शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:56 IST

ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.

ठळक मुद्देआटपाडी तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसानयंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली

अविनाश बाड आटपाडी : ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.आटपाडी तालुक्यात सध्या फक्त डाळिंब हेच नगदी पीक आहे. या भागातील वातावरणात दर्जेदार उत्पन्न देणारे डाळिंब यंदा मात्र तालुक्यावर रुसले आहे. २०१७ आणि २०१८ ही वर्षे दुष्काळाची गेली. २०१७ मध्ये तालुक्यात ४१५ मि. मी. पावसाची नोंद असली तरी, ५ महिन्यात ४० दिवसांच्या अंतराने पडलेल्या पावसाची नोंद आहे.

२०१७ मध्ये १ ते २ मि. मी. पासून १५ मि. मी. पर्यंतच्या कसलाही उपयोग न होणाऱ्या ३१ दिवसांच्या पावसाची नोंद आहे. त्यामुळे एकूण आकडेवारी फुगली. दि. ७ सप्टेंबर २०१७ रोजी तालुक्यात सरासरी ६८ मि. मी. एवढा एकच दिवस पाऊस पडला. त्यानंतर २०१८ मध्ये दि. १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यात सरासरी ५६ मि. मी. पाऊस एका दिवशी पडला.

बाकी विरळ पावसाचे ७ दिवस मिळून १८६ मि. मी. एवढा पाऊस पडला. पावसात एवढा मोठा खंड पडल्याने डाळिंबाची अवस्था वाईट झाली. त्यात उन्हाळ्यात मे महिन्यात ४० अंशापेक्षा जास्त तापमान १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिले. यंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.

शेतकऱ्यांनी जून महिन्यात डाळिंबाचा मृग बहर विकतचे पाणी टॅँकरने घालून धरला. पण आटपाडी तालुक्यातील डाळिंबाच्या इतिहासात यंदा प्रथमच फळधारणाच झाली नाही. तेल्या रोगाच्या आक्रमणापेक्षा हे वाईट आहे. बहर धरल्यावर कळी २२ व्या दिवशी झाडावर दिसते. तर ३५-३६ व्या दिवशी सेटींग (फलधारणा) होते.

सव्वा महिन्यात फलधारणा होणे अपेक्षित आहे. यंदा कळ्या लागतात; पण त्याला फळ लागण्याऐवजी फांदीवर हिरव्या काड्या म्हणजे फुटवा वाढत आहे. दरवर्षी खोडालाही फुटवा असतो. शेतकरी फळाचे अन्न फुटव्याला जाऊन झाड, फळे, अशक्त होऊ नयेत म्हणून काढतात. यंदा जूनपासून दर ११ व्या दिवशी फुटवा येतो. १५ व्या दिवशी शेतकरी काढतात. असे ७ ते ८ वेळा झाले आहे. नुसता खर्च वाढत आहे.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली