शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

‘ताकारी’च्या चौथ्या आवर्तनास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:34 PM

प्रताप महाडिक । कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी ...

ठळक मुद्देपिके धोक्यात : सिंचन योजनांसाठी कोयनेतून विसर्ग वाढविण्याची गरज

प्रताप महाडिक ।कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला असून याची गंभीर दखल घेऊन शासनाने सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे. वीज बिलांच्या शुल्कामध्ये टंचाईचा कोट्यवधी रुपयांचा खर्च बचत होण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी विहित वेळेत वसूल होते. त्यामुळे योजना सक्षमपणे व अविरतपणे कार्यरत राहिली. वीजबिलाच्या ८१-१९ फॉर्म्युल्यामुळे तर ही योजना अधिक सक्षम झाली. सध्या ताकारी योजनेची ९ कोटी ५० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. परंतु साखर कारखान्यांकडून ७ कोटी रुपयांची वसूल झालेली पाणीपट्टी येणेबाकी आहे. राज्य शासनाकडून टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची मागील आणि चालू वर्षाची ५ कोटी ८८ लाख इतकी येणेबाकी आहे. याशिवाय चालूवर्षी दिलेल्या आवर्तनाची ८१ टक्के याप्रमाणे २ कोटी इतकी वीजबिलाची रक्कम येणेबाकी आहे. यामुळे योजना सक्षम असताना, आवर्तन बंद का, असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होण्यास होणाºया विलंबाचे खापर कालवा अस्तरीकरणाच्या सुरू असलेल्या कामावर फोडले जात आहे. परंतु आवर्तन कालावधित अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी केली आहे.

चौथे आवर्तन शिल्लकचालूवर्षी ताकारी योजनेची रब्बी हंगामात दोन, तर उन्हाळी हंगामात एक अशी तीन आवर्तने पूर्ण झाली आहेत. अद्यापही उन्हाळी हंगामातील एक आवर्तन बाकी आहे. हे आवर्तनही तातडीने द्यावे, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. 

अजूनही साडेतीन टीएमसी पाणी हक्काचेताकारी योजनेला ९ टीएमसी पाणी मंजूर आहे. यापैकी पहिल्या तीन आवर्तनांसाठी साडेपाच टीएमसी पाणीवापर झाला आहे. योजनेच्या वाट्याचे व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अजूनही साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी