शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 14:56 IST

खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम गावे अद्यापही सुविधेपासून वंचित

दिलीप मोहिते

विटा : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळख असलेली बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे ही तीन गावे अद्यापही मोबाईलच्या इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत. मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सध्या घराच्या छतावर बसून सुरू आहे.

खानापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे ही तीन गावे डोंगरी भागात आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या गावांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट व नेटवर्कची समस्या सतावत आहे. कोरोनाच्या काळात अतिगंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका मागवायची असल्यास शुक्राचार्यपर्यंतचा दोन किलोमीटरचा प्रवास करून संपर्क साधावा लागत आहे.

सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, या तिन्ही गावात विद्यार्थ्यांना पुरसे नेटवर्क व इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घराच्या छताचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक विद्यार्थी उंच असलेल्या, दुमजली इमारतीच्या छतावर बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.पाच महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी मोबाईल कंपन्यांशी पत्रव्यवहार करून बैठकीचे सूतोवाच दिले होते. पण, याबाबत बैठकही झाली नाही व मोबाईल कंपन्यांनी या तीन गावांना इंटरनेट नेटवर्क देण्याचाही प्रयत्न केला नाही.

विद्यार्थ्यांसह नागरिक व नोकरदारांचेही हाल होत आहेत. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे या तीन गावांसाठी मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

येत्या आठवड्यात बैठक

भारत दूरसंचार निगम व खासगी कंपन्यांना पत्रव्यवहार केला होता. परंतु, ग्रामपंचायत निवडणुका, अन्य प्रशासकीय कामे व कोरोनामुळे बैठक घेता आली नाही. येत्या आठवड्यात विटा तहसील कार्यालयात बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.

जनआंदोलनाचा इशारा

खानापूर पूर्वभागातील या तीन गावांतील नागरिक व विद्यार्थ्यांचे मोबाईल नेटवर्कअभावी हाल होत आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे संघटक कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीEducationशिक्षणonlineऑनलाइनMobileमोबाइलStudentविद्यार्थी