शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अखंडित विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषिपंप वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण जाहीर करण्यात आले आहे. बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणीही करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पाेलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू होणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८० हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ४७३ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत पीक कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील २७ हजार ५५० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १३६ कोटी ८१ लाख रुपये रक्कम वर्ग करून पूरबाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात असली तरी, नागरिकांनी अजूनही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सध्या लसीकरण सुरू असले तरी अद्यापही कोरोना संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

चाैकट

पूरबाधितांना शासनाचा दिलासा

पालकमंत्री पाटील म्हणाले, जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमध्ये शेती, गोठा, घरांसह इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. यासाठी २६ कोटी १० लाख ६८ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली. त्यापैकी शेतीपिकाची २३ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ४९ हजार ७२० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीतील शेतीपिके नुकसानीसाठी २६ कोटी ६० लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

चाैकट

लक्षवेधी संचलन

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक विभाग, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वानपथक, जेलकैदी पथक वाहन, बाँबशोधक पथक, निर्भया पथकाने संचलन सादर केले. त्यास उपस्थितांनी दाद दिली.