शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2024 18:49 IST

रोज सात टीएमसी आवक

सांगली : कोयना, वारणा, राधानगरीसह कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचे हवामान विभागाकडून संकेत आहेत. त्यामुळे हिप्परगी, अलमट्टी धरणातील सध्याचा पाणीसाठा अत्यंत धोकादायक आहे. केंद्र जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तो पाणीसाठा चुकीचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अलमट्टी धरणाची पाणी पातळी १५ जूनपर्यंत ५०८.६२ मीटर, ३० जूनपर्यंत ५१३.६० मीटर, १५ जुलैपर्यंत ५१७.११ मीटर व ३० जुलै रोजी ५१३.६० मीटर, तसेच ३० ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरच्या पुढे पाणी साठा करण्यास हरकत नाही. हाच नियम हिप्परगी बंधाऱ्याबाबतही आहे. हिप्परगी येथील बॅरेजची संपूर्ण दारे उघडी करून ३० ऑगस्टपर्यंत हिप्परगीची पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्यात यावी, असे ठरले होते. ठरल्यानुसार केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वांची अंमलबजावणी कर्नाटक जलसंपदा विभागाने केल्याचे दिसून येत नाही. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे जास्तीत जास्त पाणीसाठा करून ठेवायचे त्यांचे नेहमीचेच धोरण दिसत आहे. या पाणीसाठ्याचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला धोका निर्माण होणार आहे. सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कृष्णा खोऱ्यात पावसाचा जाेर वाढला आहे. हिप्परगी, अलमट्टी धरणात प्रमाणापेक्षा जास्त पाणीसाठा केल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला तातडीने धरणातून विसर्ग सुरू करून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाचे पालन करावे, अशी सूचना करावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांचीही कर्नाटक सरकारकडून अंमलबजावणी होत नाही.

रोज सात टीएमसी आवकअलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१५.१६ मीटर आहे व तेथील पाण्याची आवक रोज सात टी.एम.सी. आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही आवक वाढण्याची शक्यता असून, दि. ३१ जुलैच्या आत अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१९.६० मीटर होण्याची शक्यता आहे. अलमट्टीने विसर्ग वाढवला पाहिजे, अशी मागणीही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी