शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सिंचन प्रकल्पांसाठी डिसेंबरची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 8:55 PM

राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही.

ठळक मुद्देयोजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

आटपाडी : राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टÑाच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. दुष्काळी भागातील योजनांचे प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत ९० टक्के पूर्ण करा अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही. जे-जे करावे लागेल ते करून या सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार गणपतराव देशमुख यांनी दिला.

येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरू केलेल्या शेतमजूर, शेतकरी-कष्टकरी संघटनेच्यावतीने २७ वी पाणी परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आ. देशमुख म्हणाले, परिषदेमध्ये आज जे ठराव केले आहेत, त्या सर्व ठरावांची तातडीने अंमलबजावणी करावी. यासाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींना एकत्र करू. त्या-त्या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटू. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ६० वर्षांच्या काळात नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही आयुष्यभर दुष्काळ भोगला; पण पुढच्या पिढीच्या वाट्याला तरी ही परिस्थिती येऊ नये, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू.

परिषदेचे निमंत्रक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णांनी दुष्काळी भागात पाणी येऊ शकते, त्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले. तेव्हा काही मंडळींना हे दिवास्वप्न वाटले होते; पण जनतेच्या रेट्यामुळे दुष्काळी भागात पाणी आले. ८ जून हुन्नुरला विभागीय पाणी परिषद घेतली. योजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेचे १६ पंप सुरू होणे गरजेचे आहे. मात्र ६ पंपच सुरू असतात. टेंभूचे अधिकारी म्हणतात, आम्ही दोन महिन्याला आवर्तन देऊ शकतो. मग कुठे अडले आहे? वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे. यावेळी प्रा. बाळासाहेब नायकवडी, प्रा. विश्वंभर बाबर, अ‍ॅड. बाबासाहेब बागवान, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. स्मृतिका लवटे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत देशमुख, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांची भाषणे झाली.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईStrikeसंपSangliसांगली