शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सांगली जिल्ह्यातील सहा मतदारसंघांवर घराणेशाहीचा पगडा; २०१४ च्या मोदी लाटेने बदलली समीकरणे

By हणमंत पाटील | Updated: October 22, 2024 13:50 IST

सध्याच्या जिल्ह्यातील राजकारणात घराणेशाहीतील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे

सांगली : ऐककाळी राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सांगली जिल्ह्यात ३५ ते ४० वर्षांपासून घराणेशाहीचा पगडा कायम आहे. त्यासाठी जत व मिरज या दोन राखीव मतदारसंघाचा अपवाद आहे. उर्वरित सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव-पलूस, इस्लामपूर व शिराळा या सहा मतदारसंघांतील राजकारण केवळ दोन ते तीन कुटुंबाभोवती फिरताना दिसत आहे. सध्याच्या जिल्ह्यातील राजकारणात घराणेशाहीतील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. मात्र, २००९ ची मतदारसंघ पुनर्रचना व २०१४ च्या मोदी लाटेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलत आहे. त्यामुळे नवीन चेहरे विधानसभेला पुढे येत आहेत.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सांगली जिल्ह्यातून (जुना दक्षिण सातारा) भूमिगत कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, जी. डी. लाड, एन. डी. पाटील व क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांचे नेतृत्व १९८० च्या दशकापर्यंत राजकारणात पुढे आले. १९९० या काळात दुसऱ्या पिढीतील जयंत पाटील, डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, संभाजीराव पवार, सुरेश खाडे, अजितराव घोरपडे, संजय पाटील, अनिल बाबर, सदाशिव पाटील, पृथ्वीराज देशमुख, शिवाजीराव नाईक यांचे नेतृत्व पुढे आले.२००९ साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे जिल्ह्यातील घराणेशाही व तडजोडीच्या राजकारणाला धक्के बसू लागले. पहिला धक्का २०१४ च्या मोदी लाटेत बसला. त्यामुळे सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, मानसिंगराव नाईक, विश्वजित कदम, विक्रम सावंत असे नवे चेहरे राजकारणात आले. बदलत्या राजकीय समीकरणात घराणेशाहीचा पगडा मात्र कायम राहिला आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत रोहित पाटील, प्रभाकर पाटील, सुहास बाबर, ॲड. वैभव पाटील, राजवर्धन घोरपडे, अशी घराणेशाहीचा पगडा असलेली काही युवा नेत्यांची नावे पुढे येताना दिसत आहेत.

जत व मिरज राखीवचा अपवाद..२००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेपर्यंत जत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे अनेकदा या मतदारसंघाचे नेतृत्व बाहेरील आयात उमेदवारांनी केले. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला होऊन मिरज राखीव झाला. त्यामुळे २००४ ला जतचे नेतृत्व करणारे आमदार सुरेश खाडे हे २००९ नंतर मिरजेचे नेतृत्व करू लागले. हे दोन मतदारसंघ राखीव राहिल्याने घराणेशाहीच्या प्रभावापासून दूर राहिले.

अशी आहे, जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतील घराणेशाहीसांगली सांगली विधानसभा मतदारसंघात १९७८ ते २००९ पर्यंत म्हणजे ३१ वर्षे वसंतदादा पाटील व संभाजीराव पवार या दोन घराण्यांत सत्ता फिरत होती. मधल्या काळात दिनकर पाटील यांना संधी मिळाली. हा अपवाद वगळता २०१४ ला देशातील मोदी लाटेच्या तडाख्यात सुधीर गाडगीळ हे नवे नेतृत्व सांगली मतदारसंघाला मिळाले. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा वसंतदादा यांच्या घराण्यातून जयश्री पाटील व गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील इच्छुक आहेत.

तासगाव-कवठेमहांकाळ..तासगाव विधानसभा मतदारसंघात १९७८ ते १९९० या काळात दिनकरराव पाटील हे निवडून येत होते. त्यानंतर १९९० ते २०१४ या काळात मतदारसंघाचे नेतृत्व आर. आर. पाटील यांनी केले. त्यांच्या निधनानंतर २०१५ ते २०२४ त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या आमदार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

खानापूर-आटपाडी..१९८०ला हणमंतराव पाटील हे आमदार झाले. १९९० साली अनिल बाबर निवडून आले. त्यानंतर गेल्या ३४ ते ४४ वर्षांपासून पाटील व बाबर या घराण्याच्या हाती खानापूर मतदारसंघाचे नेतृत्व आहे. त्याला १९८५ साली संपतराव माने व १९९५ साली राजेंद्र देशमुख यांचा अपवाद आहे. २००४ ते २०१४ या काळात ॲड. सदाशिव पाटील आणि २०१४ ते २०२४ या काळात पुन्हा अनिल बाबर या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. आगामी २०२४ च्या निवडणुकीत पुढच्या पिढीतील सुहास बाबर व ॲड. वैभव पाटील हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

इस्लामपूर (वाळवा)..आताच्या इस्लामपूर मतदारसंघाचे नाव पूर्वी वाळवा होते. पूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व राजारामबापू पाटील करीत होते. १९९० पासून सलग ३४ वर्षे या मतदारसंघाचे आमदार म्हणून जयंत पाटील हे नेतृत्व करीत आहेत. २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे वडिलांसाठी मोर्चेबांधणी करीत निवडणुकीची धुरा सांभाळताना दिसत आहेत.

शिराळा..१९७८ ते १९९५ या काळात शिराळा मतदारसंघात शिवाजीराव देशमुख यांचे एकमुखी नेतृत्व होते. १९९५ ते २००९ या काळात शिवाजीराव नाईक हे निवडून आले. २००९ ते २०२४ मानसिंगराव नाईक हे शिराळा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या ४६ वर्षांपासून देशमुख व नाईक या कुटुंबांभोवती शिराळ्याचे राजकारण फिरताना दिसत आहे.

कडेगाव-कडेपूरपूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव आता कडेगाव-कडेपूर झाले आहे. या मतदारसंघातून १९८५ ते १९९५ या काळात डॉ. पतंगराव कदम हे नेतृत्व पुढे आले. त्यानंतर १९९५ ते १९९६ अशा दोन निवडणुकांत संपतराव देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांनी नेतृत्व केले. १९९८ ते २०१८ पर्यंत पुन्हा डॉ. पतंगराव कदम यांनी नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतर २०१८ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व डॉ. विश्वजित कदम हे करीत आहेत. याचा अर्थ, १९८५ ते २०२४ या ३९ वर्षांपासून कदम व देशमुख यांच्या कुटुंबाभोवती मतदारसंघाचे राजकारण फिरत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Vasantdada Patilवसंतदादा पाटीलPatangrao Kadamपतंगराव कदम