शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

वातावरणातील बदलाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:34 PM

मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा..घाटमाथ्यावरील स्थिती हवामान बदलाने द्राक्षबागायतदार हवालदिलपावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई

घाटनांद्रे ,दि. ३० :  मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

घाटमाथ्यावरील नागज, कुची, जाखापूर, कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात पोषक व पूरक वातावरण असल्यामुळे बळीराजाने नगदी पीक म्हणून द्राक्ष उत्पादनावर भर दिल्याने या भागात द्राक्षक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून घाटमाथ्यावर एकही दमदार पाऊस न झाल्याने अद्यापही तलाव, ओढे, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत आहेत.

कूपनलिका, विहिरीही जेमतेमच आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वेळोवेळी सहन करावा लागत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागाही काढून टाकल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी टॅँकरच्या पाण्याद्वारे बागा कशातरी जगविल्या. घाटमाथ्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, तसेच खते व औषधांच्या वाढत्या किमतीला सामोरे जात पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या द्राक्षबागा, निसर्गात सध्या अचानक होणाऱ्या वातावरण बदलाने पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत.

अशा भीषण काळातही शेतकऱ्यांनी बागा जगविल्या. पण गेल्या आठवड्यापासून दिवसा कडक ऊन, कधी तर पावसाचा शिडकावा, रात्री थंडी व पहाटेच्या वेळी धुके, यामुळे भुरी, दावण्या, मिलिबग्ज यासारख्या रोगांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून शेतकºयांना चोवीस तास हवामानाचा वेध घेत बागेतच थांबावे लागत आहे.सध्या जवळजवळ सर्वच बागांची फळछाटणी झाली असून, काही बागा फुलोऱ्यात आहेत.

त्याचबरोबर आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचे मणी मऊ पडू लागले आहेत. तेथे माल तयार होऊ लागला आहे. अशा द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा हातून जातात की काय, याचा विचार करत शेतकरी रात्रं-दिवस बागांवर औषध फवारणी करत आहे.

दुष्काळात तेरावा..हवामानातील बदलांचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याची सोय करून द्राक्षबागा जगविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यानंतर हवामानातील बदलांचा फटका बसून बागा हातच्या जाऊ लागल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशीच अवस्था बागायतदारांची झाली आहे. द्राक्षबागायतदार या हवामान बदलाने चांगलाच हवालदिल झाला आहे. ​

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली