शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पाकिस्तानच्या साखरेमुळे जिल्ह्यात कारखाने संकटात-क्विंटलला दोनशे रुपयांनी दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:45 IST

 अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया ...

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनीही फिरवली पाठ

 अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया हप्त्याची सर्वच बिले थांबविल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१७-१८ वर्षाचा गळीत हंगाम चालू झाला, तेव्हा प्रतिक्विंटल साखरेचा दर ३८०० ते ३६०० रुपये होता. देशात साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे दराची घसरण चालू होती. कारखान्यांचे गळीत हंगाम संपताच प्रतिक्विंटल साखरेचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत होते. या परिस्थितीमध्येच कारखानदारांचा आर्थिक अडचणीतून प्रवास चालू होता. राज्य आणि जिल्हा बँकांनी साखरेचे मूल्यांकनही कमी केल्यामुळे ऊस उत्पादकांचे पैसेही काही कारखान्यांना देता आले नाहीत.

जिल्ह्यातील चार ते पाच साखर कारखान्यांनी गळीत हंगामाच्या शेवटी आलेल्या उसाची बिलेही शेतकºयांना दिली नाहीत. दुसºया हप्त्याची बिले तर सर्वच कारखान्यांनी दिली नाहीत. कारखानदारांच्या आर्थिक कोंडीचा शेतकºयांनाच फटका बसला आहे. शासनाने याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. महाराष्ट्रात २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पूर्वीची शिल्लक साखर असताना, दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातून ३० हजार क्विंटल साखर आयात केली. साखर आयात केल्याची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रातील साखरेचे दर गडगडले आहेत.

मागील आठवड्यात लहान साखरेचे दर प्रतिक्विंटल २६०० ते २६५० रुपये होते. मंगळवार दि. १५ रोजी याच साखरेचे दर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये झाल्याचे साखर व्यापारी आणि कारखानदारांनी सांगितले. चांगल्या दर्जाच्या साखरेचे दर आठ दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल २६५० ते २८०० रुपयांपर्यंत होते. यामध्येही प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होऊन मंगळवार, दि. १५ रोजी २५०० ते २५५० रुपये दर झाले आहेत. पाकिस्तानच्या साखरेने कारखानदार आणि शेतकºयांचे कंबरडेच मोडल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानातून साखर आयात झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडील साखरेची खरेदीही व्यापाºयांनी थांबविली आहे. अनेक कारखान्यांच्या साखर विक्रीच्या निविदांनाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. हा धोका लक्षात घेऊन तरी सरकारने यापुढे तरी साखरेची आयात थांबवावी.आयात साखरेमुळे डोकेदुखी वाढलीपाकिस्तानची साखर मुंबईत आल्याची बातमी समजल्यापासून व्यापाºयांनी साखर खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. दरातही मोठी घसरण चालू आहे. चार दिवसात क्विंटलला दोनशे रुपयांनी दर घसरुन सध्या लहान साखर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये आणि मध्यम साखर प्रति क्विंटल २५०० ते २५५० रुपये झाली आहे. साखरेच्या विक्रीतून शेतकºयांची बिले आणि कारखाना व्यवस्थापनाचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगर कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.शेतकरी, कामगारांचा संयम पाहू नये : अरुण लाडदेशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याची सरकारला कल्पना असतानाही पाकिस्तानातून साखर आयात केली. यातून सहकारी साखर कारखानदारी मोडकळीस आणण्याचाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारखानदारी मोडकळीस आल्यामुळे शेतकरी, कामगारांवर बेकारीची वेळ येणार आहे. म्हणूनच शेतकरी आणि कामगारांचा आणखी अंत केंद्र आणि राज्य सरकारने पाहू नये, असा इशारा क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली