शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Sangli- पूरग्रस्तांच्या व्यथा: कृष्णामाई येते, प्रशासन इशारा देते, घरापासून दूर नेते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 18:34 IST

कर्नाळ रस्त्यावरील पूरग्रस्त महापालिकेच्या शाळांत आश्रयाला

हणमंत पाटील/संतोष भिसे

सांगली : कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढेल तसा विस्तारित भागाला पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कर्नाळ रस्त्यावरील पुराच्या भीतीने धास्तावलेल्या कुटुंबांनी घरे रिकामी करून महापालिकेच्या शाळांत आश्रय घेतला होता.सांगलीत आजवर तीनवेळा महापुराचे फटका सोसलेल्या नागरिकांनी यंदा लवकरच घराबाहेर पडायला सुरुवात केली. सांगलीत गुरुवारी कृष्णा नदीची पाणीपातळी ३५ फुटांवर जाऊ लागताच लोक घराबाहेर पडू लागले. गुरुवारी दुपारी कर्नाळ रस्त्यावर पाणी आले. रस्ता पूर्ण बंद होण्यापूर्वीच तेथील रहिवाशांनी शहरात धाव घेतली. काकानगर, दत्तनगरमधील लोकही मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले आहेत.

येथून सुरू आहे स्थलांतरकर्नाळ रस्त्यावरील काकानगर, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, शिवशंभो चौक, शिव मंदिर परिसर, पटवर्धन प्लॉट, जामवाडी, मगरमछ कॉलनी, इदगाह मैदान, सांगलीवाडीत गावडे मळा, कदमवाडी, स्मशानभूमी, शामरावनगर येथील रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. राहण्या-खाण्याचे साहित्य, जनावरे आणि आठवडाभराच्या कपड्यांसह रहिवासी घराबाहेर पडत आहेत.

महापालिकेकडून राहण्या-खाण्याची सोयमहापालिकेने शाळांमध्ये पूरग्रस्तांची राहण्याची सोय केली आहे. पंचशीलनगर शाळा, हिराबाग कॉर्नर येथील दोन शाळा, सह्याद्रीनगरमध्ये शाळा क्रमांक २३ येथे पूरग्रस्त राहत आहेत. महापालिकेने त्यांच्या जेवणाचीही सोय केली आहे. घराबाहेर पडणाऱ्या पूरग्रस्तांसाठी काही स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहनांची सोय करून दिली. जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था मात्र पूरग्रस्तांनाच करावी लागत आहे.

शुक्रवारी सायंकाळी ३९ फूट पातळीशुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फुटांपर्यंत स्थिर होती. दिवसभर पावसाने ओढ दिल्याने पातळीत विशेष वाढ झाली नाही.

महापालिकेची सज्जतामहापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष तथा वॉररुम सज्ज करण्यात आला आहे. मदत व बचावकार्य कक्षात अग्निशमन दलाचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या निवारा केंद्रांत आश्रय घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

वाळवा तालुक्यातही स्थलांतर वेगानेवाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठच्या कुटुंबांनी पशुधनासह सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. ऐतवडे खुर्द (पर्वतवाडी) येथील ४० कुटुंबांतील १५६ ग्रामस्थ व १३६ जनावरे सुरक्षितस्थळी गेली. चिकुर्डेमध्ये भोसले वस्तीवरील ४५ कुटुंबातील १५१ ग्रामस्थ व ३४५ जनावरे स्थलांतरित झाली. कणेगावमध्ये १८५ कुटुंबांतील ९०५ रहिवासी व ४९८ पशुधन सुरक्षितस्थळ नेण्यात आली. भरतवाडीमध्ये ३५ कुटुंबातील १७५ ग्रामस्थ व १०८ जनावरांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर