शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:56 IST

ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.

ठळक मुद्देआटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसानयंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली

अविनाश बाड आटपाडी : ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.आटपाडी तालुक्यात सध्या फक्त डाळिंब हेच नगदी पीक आहे. या भागातील वातावरणात दर्जेदार उत्पन्न देणारे डाळिंब यंदा मात्र तालुक्यावर रुसले आहे. २०१७ आणि २०१८ ही वर्षे दुष्काळाची गेली. २०१७ मध्ये तालुक्यात ४१५ मि. मी. पावसाची नोंद असली तरी, ५ महिन्यात ४० दिवसांच्या अंतराने पडलेल्या पावसाची नोंद आहे.

२०१७ मध्ये १ ते २ मि. मी. पासून १५ मि. मी. पर्यंतच्या कसलाही उपयोग न होणाऱ्या ३१ दिवसांच्या पावसाची नोंद आहे. त्यामुळे एकूण आकडेवारी फुगली. दि. ७ सप्टेंबर २०१७ रोजी तालुक्यात सरासरी ६८ मि. मी. एवढा एकच दिवस पाऊस पडला. त्यानंतर २०१८ मध्ये दि. १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यात सरासरी ५६ मि. मी. पाऊस एका दिवशी पडला.

बाकी विरळ पावसाचे ७ दिवस मिळून १८६ मि. मी. एवढा पाऊस पडला. पावसात एवढा मोठा खंड पडल्याने डाळिंबाची अवस्था वाईट झाली. त्यात उन्हाळ्यात मे महिन्यात ४० अंशापेक्षा जास्त तापमान १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिले. यंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.

शेतकऱ्यांनी जून महिन्यात डाळिंबाचा मृग बहर विकतचे पाणी टॅँकरने घालून धरला. पण आटपाडी तालुक्यातील डाळिंबाच्या इतिहासात यंदा प्रथमच फळधारणाच झाली नाही. तेल्या रोगाच्या आक्रमणापेक्षा हे वाईट आहे. बहर धरल्यावर कळी २२ व्या दिवशी झाडावर दिसते. तर ३५-३६ व्या दिवशी सेटींग (फलधारणा) होते.

सव्वा महिन्यात फलधारणा होणे अपेक्षित आहे. यंदा कळ्या लागतात; पण त्याला फळ लागण्याऐवजी फांदीवर हिरव्या काड्या म्हणजे फुटवा वाढत आहे. दरवर्षी खोडालाही फुटवा असतो. शेतकरी फळाचे अन्न फुटव्याला जाऊन झाड, फळे, अशक्त होऊ नयेत म्हणून काढतात. यंदा जूनपासून दर ११ व्या दिवशी फुटवा येतो. १५ व्या दिवशी शेतकरी काढतात. असे ७ ते ८ वेळा झाले आहे. नुसता खर्च वाढत आहे.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली