शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

नुकसानीचे त्रांगडे अन् पंचनाम्याचे घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:53 IST

परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. त्यामुळे मुदतीची डेडलाईन पूर्ण कशी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनुकसानीचे त्रांगडे अन् पंचनाम्याचे घोंगडेअटी न लावता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत

दत्ता पाटील तासगाव : परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. त्यामुळे मुदतीची डेडलाईन पूर्ण कशी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे लवकर पंचनामे न झाल्याने नुकसान झालेले खरिपाचे पीक शेतात तसेच पडून द्यायचे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे खरीप हातचा गेला, तरी रब्बीसाठी तयारी करताना पंचनाम्याचे घोंगडे अडकल्याचे चित्र आहे.तासगाव तालुक्यात एकूण ४३ हजार २७७ हेक्टर इतके पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी प्रशासनाच्या नजरअंदाजानुसार ३४ हजार १०४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने तालुक्याला झोडपून काढल्याने तालुक्यातील प्रमुख फळपीक असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या सर्व द्राक्षबागांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.

खरिपाचीही सर्व पिके वाया गेली. ऐन खरीप काढणीच्या हंगामातच पावसाने सुरुवात केल्याने, बहुतांश पिके वाया गेली. ज्वारीपासून ते भुईमुगापर्यंत सर्वच पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत, प्रशासनाकडून तातडीने पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या तिघांची समिती नेमण्यात आली.

या समितीकडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हे पंचनामे करतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. शेतात चिखल असल्याने वाहने रस्त्यावर लावून अर्धा, एक किलोमीटर चालत जावे लागते. त्याठिकाणी शेतमालक, पंच घेऊन जिओ टॅगिंगद्वारे फोटो काढून पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली जाते.नियमानुसार पंचनामे करताना दिवसभरात केवळ ५० ते ६० शेतकऱ्यांचेच पंचनामे होत आहेत. प्रशासन बांधावर पोहोचून पंचनामे करत असताना, पंचनाम्याची वेळखाऊ पध्दत आणि भौगोलिक परिस्थिती यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या ७ तारखेच्या डेडलाईनपर्यंत पंचनामे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने पंचनामे करण्याची मुदत वाढवून शंभर टक्के पंचनामे करून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.दुसरीकडे खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेल्यानंतर, शेतकरी रब्बीच्या पिकाची आस लावून बसला आहे. शेतातील ज्वारी पूर्ण काळी पडली आहे. अनेक ठिकाणी शेतातच उगवण झाली आहे. भुईमुगासह सर्वच खरिपाच्या पिकांची हीच अवस्था आहे. त्यामुळे नुकसान झालेले पीक किती दिवस शेतात ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

जिओ टॅगिंंगमुळे शेतात पीकच नसेल, तर नुकसान भरपाई कशी मिळणार आणि पीक काढले नाही, तर रब्बी पेऱ्याची तयारी कशी करणार? या कात्रीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे जाचक अटी न लावता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगली