शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

काटापेमेंट तोडी जोमात, सभासदांच्या उसाला तुरे!

By admin | Published: February 13, 2015 10:31 PM

५० लाख टन गाळप : कारखाने एफआरपी दर देणार; दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांचा कृष्णाकाठी शिरकाव

सांगली : जिल्ह्यातील चार खासगी आणि बारा सहकारी अशा १६ साखर कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधित ५० लाख टन उसाचे गाळप केले असून, आजअखेर (शुक्रवार) ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील काही साखर कारखान्यांनी वजन झाल्यानंतर जाग्यावर पैसे देऊन (काटापेमेंट) मिरज, तासगाव तालुक्यातील ऊस तोडीला प्राधान्य दिल्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उसाला तुरे आहेत. शिल्लक सर्व ऊस गाळपाचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान सध्या तरी दिसत आहे. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्वभागामध्ये म्हैसाळ, टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचल्यामुळे तेथे उसाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. यातच साखर कारखान्यांनी ऊसदराचा तिढा सुटला नसल्यामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले आहेत. तासगाव, निनाईदेवी (दालमिया शुगर) कारखान्यांचे गळीत हंगाम बंद आहेत. तसेच वसंतदादा कारखानाही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे जिल्ह्यातील उसाचे वेळेत गळीत होणार का? याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख ३४ हजार ८९ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. आतापर्यंत ४० हजार हेक्टरपर्यंत उसाच्या तोड झाल्याचा कारखाना प्रशासनाचा अंदाज आहे. येत्या दोन महिन्यांत ३४ हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडण्याचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. हा अंदाज घेऊनच दुष्काळी भागातील साखर कारखान्यांनी तासगाव, मिरज तालुक्यात शिरकाव करून काटापेमेंट देऊन तोडी सुरू केल्या आहेत. याच काही कारखान्यांनी कर्नाटकातूनही उसाच्या तोडी सुरू केल्या आहेत. काटापेमेंटला कारखानदार प्राधान्य देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उसाला एकरकमी १६०० ते १८०० रुपये दर घेऊन शेतकरी गप्प बसत आहेत. या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याची गरज नसल्यामुळे कारखानदार काटापेमेंटचा ऊस उचलत आहेत. साखर कारखाने कमी दराचा ऊस उचलण्यास प्राधान्य देत असल्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाला तुरे आले आहेत. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील काही ऊस अठरा महिने झाला तरीही तो गाळपास गेला नाही. यामुळे ऊस वेळेत गाळपाला जाणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. (प्रतिनिधी)