्याने पातळीत विशेष वाढ झाली नाही.

महापालिकेची सज्जतामहापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष तथा वॉररुम सज्ज करण्यात आला आहे. मदत व बचावकार्य कक्षात अग्निशमन दलाचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या निवारा केंद्रांत आश्रय घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

वाळवा तालुक्यातही स्थलांतर वेगानेवाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठच्या कुटुंबांनी पशुधनासह सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. ऐतवडे खुर्द (पर्वतवाडी) येथील ४० कुटुंबांतील १५६ ग्रामस्थ व १३६ जनावरे सुरक्षितस्थळी गेली. चिकुर्डेमध्ये भोसले वस्तीवरील ४५ कुटुंबातील १५१ ग्रामस्थ व ३४५ जनावरे स्थलांतरित झाली. कणेगावमध्ये १८५ कुटुंबांतील ९०५ रहिवासी व ४९८ पशुधन सुरक्षितस्थळ नेण्यात आली. भरतवाडीमध्ये ३५ कुटुंबातील १७५ ग्रामस्थ व १०८ जनावरांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर