शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पाकिस्तानच्या साखरेमुळे जिल्ह्यात कारखाने संकटात-क्विंटलला दोनशे रुपयांनी दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:45 IST

 अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया ...

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनीही फिरवली पाठ

 अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया हप्त्याची सर्वच बिले थांबविल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१७-१८ वर्षाचा गळीत हंगाम चालू झाला, तेव्हा प्रतिक्विंटल साखरेचा दर ३८०० ते ३६०० रुपये होता. देशात साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे दराची घसरण चालू होती. कारखान्यांचे गळीत हंगाम संपताच प्रतिक्विंटल साखरेचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत होते. या परिस्थितीमध्येच कारखानदारांचा आर्थिक अडचणीतून प्रवास चालू होता. राज्य आणि जिल्हा बँकांनी साखरेचे मूल्यांकनही कमी केल्यामुळे ऊस उत्पादकांचे पैसेही काही कारखान्यांना देता आले नाहीत.

जिल्ह्यातील चार ते पाच साखर कारखान्यांनी गळीत हंगामाच्या शेवटी आलेल्या उसाची बिलेही शेतकºयांना दिली नाहीत. दुसºया हप्त्याची बिले तर सर्वच कारखान्यांनी दिली नाहीत. कारखानदारांच्या आर्थिक कोंडीचा शेतकºयांनाच फटका बसला आहे. शासनाने याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. महाराष्ट्रात २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पूर्वीची शिल्लक साखर असताना, दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातून ३० हजार क्विंटल साखर आयात केली. साखर आयात केल्याची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रातील साखरेचे दर गडगडले आहेत.

मागील आठवड्यात लहान साखरेचे दर प्रतिक्विंटल २६०० ते २६५० रुपये होते. मंगळवार दि. १५ रोजी याच साखरेचे दर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये झाल्याचे साखर व्यापारी आणि कारखानदारांनी सांगितले. चांगल्या दर्जाच्या साखरेचे दर आठ दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल २६५० ते २८०० रुपयांपर्यंत होते. यामध्येही प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होऊन मंगळवार, दि. १५ रोजी २५०० ते २५५० रुपये दर झाले आहेत. पाकिस्तानच्या साखरेने कारखानदार आणि शेतकºयांचे कंबरडेच मोडल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानातून साखर आयात झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडील साखरेची खरेदीही व्यापाºयांनी थांबविली आहे. अनेक कारखान्यांच्या साखर विक्रीच्या निविदांनाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. हा धोका लक्षात घेऊन तरी सरकारने यापुढे तरी साखरेची आयात थांबवावी.आयात साखरेमुळे डोकेदुखी वाढलीपाकिस्तानची साखर मुंबईत आल्याची बातमी समजल्यापासून व्यापाºयांनी साखर खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. दरातही मोठी घसरण चालू आहे. चार दिवसात क्विंटलला दोनशे रुपयांनी दर घसरुन सध्या लहान साखर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये आणि मध्यम साखर प्रति क्विंटल २५०० ते २५५० रुपये झाली आहे. साखरेच्या विक्रीतून शेतकºयांची बिले आणि कारखाना व्यवस्थापनाचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगर कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.शेतकरी, कामगारांचा संयम पाहू नये : अरुण लाडदेशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याची सरकारला कल्पना असतानाही पाकिस्तानातून साखर आयात केली. यातून सहकारी साखर कारखानदारी मोडकळीस आणण्याचाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारखानदारी मोडकळीस आल्यामुळे शेतकरी, कामगारांवर बेकारीची वेळ येणार आहे. म्हणूनच शेतकरी आणि कामगारांचा आणखी अंत केंद्र आणि राज्य सरकारने पाहू नये, असा इशारा क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली