शहरं
Join us  
Trending Stories
1
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
2
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
3
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
4
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
5
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
6
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
7
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
8
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
9
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
11
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
12
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
13
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
14
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
15
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
16
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
17
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
18
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
19
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
20
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी

नुकसानीचे त्रांगडे अन् पंचनाम्याचे घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:53 IST

परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. त्यामुळे मुदतीची डेडलाईन पूर्ण कशी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनुकसानीचे त्रांगडे अन् पंचनाम्याचे घोंगडेअटी न लावता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत

दत्ता पाटील तासगाव : परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. त्यामुळे मुदतीची डेडलाईन पूर्ण कशी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे लवकर पंचनामे न झाल्याने नुकसान झालेले खरिपाचे पीक शेतात तसेच पडून द्यायचे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे खरीप हातचा गेला, तरी रब्बीसाठी तयारी करताना पंचनाम्याचे घोंगडे अडकल्याचे चित्र आहे.तासगाव तालुक्यात एकूण ४३ हजार २७७ हेक्टर इतके पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी प्रशासनाच्या नजरअंदाजानुसार ३४ हजार १०४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने तालुक्याला झोडपून काढल्याने तालुक्यातील प्रमुख फळपीक असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या सर्व द्राक्षबागांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.

खरिपाचीही सर्व पिके वाया गेली. ऐन खरीप काढणीच्या हंगामातच पावसाने सुरुवात केल्याने, बहुतांश पिके वाया गेली. ज्वारीपासून ते भुईमुगापर्यंत सर्वच पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत, प्रशासनाकडून तातडीने पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या तिघांची समिती नेमण्यात आली.

या समितीकडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हे पंचनामे करतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. शेतात चिखल असल्याने वाहने रस्त्यावर लावून अर्धा, एक किलोमीटर चालत जावे लागते. त्याठिकाणी शेतमालक, पंच घेऊन जिओ टॅगिंगद्वारे फोटो काढून पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली जाते.नियमानुसार पंचनामे करताना दिवसभरात केवळ ५० ते ६० शेतकऱ्यांचेच पंचनामे होत आहेत. प्रशासन बांधावर पोहोचून पंचनामे करत असताना, पंचनाम्याची वेळखाऊ पध्दत आणि भौगोलिक परिस्थिती यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या ७ तारखेच्या डेडलाईनपर्यंत पंचनामे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने पंचनामे करण्याची मुदत वाढवून शंभर टक्के पंचनामे करून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.दुसरीकडे खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेल्यानंतर, शेतकरी रब्बीच्या पिकाची आस लावून बसला आहे. शेतातील ज्वारी पूर्ण काळी पडली आहे. अनेक ठिकाणी शेतातच उगवण झाली आहे. भुईमुगासह सर्वच खरिपाच्या पिकांची हीच अवस्था आहे. त्यामुळे नुकसान झालेले पीक किती दिवस शेतात ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

जिओ टॅगिंंगमुळे शेतात पीकच नसेल, तर नुकसान भरपाई कशी मिळणार आणि पीक काढले नाही, तर रब्बी पेऱ्याची तयारी कशी करणार? या कात्रीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे जाचक अटी न लावता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगली