शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

'रडायचं नाही, सगळं ठीक होईल', पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देणार नाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 14:21 IST

राज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे.

ठळक मुद्देराज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे.नाना पाटेकर यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले.

कोल्हापूरसांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.  

सांगली आणि कोल्हापूर येथे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. मंगळवारी दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. अखेर सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

राज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने पुढे येत आहे. मराठी कलाकारांनंतर बिग बी अमिताभ यांनीही पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केलंय. तर, अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत देत मदतीचं आवाहन केलंय. त्यानंतर आता अभिनेता आणि नाम या सामाजिक संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले. नाम फाऊंडेशनच्या कार्याप्रमाणेच पूरग्रस्तांनाही मदत करणार असल्याचं नानाने यावेळी म्हटले. 

शिरोळच्या पद्मराज विद्यालयात नाना पाटेकर यांनी भेट देत तेथील पूरग्रस्तांना धीर दिला. पूरग्रस्तांचे अश्रू पुसताना काळजी करू नका, रडायचं नाही, सगळं ठीक होईल, असे नानाने म्हटले. तसेच, केवळ मी एकटाच नाही, सगळेजण मदत करत आहेत. मी, मकरंद्या किंवा कुणीही एकटा हे मदतकार्य करत नाही. सर्वचजण मदत करत आहेत, लोकं मदत देतात. एवढी मोठी आपत्ती आलीय, तात्काळ याच निवारण शक्य होणार नाही. 

मी सर्वांचा अतिशय आभारी आहे, येथे सर्वचजण मदत करताना मला दिसत आहेत. इथं जेवण पाहिलं, किती चांगलं जेवण आहे, कुणी दिलंय हे?. आपणच सर्वांनी ही मदत केलीय, असे म्हणत सर्वांच्या मदतीनंच हे पुनर्वसन शक्य असल्याचे नानाने म्हटले आहे. तसेच, सरकारही त्यांचं काम करतंय, सरकार म्हणजे कोण रे... माणसंच आहेत ना, असे म्हणत सरकारही मदतकार्यात सोबत असल्याचे नानाने सूचवले आहे. दरम्यान, यावेळी नानाला पाहून अनेकजण भावुक झाले होते, तर कित्येकांना अश्रू अनावर झाले होते.   

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरfloodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगली